शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरच्या ‘कळ्या’ ग्रंथमहोत्सवात खुलल्या--विचारधारा बदलण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 00:40 IST

काश्मीर म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून काश्मीर धुमसत असून, तेथील सर्वसामान्य जनता होरपळत आहे. विशेषत: तेथील कोवळी मनं कोमेजून जात आहेत.

ठळक मुद्देमराठी मातीत रुजलेले दोघे ठरले लक्षवेधी; पुस्तक विक्रीतून परिवर्तनाचा मार्ग

सचिन काकडे ।सातारा : काश्मीर म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून काश्मीर धुमसत असून, तेथील सर्वसामान्य जनता होरपळत आहे. विशेषत: तेथील कोवळी मनं कोमेजून जात आहेत. अशा वातावरणात पुणे येथील सरहद संस्थेने काश्मीरमधील कोमेजू पाहणाऱ्या कळ्यांना आपल्या पंखाखाली घेतलं. महाराष्ट्रात आणून त्यांचं संगोपन केलं, स्वत:च्या पायावर उभं केलं. मराठी मातीत रुजलेली अशीच दोन फुलं साताºयाच्या ग्रंथमहोत्सवात लक्षवेधी ठरली.

मुश्ताक अहमद आणि फिरदोस मीर अशी या युवकांची नावे आहेत. जिल्हा परिषदेच्या मैदानावर सुरू असलेल्या ग्रंथमहोत्सवात विचारांची देवाण-घेवाण सुरू असताना, काश्मीरमधील ही मुलं पुस्तकविक्रीच्या माध्यमातून जम्मू काश्मीरचा वास्तववादी इतिहास येथील संस्कृती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याबरोबरच महाराष्ट्राची विचारधारा काश्मीरच्या मातीत रुजविण्याचा प्रत्यत्न करीत आहेत.

मुश्ताक अहमद ‘लोकमत’शी बोलताना म्हणाला, ‘काश्मीरमध्ये दहशतवाद आहे, परंतु तेथील वास्तव कधीच जगासमोर येत नाही. २००४ मध्ये आम्ही सरहद संस्थेची जोडलो गेलो. तेव्हापासून आम्ही पुण्यात स्थायिक झालो. आम्ही बीएपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. काश्मीरची संस्कृती, येथील वास्तव लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आमची धडपड सुरू आहे.

काश्मीरसह आसाम, मणिपूर आदी राज्यांत दहशतीच्या वातावरणात होरपळलेली आमच्यासारखी अनेक मुले-मुली आज ‘सरहद’च्या माध्यमातून एकत्र आली आहेत. ‘सरदह’मुळे आमच्या पंखांना बळ मिळालं. ग्रंथप्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही काश्मीरचा खराखुरा चेहरा लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर महाराष्ट्राची विचारधारा अन् येथील संस्कृती आम्ही काश्मीरमध्ये रुजविण्याचा प्रयत्नही करीत आहोत. आम्हाला दहशतवाद कायमचा मिटवायचा आहे.

आम्ही जसं महाराष्ट्रात स्वच्छंदपणे वावरतो, त्याचप्रमाणे काश्मीरची जनताही दहशतवादाच्या बेडीतून मुक्त झाली पाहिजे. संजय नहार यांनी सुरू केलेल्या एका पुस्तक प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून आमचे हे काम अखंडपणे सुरू आहे. सातारकर नागरिक व वाचकांमधूनही काश्मीरचे जीवनमान, काश्मीरचा इतिहास, काश्मीरची ५००० वर्षे, कारगील, माझा पाकिस्तान, बृहत भारत अशा पुस्तकांना मागणी असल्याची माहिती फिरदोस मीर याने दिली. 

महाराष्ट्राच्या मातीत राहून गेल्या पंधरा वर्षांत आम्हाला खूप काही शिकायला मिळाले आहे. येथील अनुभव आम्हाला काश्मीरमधील नवीन पिढी सुसंस्कृत आणि तिची विचारधारा बदलण्यासाठी प्रेरक ठरत आहे. काश्मीर आणि भारत हे काही वेगळे नाहीत. काश्मिरी म्हटलं की आमच्याकडे वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं. हे कुठेतरी थांबायला हवं.- मुश्ताक अहमद

काश्मीरमध्ये स्वत:च्या घरात जायचं म्हटलं तरी ओळखपत्र सोबत ठेवावं लागतं. पाहावे तिकडे सैन्यातील जवान उभारलेले असतात. महाराष्ट्रात तसं नाही. काश्मीरमधील दहशतवाद, हिंसाचाराचा आता अस्त व्हायला हवा. शिकून घरात बसलेल्या युवकांची मानसिकता बदलण्यासाठी आम्ही आमच्यापरीने सर्वतोपरी प्रयत्न करीत राहणार आहोत.- फिरसोद मीरजिल्हा ग्रंथमहोत्सवात ‘सरहद’ संस्थेशी जोडले गेलेल्या काश्मीरमधील युवकांनी पुस्तक विक्रीचा स्टॉल उभारला होता.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPuneपुणे