शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

काश्मीरच्या ‘कळ्या’ ग्रंथमहोत्सवात खुलल्या--विचारधारा बदलण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 00:40 IST

काश्मीर म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून काश्मीर धुमसत असून, तेथील सर्वसामान्य जनता होरपळत आहे. विशेषत: तेथील कोवळी मनं कोमेजून जात आहेत.

ठळक मुद्देमराठी मातीत रुजलेले दोघे ठरले लक्षवेधी; पुस्तक विक्रीतून परिवर्तनाचा मार्ग

सचिन काकडे ।सातारा : काश्मीर म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून काश्मीर धुमसत असून, तेथील सर्वसामान्य जनता होरपळत आहे. विशेषत: तेथील कोवळी मनं कोमेजून जात आहेत. अशा वातावरणात पुणे येथील सरहद संस्थेने काश्मीरमधील कोमेजू पाहणाऱ्या कळ्यांना आपल्या पंखाखाली घेतलं. महाराष्ट्रात आणून त्यांचं संगोपन केलं, स्वत:च्या पायावर उभं केलं. मराठी मातीत रुजलेली अशीच दोन फुलं साताºयाच्या ग्रंथमहोत्सवात लक्षवेधी ठरली.

मुश्ताक अहमद आणि फिरदोस मीर अशी या युवकांची नावे आहेत. जिल्हा परिषदेच्या मैदानावर सुरू असलेल्या ग्रंथमहोत्सवात विचारांची देवाण-घेवाण सुरू असताना, काश्मीरमधील ही मुलं पुस्तकविक्रीच्या माध्यमातून जम्मू काश्मीरचा वास्तववादी इतिहास येथील संस्कृती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याबरोबरच महाराष्ट्राची विचारधारा काश्मीरच्या मातीत रुजविण्याचा प्रत्यत्न करीत आहेत.

मुश्ताक अहमद ‘लोकमत’शी बोलताना म्हणाला, ‘काश्मीरमध्ये दहशतवाद आहे, परंतु तेथील वास्तव कधीच जगासमोर येत नाही. २००४ मध्ये आम्ही सरहद संस्थेची जोडलो गेलो. तेव्हापासून आम्ही पुण्यात स्थायिक झालो. आम्ही बीएपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. काश्मीरची संस्कृती, येथील वास्तव लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आमची धडपड सुरू आहे.

काश्मीरसह आसाम, मणिपूर आदी राज्यांत दहशतीच्या वातावरणात होरपळलेली आमच्यासारखी अनेक मुले-मुली आज ‘सरहद’च्या माध्यमातून एकत्र आली आहेत. ‘सरदह’मुळे आमच्या पंखांना बळ मिळालं. ग्रंथप्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही काश्मीरचा खराखुरा चेहरा लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर महाराष्ट्राची विचारधारा अन् येथील संस्कृती आम्ही काश्मीरमध्ये रुजविण्याचा प्रयत्नही करीत आहोत. आम्हाला दहशतवाद कायमचा मिटवायचा आहे.

आम्ही जसं महाराष्ट्रात स्वच्छंदपणे वावरतो, त्याचप्रमाणे काश्मीरची जनताही दहशतवादाच्या बेडीतून मुक्त झाली पाहिजे. संजय नहार यांनी सुरू केलेल्या एका पुस्तक प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून आमचे हे काम अखंडपणे सुरू आहे. सातारकर नागरिक व वाचकांमधूनही काश्मीरचे जीवनमान, काश्मीरचा इतिहास, काश्मीरची ५००० वर्षे, कारगील, माझा पाकिस्तान, बृहत भारत अशा पुस्तकांना मागणी असल्याची माहिती फिरदोस मीर याने दिली. 

महाराष्ट्राच्या मातीत राहून गेल्या पंधरा वर्षांत आम्हाला खूप काही शिकायला मिळाले आहे. येथील अनुभव आम्हाला काश्मीरमधील नवीन पिढी सुसंस्कृत आणि तिची विचारधारा बदलण्यासाठी प्रेरक ठरत आहे. काश्मीर आणि भारत हे काही वेगळे नाहीत. काश्मिरी म्हटलं की आमच्याकडे वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं. हे कुठेतरी थांबायला हवं.- मुश्ताक अहमद

काश्मीरमध्ये स्वत:च्या घरात जायचं म्हटलं तरी ओळखपत्र सोबत ठेवावं लागतं. पाहावे तिकडे सैन्यातील जवान उभारलेले असतात. महाराष्ट्रात तसं नाही. काश्मीरमधील दहशतवाद, हिंसाचाराचा आता अस्त व्हायला हवा. शिकून घरात बसलेल्या युवकांची मानसिकता बदलण्यासाठी आम्ही आमच्यापरीने सर्वतोपरी प्रयत्न करीत राहणार आहोत.- फिरसोद मीरजिल्हा ग्रंथमहोत्सवात ‘सरहद’ संस्थेशी जोडले गेलेल्या काश्मीरमधील युवकांनी पुस्तक विक्रीचा स्टॉल उभारला होता.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPuneपुणे