शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

कास पठार फुलांनी बहरु लागले..!

By admin | Updated: July 12, 2015 21:10 IST

पर्यटकांची गर्दी : निसर्गरम्य दृश्य ; मार्गावरील दर्शनी फलक गायब

पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेला असणारे व पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाणारे कास पठार फुलांनी बहरण्यास सुरूवात झाली आहे. पठारावरील नयनरम्य सुंदर अशा फुलांना पाहण्यासाठी जिल्ह्याबरोबरच राज्यातून पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होवू लागली आहे. परंतू साताऱ्याहून कास पठारावर प्रवेश करताना ‘कास पठार आपले सहर्ष स्वागत करीत आहे.’ हा दर्शनी फलक गेल्या महिन्यातील जोरदार वाऱ्याने पडल्यानंतर गायब झाला आहे. त्यामुळे पठाराच्या मध्यावर आल्यावरच आपण कास पठारावर आलो आहोत, अशी जाणीव होत आहे.सातारा जिल्ह्यातील कास पठार हे मोठ्या प्रमाणावर जैवविविधता असलेले ठिकाण आहे. पठारावरील मनाला मोहून टाकणारे निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी या परिसरात पर्यटकांची सतत गर्दी असते.या पठाराचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे जून ते आॅक्टोबर महिन्याच्या दरम्यान तृण, कंद, वेली तसेच वृक्ष, झुडपे, आर्किड व डबक्यातील वनस्पतींना अत्यंत आकर्षक अशी निळ्या-जांभळ्या लाल पांढऱ्या रंगांची फुले येतात. या पठारावरील सुंदर अशा विविध रंगांच्या फुलांचा कालावधी आठ ते पंधरा दिवसांचा असतो. अशावेळी कास पठाराचे रुप सतत बदलत असते. सध्या पांढऱ्या रंगाची आर्किड फुले येण्यास सुरूवात झाली असल्याने अनेक पर्यटक आपल्या कुटूंबासमवेत दाट धुक्यासह पावसाळी ऋतुचा आनंद घेत या मनमोहक सुंदर अशा फुलांना आपल्या कॅमेऱ्यात टिपताना दिसत आहेत. शनिवार, रविवारी पर्यटक महाविद्यालयीन तरुणार्इंची मोठ्या प्रमाणावर कास पठारावर गर्दी होवू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. (वार्ताहर)विविधरंगी फुले...सह्याद्री पर्वत रांगेतील निसर्गात कास पठार येथे जून ते आॅक्टोबर महिन्यात विविध रंगांची फुले फुलण्यास सुरूवात होते. यामध्ये झाडांवरील आर्किड, गजरा, अमरी, गुलाबदानी, जमिनीवरील आर्किड, भूईचक्र, आर्किड तसेच इतर लहान वनस्पती, झाडे येतात. सध्या पांढऱ्या फुलांनी पठार बहरण्यास सुरूवात झाली आहे.कास पठाराच्या प्रवेशद्वारावर असणारा दर्शनी फलक लवकर लावण्यात यावा. तरच परजिल्ह्यातून येणाऱ्या पर्यटकांना आपण कास पठारावर आलो आहोत, याची जाणीव होईल. -गणेश मोहिते, पर्यटक