शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

‘काकां’ची निवृत्ती आता नव्या नेतृत्वाचा ‘उदय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 23:00 IST

प्रमोद सुकरे।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : ‘येणारी विधानसभा निवडणूक मी लढविणार नाही,’ अशी जाहीर स्पष्टोक्ती माजीमंत्री विलासराव पाटील काकांनी नुकतीच एका कार्यक्रमात दिलीय. खरंतर त्यामुळे त्यांच्या काही जुन्या निष्ठावंतांच्यात अस्वस्थताही पसरलीय म्हणे. पण त्यांचे सुपुत्र वकीलदादांनी मात्र उमेदवार कोण हे महत्त्वाचे नाही. पण रयत संघटनेच्या ताब्यात पुन्हा आमदारकी आणण्यासाठी कामाला लागा, ...

प्रमोद सुकरे।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : ‘येणारी विधानसभा निवडणूक मी लढविणार नाही,’ अशी जाहीर स्पष्टोक्ती माजीमंत्री विलासराव पाटील काकांनी नुकतीच एका कार्यक्रमात दिलीय. खरंतर त्यामुळे त्यांच्या काही जुन्या निष्ठावंतांच्यात अस्वस्थताही पसरलीय म्हणे. पण त्यांचे सुपुत्र वकीलदादांनी मात्र उमेदवार कोण हे महत्त्वाचे नाही. पण रयत संघटनेच्या ताब्यात पुन्हा आमदारकी आणण्यासाठी कामाला लागा, असे कार्यकर्त्यांना आवाहन केलंय. परिणामी दक्षिणच्या राजकारणात उंडाळकर ‘काकां’ची राजकीय एक्झीट अन् आता नव्या नेतृत्वाचा ‘उदय’ याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.कºहाड दक्षिणच्याच नव्हे तर अनेक वर्षे जिल्ह्याच्या राजकारणावर गारूड घालणारं एक नेतृत्व म्हणजे विलासराव पाटील-उंडाळकर. कºहाड दक्षिण विधानसभा मतदार संघातून एकदा नव्हे तर तब्बल सातवेळा विधानसभेची निवडणूक जिंकून एक वेगळा इतिहास रचणारे नेतृत्व म्हणजे विलासराव उंडाळकर. जिल्ह्याच्या राजकारणात कधीही कितीही प्रसंग आला बाका तर त्यावर उपाय काढणारे नेतृत्व म्हणजे विकासकाका अशी त्यांची एक काळ ख्याती होती.मात्र, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर ‘पृथ्वी’राज अवतरल्यानंतर उंडाळकरांच्या राजकारणाला खऱ्या अर्थाने घरघर लागली, असे म्हणावे लागेल.गत विधानसभा निवडणुकीत विजयाची सप्तपदी पार पाडलेल्या उंडाळकर काकांना काँगे्रसच्या उमेदवारीपासून ‘हात’भर अंतरावर ठेवण्यात आले. मात्र, हे पचनी न पडलेल्या उंडाळकरांनी थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधातच दंड थोपटले. त्यांच्या बंडखोरीच्या गाडीला राष्ट्रवादीने ‘चावी’ दिली. तर पृथ्वीबाबांच्या गाडीतून उतरलेल्या भोसले बाबांनी ‘कमळ’ हातात घेतल्याने तिरंगी लढतीत पृथ्वीबाबांनी बाजी मारली. आणि उंडाळकर गट दक्षिणेतल्या राजकारणातही बॅकफूटवर गेला. तेव्हापासून उंडाळकर गटाच्या आमदारकी पुन्हाताब्यात घेण्यासाठी जोरबैठका सुरू आहेत.त्याचाच एक भाग म्हणून विलासकाका उंडाळकरांच्या सार्वजनिक जीवनाची पन्नास वर्षे असा एक कार्यक्रम आयोजित करून त्याला माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची प्रमुख पाहुणे म्हणून असणारी उपस्थिती बोलकी आहे.त्याही पुढे जाऊन स्वातंत्र्यसैनिक दादा उंडाळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त उंडाळे येथील आयोजित कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांची असणारी उपस्थितीही बरंच काही सांगून जातं.आमदार रयत संघटनेचा की विचाराचा..येणाºया विधानसभा निवडणुकीत आमदार आपलाच असेल, असे उंडाळकर सांगतायंत. पण हा आमदार रयत संघटनेचा, संघटनेच्या विचाराचा की रयत संघटनेला बरोबर घेणारा असेल, याबाबत तालुक्याच्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.‘नियोजन’ चुकलं...विलासराव पाटील-उंडाळकर यांचे राजकीय वारसदार म्हणून अ‍ॅड. उदय पाटील यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी गत जिल्हा परिषद निवडणुकीत येळगाव गटातून सदस्य म्हणून विजयी होऊन आपली एन्ट्री केली. मात्र, जिल्हा नियोजन समितीपासून त्यांना दूरच ठेवण्यात आलं. त्यामुळे विलासराव उंडाळकरांचे राजकीय नियोजन चुकल्याची चर्चा आजही तालुक्यात सुरू आहे.‘बाबा’ अन् ‘काका’ एकत्रीकरणाची चर्चाजातीवादी पक्षांना रोखण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र आले पाहिजे, अशी हाक काँगे्रसने दिली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत गटबाजी तर काँग्रेसमध्ये असूच नये, अशी ज्येष्ठांची भावना आहे. उंडाळकरही ‘मी काँगे्रस विचाराचाच पाईक आहे,’ असेच नेहमी सांगतात. त्यामुळे दक्षिणेतील काँगे्रसचे ‘बाबा’ ‘काका’ गट एकत्रित येणार, अशी चर्चा आहे.एकमेकांवरील टीका टाळली जातेयकºहाड दक्षिण विधानसभा मतदार संघात आमदार पृथ्वीराज चव्हाण व माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर दोघांचेही कार्यक्रम सध्या सुरू आहे. यापूर्वी यांच्या व्यासपीठावरून परस्परांवर टीकेची झोड उठवली जायची. सध्या मात्र, दोघांच्याही व्यासपीठावरून फक्त भाजप आणि सेनेला टार्गेट केल्याचे पाहायला मिळत आहे.