शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
5
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
6
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
7
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
8
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
9
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
10
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
11
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
12
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
13
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
15
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
16
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
17
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
18
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
19
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
20
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना गस्तीची माहिती देणे सक्तीचे

By admin | Updated: August 6, 2015 00:47 IST

सुनील फुलारी : माहिती न देणाऱ्यांवर कारवाई; अफवा पसरविणाऱ्यांचाही समाचार घेणार

सांगली : रात्रीची गस्त घालताना त्याबाबतची आगाऊ माहिती संबंधित पोलीस ठाण्यांना द्यावी, अन्यथा हत्यारासह फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधीक्षक सुनील फुलारी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला. ते म्हणाले की, गेल्या महिन्याभरापासून महामार्ग, वाळवा, सांगली, मिरज व इतर ग्रामीण भागात चोरांच्या परप्रांतीयांच्या टोळ्या कार्यरत असल्याच्या अफवा जोरदार पसरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी व युवकांनी स्वत:हून रात्रगस्त सुुरू केली आहे. गस्त घालीत असताना युवकांमधील काहीजणांनी स्वत:च वाटमाऱ्या करून चोऱ्या केल्याचे व हुल्लडबाजी करून निरपराध नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. मारहाण करणे, घरावर दगडफेक करणे आदी प्रकार उघडकीस आले आहेत. अशा उपद्रवी लोकांवर इस्लामपूर, विश्रामबाग, सांगली ग्रामीण व आष्टा पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित गावातील लोकांनी, युवकांनी गस्त घालत असताना त्याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात याची आगाऊ माहिती देणे आवश्यक आहे. हुल्लडबाजी न करता अफवा न पसरवता गस्त घालावी, यासाठी पोलिसांचीही मदत घेण्यात यावी. रात्री गस्त घालण्यासाठी आता राज्य राखीव दलाची तुकडीही तैनात करण्यात आलेली आहे. यावर पोलीस निरीक्षक, विभागीय पोलीस अधिकारी यावर देखरेख करणार आहेत. सोशल मीडियावरून अफवा पसरवल्या जात असूून, याबाबतही सर्वांनी दक्षता घ्यावी. यासंदर्भात अनेकांना नोटिसाही पाठविण्यात आल्या आहेत. यापुढेही सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. ज्यांना गस्त घालायची आहे, त्यांनी आपली नावे पोलीस ठाण्याला द्यावीत. त्यामधील काहीजणांची ग्राम सुरक्षा दलामध्ये नियुक्ती करण्यात येईल. त्यांच्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपाधीक्षक प्रकाश गायकवाड, बजरंग बनसोडे यांनी दिली. (प्रतिनिधी) आता लाचखोरांच्या साहेबांचीही चौकशी! यापुढे पोलीस ठाणे अथवा शाखेतील कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्याविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई झाल्यास संबंधित विभागाच्या प्रभारी अधिकाऱ्यास जबाबदार धरुन कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक सुनील फुलारी यांनी दिली. अर्थात तत्पूर्वी याची सखोल चौकशी करण्यात येईल, असेही ते म्हणाले. ते म्हणाले की, पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्याच्या अधिन राहूनच कनिष्ठ अधिकारी कर्मचारी काम करीत असतात. त्यांच्याकडे प्रलंतबत असणारे अर्ज, तपासावरील गुन्हे, इतर प्रकरणे यांची नियमित दफ्तर तपासणी वरिष्ठ घेत नाहीत. कर्मचाऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करीत नाहीत. नेमून दिलेले काम कनिष्ठ कर्मचारी करतात की नाही, याची खातरजमाही अधिकारी करतान दिसत नाहीत. त्यामुळे कर्मचारी लाचखोरीस प्रवृत्त होतात व त्यांना यासाठी वाव मिळतो. यामुळे पोलीस दलाची बदनामी होऊन पोलिसांकडे पाहण्याचा संशय बळावतो. हे टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी कनिष्ठांवर देखरेख ठेवली पाहिजे. यामध्ये त्यांचीही जबाबदारी असते. यापुढे कनिष्ठ अधिकारी, कर्मचारी लाचखोरीमध्ये सापडल्यास संबंधितांच्या प्रभारी अधिकाऱ्याला जबाबदार धरुन त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. तत्पूर्वी प्रभारींच्या भूमिकेचीही चौकशी करण्यात येईल.