शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

पूरग्रस्तांसाठी ते बनले संकटमोचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:35 IST

सचिन काकडे सातारा जिल्ह्याला अतिवृष्टीचा यंदा सर्वात मोठा फटका बसला. नद्यांना महापूर आला. अनेक ठिकाणी भूस्खलन झाले. घरे उद्ध्वस्त ...

सचिन काकडे

सातारा जिल्ह्याला अतिवृष्टीचा यंदा सर्वात मोठा फटका बसला. नद्यांना महापूर आला. अनेक ठिकाणी भूस्खलन झाले. घरे उद्ध्वस्त झाली तर काहींना जीवही गमवावा लागला. निसर्गाच्या या रुद्रावताराचा फटका महावितरणलादेखील बसला अन् जिल्ह्यातील शेकडो गावे अंधारात बुडाली. मात्र, जिगरबाज वीज कर्मचाऱ्यांनी पाऊस, पुराचा धीरोदत्तपणे सामना करत ही गावे प्रकाशमान तर केलीच शिवाय संकटमोचक म्हणून पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभेही राहिले.

जिल्ह्यात यावेळी मान्सून उशिरा सक्रिय झाला. मात्र, पुढे काय होईल, याची कोणी तसूभरही कल्पना केली नव्हती. गेल्याच आठवड्यात जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने अक्षरशः तांडव घातले. या पावसामुळे नद्यांना पूर आला, रस्ते खचले, दरडी कोसळल्या, अनेक घरांची पडझड झाली, शेती वाहून गेली. इतकेच नव्हे तर दीड हजारहून अधिक विजेचे खांब जमीनदोस्त झाले. एकीकडे निसर्गाचा प्रकोप सुरू असताना दुसरीकडे जिल्ह्यातील तब्बल ४२६ गावे अंधारात बुडाली अन् या गावांचा बाहेरील जगाशी संपर्कच तुटला. त्यामुळे अशा गावांपर्यंत मदत पोहोचविणे अडचणीचे ठरू लागले. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सातारकर पुढे सरसावले असतानाच वीज कर्मचाऱ्यांनीदेखील सलग चार-पाच दिवस पावसाचा मारा, पूर, थंडी, चिखल, दरडी अशा नैसर्गिक आपत्तींचा सामना करत गावे प्रकाशमान करण्याचे काम केले.

अनेक ठिकाणी विजेचे खांब वाहून गेले होते. जिथे माणसाला नीट चालता येत नाही, अशाठिकाणी या कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या खांद्यावर खांब वाहून नेले. पुराच्या पाण्यात उभं राहून वीज जोडणी केली. प्रचंड जोखीम पत्करून या जिगरबाज कर्मचाऱ्यांनी आव्हानात्मक काम कमी कालावधीत पूर्ण केलं आणि अंधारात गेलेली गावे पुन्हा प्रकाशमान झाली. वीज आल्यामुळे या गावांचा पुन्हा बाहेरील जगाशी संपर्क आला. गावोगावच्या पाणी योजना पुन्हा सुरू झाल्या. प्रशासनाला गावांपर्यंत मदत पोहोचविणे सोपे झाले. हे सर्व साध्य झाले ते महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे. संकटमोचक ठरलेल्या या कर्मचाऱ्यांचे व त्यांच्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

(चौकट)

- गावांची वीज परत आल्याने पाणी योजना सुरू झाल्या.

- बंद पडलेली दूरध्वनी सेवाही पूर्ववत झाली.

- संपर्कामुुळे डोंगरी भागात शासकीय यंत्रणेला पोहोचता आले.

- नुकसानग्रस्तांपर्यंत मदतही पोहोचवता आली.

- टेलिव्हिजन सुरू झाल्याने पावसाच्या अंदाजाबाबतची माहिती मिळू लागली.

(कोट)

अतिवृष्टी व महापुराचा महावितरणला मोठा फटका बसला. खांब वाहून गेले, रोहित्र बंद पडले. शेकडो गावे अंधारात बुडाली. मात्र, आमच्या कर्मचाऱ्यांनी या नैसर्गिक आपत्तीचा जिद्दीने सामना केला. कधी पुराच्या पाण्यात उभं राहून तर कधी गुडघाभर चिखल तुडवत वीजजोडणी केली. कधी खांद्याची कावड करून खांबही वाहून नेले. पूरग्रस्तांसाठी झटणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे.

- गौतम गायकवाड, अधीक्षक अभियंता