गरजूंसाठी ‘उन्नती’ सज्ज महिला उद्योजिका एकवटल्या : वर्षातून एका कुटुंबाला दिली जातेय भरीव आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 23:33 IST2018-03-07T23:33:58+5:302018-03-07T23:33:58+5:30
सातारा : सर्वसामान्य आर्थिक गटातून आलेल्या आणि स्वत:च्या बळावर उद्योग विश्वात मुक्त भरारी घेणाऱ्या साताऱ्यातील काही संवेदनशील उद्योजिका एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आल्या.

गरजूंसाठी ‘उन्नती’ सज्ज महिला उद्योजिका एकवटल्या : वर्षातून एका कुटुंबाला दिली जातेय भरीव आर्थिक मदत
प्रगती जाधव-पाटील ।
सातारा : सर्वसामान्य आर्थिक गटातून आलेल्या आणि स्वत:च्या बळावर उद्योग विश्वात मुक्त भरारी घेणाऱ्या साताऱ्यातील काही संवेदनशील उद्योजिका एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आल्या. टिपिकल बिशी न बिशीची संज्ञा बदलण्याचा निर्णय घेतात. त्यांच्या या निर्णयामुळे गेल्या पाच वर्षांत अनेक कुटुंबांना आधार मिळाला आहे. वर्षातून एक गरजवंत शोधून त्याला आवश्यक ती मदत बिशीच्या पैशातून केली जाते.
साताऱ्यातील काही महिला उद्योजिका उद्योग आणि व्यवसायाच्या निमित्ताने परिचित झाल्या. परस्परांना महिन्यातून एकदा भेटण्याचं निमित्त म्हणजे बिशी ही संकल्पना मनात पक्की झालेली. त्यामुळे काहींनी बिशीची आयडीया मांडली. कुठल्याही गोष्टीत आपण आरंभशूर असू नये, हे त्यांनी मनाशी पक्के केलेले. त्यामुळे बिशीवर जोरदार चर्चा झाली. आपापल्या व्यवसायात मग्न असताना उगीचच नाष्टा आणि खाण्याच्या निमित्ताने एकत्र येण्याचं काही कोणाला पटेना आणि मग प्रत्येकीने डोकॅलिटी लढवली. यातून ‘उन्नती’ या गटाची स्थापना झाली.
आपल्यासह इतरांच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करण्याचं निश्चित झाल्यानंतर १७ जणींचा ग्रुप तयार झाला. महिन्यातून एकदा शंभर रुपये देण्याच्या निमित्ताने त्यांची भेट व्हायची. १२ महिने पैसे साठल्यानंतर परस्परांच्या ओळखीने गरजू महिला शोधण्याची तयारी झाली. पहिल्याच वर्षी दोन शिवणयंत्र देऊन उद्योजिका घडविण्याचं उद्दिष्ट सफल होताना त्यांना दिसते. दुसºया वर्षी हुशार; पण हलाखीची आर्थिक परिस्थिती असलेल्या तरुणीला मदत करण्याचं निश्चित झालं. त्याचवेळी एक महिला वडापावचा गाडा सुरू करायचं सांगून त्यात काही मदत करता येते म्हणून ‘उन्नती’कडे आली.
वर्षभराची साठलेली रक्कम आणि उपलब्ध मागणी यांची तफावत होती. झालं मग काय प्रत्येकीने त्यांना मदत करण्याचं ठरवलं आणि एकाच वर्षात दोघींनाही सबळ करण्याचं काम त्यांनी केलं. त्यानंतर वेचले जिल्हा परिषद शाळेत मुलांना मल्लखांबची आवश्यकता असल्याचे त्यांना कळलं. झालं त्यावर्षी शाळेत मल्लखांब उभा करण्याचा चंगच या ग्रुपने बांधला. त्याद्वारे या शाळेने उत्कृष्ट मल्लखांबपटू निर्माण केले. यावर्षी निकिता सोनटकले या आंतरराष्ट्रीय कराटे खेळाडूला दुबईत स्पर्धेसाठी किट हवं होते. हे किट घेण्यासाठी ‘उन्नती’ने हात पुढं केला. महिलांनी महिलांच्या उन्नतीसाठी सुरू केलेली ही धडपड मार्गदर्शक आहे.
डब्यातून स्नेहभोजन
डॉ. मृणालिनी कोळेकर, मंजूषा शेठ, नेहा दोशी, वैशाली दोशी, मंजिरी दीक्षित, दीपाली भागवत, सायली मुतालिक, अंजली देशपांडे, दीपा काटदरे, शोभा कुलकर्णी, श्रृती कुलकर्णी, विद्या हिरेमठ, सुषमा भिडे, सुनीता शहा आणि मीरा गुजर. स्वत:च्या हिमतीवर साम्राज्य उभ्या करणाºया या महिला वर्षातून एकदाच मदत देण्याच्या निमित्ताने भेटतात. आपापल्या घरातून डबा आणून त्या स्नेहभोजनाचा आनंद घेतात.
दुबई येथे होणाºऱ्या अंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत निकिता सोनटकले हिला आवश्यक किटचे वितरण ‘उन्नती’च्या वतीने करण्यात आले.