शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवरायांमुळे लिहिण्याची प्रेरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 11:26 PM

पाचगणी : मोठ्यांनी लहानांसाठी लिहिलेले साहित्य म्हणून बालसहित्याचा उल्लेख होत असला तरी बाल्यावस्थेत वयाच्या सोळाव्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ...

पाचगणी : मोठ्यांनी लहानांसाठी लिहिलेले साहित्य म्हणून बालसहित्याचा उल्लेख होत असला तरी बाल्यावस्थेत वयाच्या सोळाव्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी आणि सोळाव्या वर्षी छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन करून आपणाला प्रेरणा दिली,’ असे मत अखिल भारतीय साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.भिलार येथे आयोजित अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी लेखक संजय मालपाणी, ज्येष्ठ लेखिका रेणू दांडेकर, स्वागताध्यक्ष बाळासाहेब भिलारे, डॉ. संगीता बर्वे, उपाध्यक्ष माधव राजगुरू, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, सहकार्यवाह सुनील महाजन, सरपंच वंदना भिलारे, समन्वयक शिरीष चिटणीस, प्रवीण भिलारे उपस्थित होते.डॉ. मोरे म्हणाले, ‘सुमारे सातशे वर्षांपूर्वी महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामींनी कावळा चिमणीची गोष्ट सांगितली. ती बालकांबरोबर प्रौढांसाठी ही मागर्दशक आहे. त्यामुळे साहित्यनिर्मितीत मोठ्यांचे आणि बालसाहित्य असा भेदभाव नको; पण बालमनावर संस्कार घडवण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी लेखन झाले पाहिजे.’दांडेकर म्हणाल्या, ‘आजोबा-आजीच्या गोष्टी ऐकतच आम्ही मोठे झालो; पण आता या गोष्टीची जागा लॅपटॉप, मोबाईलने घेतली. हे सर्व बदल संस्कारक्षम पिढी घडविण्यास खोडा घालत आहेत. निसर्ग आणि पुस्तके आपणाला आनंद देतात म्हणजे वाचन करा व लिहिते व्हा.’यावेळी लेखक संजय मालपाणी यांनी भोलनाथाची गोष्ट बोलक्या बाहुल्याच्या माध्यमातून सांगितली. वाचनाचे महत्त्व पटवून दिले. सुनील महाजन यांनी प्रास्तविक केले. रसूल पठाण यांनी सूत्रसंचालन केले. संजय ऐलवाड यांनी आभार मानले.