शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
5
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
6
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
7
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
8
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
9
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
10
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
11
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
12
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

कोयना प्रकल्पग्रस्तांसाठी स्वतंत्र कार्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोयना धरण व अभयारण्य ग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न वेगाने सुटावेत यासाठी या प्रकल्पग्रस्तांसाठी स्वतंत्र कार्यालय ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोयना धरण व अभयारण्य ग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न वेगाने सुटावेत यासाठी या प्रकल्पग्रस्तांसाठी स्वतंत्र कार्यालय निर्माण करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. तसेच महाराष्ट्र दिनापासून कोयना धरणग्रस्तांना जमीन वाटप करण्याचे आश्वासन अजित पवार यांनी दिले.

कोयना धरण व अभयारण्यग्रस्त प्रश्नाबाबत गुरुवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोयना धरणग्रस्तांचा प्रश्न १९६० पासून प्रलंबित आहे. सातारा जिल्ह्यामध्ये २७ हजार प्रकल्पग्रस्त आहेत. त्यापैकी तब्बल १३ हजार प्रकल्पग्रस्त हे केवळ कोयनेचे आहेत. कोयनेतील ६० टक्के पुनर्वसन रस्त्यांचा प्रश्न मिटला असला तरी ४० टक्के लोकांना अद्यापही न्याय मिळालेला नाही. जिल्हा पुनर्वसन खात्यामध्ये मुबलक कर्मचारी वर्ग नसल्याने पुनर्वसनाचा प्रश्‍न प्रलंबित पडत आहे. या परिस्थितीमध्ये कोयना प्रकल्पग्रस्तांसाठी स्वतंत्र कार्यालय असणे आवश्यक असल्याचे मंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

महानिर्मिती, महावितरण, महापारेषण नोकरीमध्ये कोयना धरणग्रस्त यांना विशेष प्राधान्य द्यावे. भावाबरोबर बहिणीला कायद्याप्रमाणे प्रकल्पग्रस्त म्हणून न्याय मिळावा. पाटण, जावळी, महाबळेश्वरमधील शेतीला पाणी देण्याचा प्रस्ताव करण्याचे सर्वेक्षण करण्यात यावे, आदी मागण्या धरणग्रस्तांचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी केल्या. त्यानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना अजित पवार यांनी केल्या आहेत.

व्याघ्रप्रकल्पच्या बाबतीत जन वन कमिटी व विकास आराखडाबाबात निधीची मागणी करण्यात आली. नौका विहार बाबत तात्काळ निर्णय घेऊन कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, अदिती तटकरे व कोयना प्रकल्पग्रस्तांच्यावतीने चैतन्य दळवी, महेश शेलार, मालोजीराव पाटणकर, सचिन कदम आदी उपस्थित होते. तर जिल्हाधिकारी कार्यालयातून विसी द्वारे राज्यमंत्री शंभूराज देसाई आणि जिल्हाधिकारी शेखर सिंह आदींची उपस्थिती होती.

- जमीन उपलब्ध करून त्याची आकडेवारी जाहीर करणे

- गायरान जमीन शेतीलायक देण्याचा निर्णय घेण्यात आला

- कोयना धरणग्रस्तांच्या प्रश्नाबाबत स्वतंत्र कार्यालय करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.