शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतून पाण्याची मागणी वाढली; कोयनेतून विसर्ग वाढवला

By नितीन काळेल | Updated: February 21, 2024 12:50 IST

राज्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मोठ्या पाणी प्रकल्पातही कमी साठा उरला

सातारा : सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी आणखी मागणी वाढल्याने कोयना धरणाच्या आपत्कालिन द्वारमधून बुधवारी सकाळपासून १ हजार क्यूसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे आता सांगलीसाठी पायथा वीजगृह २१०० आणि द्वार असे मिळून ३१०० क्यूसेक वेगाने पाणी कोयना नदीपात्रात सोडले जात आहे.राज्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मोठ्या पाणी प्रकल्पातही कमी साठा उरला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात टंचाईच्या झळा मोठ्या प्रमाणात सोसाव्या लागणार आहेत. तसेच सातारा जिल्ह्यातही पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात सुरु झालेले टॅंकर अजून बंद झाले नाहीत. त्यातच सध्यातर सहा तालुक्यात टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यावर एक लाखाहून अधिक नागरिक आणि हजारो पशुधनाची तहान अवलंबून आहे. तर जिल्ह्याच्या पश्चिम भागात मोठे पाणी प्रकल्प आहेत.गेल्यावर्षी अपुरे पर्जन्यमान झाल्याने ही धरणे भरली नाहीत. त्यातच या धरणावर अनेक सिंचन आणि पाणी योजनाही अवलंबून आहेत. त्यामुळे टंचाई आणि सिंचनाची मागणीमुळे धरणांतून पाणी सोडण्यात येत आहे. आताही कोयना धरणातून सांगलीसाठी पाणी विसर्ग सुरूच आहे.

गेल्यावर्षी कोयना धरण परिसरातही कमी पाऊस झाला होता. त्यामुळे कोयना ९५ टीएमसीपर्यंतच पोहोचलेले. भरण्यासाठी १० टीएमसी पाणीसाठा कमी पडलेला. या कोयनेच्या पाण्यावरच वीजनिर्मिती तसेच अनेक सिंचन आणि पाणी योजना अवलंबून आहेत. त्यातच साताऱ्यासह सांगली जिल्ह्यात कमी पाऊस पडला होता. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यापासूनच सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी मागणी होत होती. त्याप्रमाणे कोयनेतून विसर्ग सुरू करण्यात येत आहे. आता हा विसर्ग आणखी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे सांगलीसाठी आता ३१०० क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात आहे.

आपत्कालिन द्वारमधून १ हजार क्यूसेकपर्यंतच विसर्ग..सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी कोयना धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. त्यातच मंगळवारी सांगलीच्या पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी वाढल्याने आपत्कालिक द्वारमधून ५०० क्यूसेक पाणी सोडण्यात आले. त्यानंतर पुन्हा मागणी वाढली. परिणामी बुधवारी आणखी आपत्कालिन द्वारमधून ५०० क्यूसेक पाणी विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या द्वारमधून जास्तीतजास्त एक हजार क्यूसेकपर्यंतच विसर्ग करता येतो, अशी माहिती देण्यात आली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSangliसांगलीKoyana Damकोयना धरणWaterपाणी