शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

जिल्ह्यातील सोयाबीन क्षेत्रात वाढ, खरीप पेरणी पूर्णत्वाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 16:33 IST

सातारा जिल्ह्यात यावर्षी वेळेत पाऊस सुरू झाल्यामुळे खरीप हंगामातील पेरणी ९३ टक्के झाली आहे. तर गतवर्षी याच दिवसात ही पेरणी ७७ टक्क्यांवर होती. दरम्यान, यंदा बाजरीची पेरणी ९९ टक्के झाली असून, सोयाबीनचे क्षेत्र वाढल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात यंदा सोयाबीन क्षेत्र १११ टक्क्यापर्यंत गेले आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यातील सोयाबीन क्षेत्रात वाढ, खरीप पेरणी पूर्णत्वाकडे

सातारा : जिल्ह्यात यावर्षी वेळेत पाऊस सुरू झाल्यामुळे खरीप हंगामातील पेरणी ९३ टक्के झाली आहे. तर गतवर्षी याच दिवसात ही पेरणी ७७ टक्क्यांवर होती. दरम्यान, यंदा बाजरीची पेरणी ९९ टक्के झाली असून, सोयाबीनचे क्षेत्र वाढल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात यंदा सोयाबीन क्षेत्र १११ टक्क्यापर्यंत गेले आहे.जिल्ह्यात यावर्षी वळवाचा पाऊस मोठा झाला नसलातरी मान्सूनच्या पावसाने वेळेत तसेच चांगली सुरुवात केली. त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्यांना वेग आला होता. त्यामुळे मागीलवर्षीपेक्षा यंदा पेरणी अधिक झाली आहे. तर फलटण तालुक्यात आतापर्यंत ११९ टक्के पेरणी झाली आहे. माण तालुक्यात ११३, खटाव ८८.४९ तर कोरेगाव तालुक्यात ९९.१६ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.जिल्ह्यात खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख १६ हजार ७०१ हेक्टर आहे. यामध्ये बाजरीचे सर्वाधिक सर्वसाधारणपणे ६४ हजार ९ हेक्टर असून, त्यानंतर सोयाबीनचे ६३ हजार ७५४ आणि भाताचे ४९ हजार ८९ हेक्टर क्षेत्र गृहित धरले होते. तर खरिपात भुईमुगाचे सर्वसाधारणपणे ३८ हजार २२७ हेक्टरवर पीक घेण्यात येते. ज्वारी २४ हजार २०३, मका १८ हजार ५९८, नाचणीचे सर्वसाधारणपणे ५ हजार ८८७ हेक्टर आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात तूर, उडीद, मूग, इतर कडधान्ये, तृणधान्ये, तीळ, सूर्यफूल घेण्यात येतो.यावर्षी चांगला पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पेरणीने वेग घेतला होता. जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास ९३ टक्के पेरणी झाली आहे. यामध्ये ज्वारीची ६८ टक्के पेरणी झाली. तर भाताची ८३.१० टक्के क्षेत्रावर लागण झाली असून, सर्वाधिक पेरणी सोयाबीनची ११०.८६ टक्के क्षेत्रावर झालीय. तसेच मका ८६, भुईमूग ८२, तूर पिकाची ६७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील खरिपाच्या एकूण सर्वसाधारण क्षेत्राच्या २ लाख ९२ हजार ५३३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.फलटण, माणमध्ये बाजरी क्षेत्र वाढले...जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात खरीप हंगाम घेण्यात येतो. तर प्रत्येक तालुक्यातील पीक पद्धतीही वेगवेगळी आहे. जिल्ह्यातील पेरणी ९३ टक्के झाली असून, यामध्ये फलटण आणि माण तालुक्यांत सर्वाधिक पेरणी क्षेत्र आहे.

फलटण तालुक्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या ११९.१३ तर माणमध्ये ११२.९८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. फलटणमध्ये बाजरी, मका, सोयाबीन क्षेत्रांमध्ये वाढ झालीय. तर माणमध्ये बाजरीचे क्षेत्र वाढलेले आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीSatara areaसातारा परिसरAgriculture Sectorशेती क्षेत्र