शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
4
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
6
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
7
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
8
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
9
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
10
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
11
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
12
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
13
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
14
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
15
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
16
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
17
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
18
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
19
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
20
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या

जिल्ह्यातील सोयाबीन क्षेत्रात वाढ, खरीप पेरणी पूर्णत्वाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 16:33 IST

सातारा जिल्ह्यात यावर्षी वेळेत पाऊस सुरू झाल्यामुळे खरीप हंगामातील पेरणी ९३ टक्के झाली आहे. तर गतवर्षी याच दिवसात ही पेरणी ७७ टक्क्यांवर होती. दरम्यान, यंदा बाजरीची पेरणी ९९ टक्के झाली असून, सोयाबीनचे क्षेत्र वाढल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात यंदा सोयाबीन क्षेत्र १११ टक्क्यापर्यंत गेले आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यातील सोयाबीन क्षेत्रात वाढ, खरीप पेरणी पूर्णत्वाकडे

सातारा : जिल्ह्यात यावर्षी वेळेत पाऊस सुरू झाल्यामुळे खरीप हंगामातील पेरणी ९३ टक्के झाली आहे. तर गतवर्षी याच दिवसात ही पेरणी ७७ टक्क्यांवर होती. दरम्यान, यंदा बाजरीची पेरणी ९९ टक्के झाली असून, सोयाबीनचे क्षेत्र वाढल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात यंदा सोयाबीन क्षेत्र १११ टक्क्यापर्यंत गेले आहे.जिल्ह्यात यावर्षी वळवाचा पाऊस मोठा झाला नसलातरी मान्सूनच्या पावसाने वेळेत तसेच चांगली सुरुवात केली. त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्यांना वेग आला होता. त्यामुळे मागीलवर्षीपेक्षा यंदा पेरणी अधिक झाली आहे. तर फलटण तालुक्यात आतापर्यंत ११९ टक्के पेरणी झाली आहे. माण तालुक्यात ११३, खटाव ८८.४९ तर कोरेगाव तालुक्यात ९९.१६ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.जिल्ह्यात खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख १६ हजार ७०१ हेक्टर आहे. यामध्ये बाजरीचे सर्वाधिक सर्वसाधारणपणे ६४ हजार ९ हेक्टर असून, त्यानंतर सोयाबीनचे ६३ हजार ७५४ आणि भाताचे ४९ हजार ८९ हेक्टर क्षेत्र गृहित धरले होते. तर खरिपात भुईमुगाचे सर्वसाधारणपणे ३८ हजार २२७ हेक्टरवर पीक घेण्यात येते. ज्वारी २४ हजार २०३, मका १८ हजार ५९८, नाचणीचे सर्वसाधारणपणे ५ हजार ८८७ हेक्टर आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात तूर, उडीद, मूग, इतर कडधान्ये, तृणधान्ये, तीळ, सूर्यफूल घेण्यात येतो.यावर्षी चांगला पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पेरणीने वेग घेतला होता. जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास ९३ टक्के पेरणी झाली आहे. यामध्ये ज्वारीची ६८ टक्के पेरणी झाली. तर भाताची ८३.१० टक्के क्षेत्रावर लागण झाली असून, सर्वाधिक पेरणी सोयाबीनची ११०.८६ टक्के क्षेत्रावर झालीय. तसेच मका ८६, भुईमूग ८२, तूर पिकाची ६७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील खरिपाच्या एकूण सर्वसाधारण क्षेत्राच्या २ लाख ९२ हजार ५३३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.फलटण, माणमध्ये बाजरी क्षेत्र वाढले...जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात खरीप हंगाम घेण्यात येतो. तर प्रत्येक तालुक्यातील पीक पद्धतीही वेगवेगळी आहे. जिल्ह्यातील पेरणी ९३ टक्के झाली असून, यामध्ये फलटण आणि माण तालुक्यांत सर्वाधिक पेरणी क्षेत्र आहे.

फलटण तालुक्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या ११९.१३ तर माणमध्ये ११२.९८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. फलटणमध्ये बाजरी, मका, सोयाबीन क्षेत्रांमध्ये वाढ झालीय. तर माणमध्ये बाजरीचे क्षेत्र वाढलेले आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीSatara areaसातारा परिसरAgriculture Sectorशेती क्षेत्र