शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
2
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
3
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
4
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
5
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
6
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
7
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
8
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
9
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
10
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
11
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
12
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
13
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
14
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
15
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
16
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
17
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
18
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
19
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
20
GenZमध्ये महाराष्ट्र सरकारची कार्यशैली लोकप्रिय; ६७% तरुणाईला देवेंद्र फडणवीसांवर 'विश्वास'
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सोयाबीन क्षेत्रात वाढ, खरीप पेरणी पूर्णत्वाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 16:33 IST

सातारा जिल्ह्यात यावर्षी वेळेत पाऊस सुरू झाल्यामुळे खरीप हंगामातील पेरणी ९३ टक्के झाली आहे. तर गतवर्षी याच दिवसात ही पेरणी ७७ टक्क्यांवर होती. दरम्यान, यंदा बाजरीची पेरणी ९९ टक्के झाली असून, सोयाबीनचे क्षेत्र वाढल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात यंदा सोयाबीन क्षेत्र १११ टक्क्यापर्यंत गेले आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यातील सोयाबीन क्षेत्रात वाढ, खरीप पेरणी पूर्णत्वाकडे

सातारा : जिल्ह्यात यावर्षी वेळेत पाऊस सुरू झाल्यामुळे खरीप हंगामातील पेरणी ९३ टक्के झाली आहे. तर गतवर्षी याच दिवसात ही पेरणी ७७ टक्क्यांवर होती. दरम्यान, यंदा बाजरीची पेरणी ९९ टक्के झाली असून, सोयाबीनचे क्षेत्र वाढल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात यंदा सोयाबीन क्षेत्र १११ टक्क्यापर्यंत गेले आहे.जिल्ह्यात यावर्षी वळवाचा पाऊस मोठा झाला नसलातरी मान्सूनच्या पावसाने वेळेत तसेच चांगली सुरुवात केली. त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्यांना वेग आला होता. त्यामुळे मागीलवर्षीपेक्षा यंदा पेरणी अधिक झाली आहे. तर फलटण तालुक्यात आतापर्यंत ११९ टक्के पेरणी झाली आहे. माण तालुक्यात ११३, खटाव ८८.४९ तर कोरेगाव तालुक्यात ९९.१६ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.जिल्ह्यात खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख १६ हजार ७०१ हेक्टर आहे. यामध्ये बाजरीचे सर्वाधिक सर्वसाधारणपणे ६४ हजार ९ हेक्टर असून, त्यानंतर सोयाबीनचे ६३ हजार ७५४ आणि भाताचे ४९ हजार ८९ हेक्टर क्षेत्र गृहित धरले होते. तर खरिपात भुईमुगाचे सर्वसाधारणपणे ३८ हजार २२७ हेक्टरवर पीक घेण्यात येते. ज्वारी २४ हजार २०३, मका १८ हजार ५९८, नाचणीचे सर्वसाधारणपणे ५ हजार ८८७ हेक्टर आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात तूर, उडीद, मूग, इतर कडधान्ये, तृणधान्ये, तीळ, सूर्यफूल घेण्यात येतो.यावर्षी चांगला पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पेरणीने वेग घेतला होता. जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास ९३ टक्के पेरणी झाली आहे. यामध्ये ज्वारीची ६८ टक्के पेरणी झाली. तर भाताची ८३.१० टक्के क्षेत्रावर लागण झाली असून, सर्वाधिक पेरणी सोयाबीनची ११०.८६ टक्के क्षेत्रावर झालीय. तसेच मका ८६, भुईमूग ८२, तूर पिकाची ६७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील खरिपाच्या एकूण सर्वसाधारण क्षेत्राच्या २ लाख ९२ हजार ५३३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.फलटण, माणमध्ये बाजरी क्षेत्र वाढले...जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात खरीप हंगाम घेण्यात येतो. तर प्रत्येक तालुक्यातील पीक पद्धतीही वेगवेगळी आहे. जिल्ह्यातील पेरणी ९३ टक्के झाली असून, यामध्ये फलटण आणि माण तालुक्यांत सर्वाधिक पेरणी क्षेत्र आहे.

फलटण तालुक्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या ११९.१३ तर माणमध्ये ११२.९८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. फलटणमध्ये बाजरी, मका, सोयाबीन क्षेत्रांमध्ये वाढ झालीय. तर माणमध्ये बाजरीचे क्षेत्र वाढलेले आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीSatara areaसातारा परिसरAgriculture Sectorशेती क्षेत्र