शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
7
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
8
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
9
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
10
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
11
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
12
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
13
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
14
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
15
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
16
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
17
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
18
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
19
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
20
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत

आशादायक! सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागात पाणी पातळीत वाढ, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 18:07 IST

जलसंधारणाची किमया दिसून आली

नितीन काळेलसातारा : जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी-अधिक होणे आणि पाणी उपसा वाढल्याने भूजल पातळीत घट होत चालली आहे. जानेवारीतील तपासणीतच पाटण आणि महाबळेश्वर या अतिवृष्टीच्या तालुक्यांतच पाणीपातळीत घट झाली आहे, तर दुसरीकडे आशादायक बाब म्हणजे माण, खटाव, कोरेगाव या दुष्काळी तालुक्यांतील पातळीत वाढ झाल्यामुळे जलसंधारणाची किमया दिसून आली आहे. तरीही पाणी उपशामुळे संकट ओढवू शकते.जिल्ह्यातील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वतीने जिल्ह्यात निश्चित केलेल्या विहिरींची पाणीपातळी मोजण्यात येते. त्यासाठी दरवर्षी जानेवारी, मार्च, मे आणि सप्टेंबर महिन्यांत याची तपासणी होते. जिल्ह्यात एकूण निरीक्षण विहिरींची संख्या १०६ आहे. यावर्षीही जानेवारी महिन्यात या निरीक्षण विहिरींची पाणीपातळी तपासण्यात आली. यामध्ये मागील पाच वर्षांच्या तुलनेत एकूण ५० विहिरींच्या पाणीपातळीत घट झाल्याचे समोर आले. यामध्ये कऱ्हाड तालुक्यात ७, खंडाळा २, खटाव ४, कोरेगाव तालुका ४, माण ६, महाबळेश्वर तालुका २, पाटण ७, फलटण तालुका ८, सातारा ५ आणि वाई तालुक्यातील ५ निरीक्षण विहिरींत घट आढळली. यामध्ये जावळी तालुक्यात मात्र विहिरीत घट आढळून आलेली नाही.गेल्यावर्षीचा विचार करता यंदा भूजल पातळी आणखी खालावल्याचे दिसून आले. गेल्यावर्षी जानेवारी महिन्यातील नोंदीनुसार फक्त ४१ विहिरींत घट आढळली होती. यामध्ये फलटण तालुक्यातील सर्वाधिक १० निरीक्षण विहिरींचा समावेश होता, तर यानंतर पाटण आणि खटाव, कऱ्हाड तालुक्यांचा समावेश होता. यंदा घट होणाऱ्या विहिरींची संख्या वाढली आहे.

खटावमध्ये सर्वांत वर पाणीजिल्ह्यात ११ तालुके आहेत. जानेवारीत तपासणी केल्यानंतर खटाव तालुक्यात भूजल पातळीत पाच वर्षांच्या तुलनेत ०.७३ मीटरने वाढ झाल्याचे दिसून आले. माण ताुलक्यात ०.५५ मीटरने वाढ आहे. तसेच वाईत ०.०६, कोरेगाव तालुका ०.३६, खंडाळ्यात ०.०६ मीटरने भूजल पातळीत वाढ झाल्याचे दिसून आले.

कोणत्या तालुक्याची भूजल पातळी किती (मीटरमध्ये)तालुका -निरीक्षण विहिरी -जानेवारी पातळी - २०२२ मधीलजावळी - ०१ - ०.१० -  ०.१४कऱ्हाड -१५  - ०.०५ - ०.४२खंडाळा -०५ - ०.०६ - ०.२२खटाव -१७ - ०.७३ -  १.०२कोरेगाव - ०९ - ०.३६  -०.७०माण -१६ - ०.५५ - ०.५८महाबळेश्वर -०३ - ०.२३ - ०.१२पाटण - १० - ०.५७ - ०.०७फलटण - १२ - ०.०४ - ०.८५सातारा - १० - ०.०३ - ०.५५वाई  - ०८ - ०.०६  - ०.९६वाढ दिसते, पण तुलनेत पातळी कमी

जिल्ह्यातील माण, खटावसह काही तालुक्यांत पाच वर्षांच्या तुलनेत पाणीपातळीत वाढ दिसून येत आहे. ही वाढ वाॅटर कपमधील कामे तसेच जलसंधारणामुळे झालेली आहेत. मात्र, पिके आणि फळबागांसाठी आज मोठ्या प्रमाणात पाणी उपसा होत आहे. यामुळे पाणीपातळी वाढत असल्याचे दिसले तरी त्यामध्ये हळूहळू उतार येत चालला आहे. हे मागील तीन वर्षांच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.

जिल्ह्यातील निरीक्षण विहिरींतील भूजल पातळीची तपासणी जानेवारी महिन्यात करण्यात आली. यामध्ये ५० विहिरींत घट, तर ५६ मध्ये वाढ दिसली. तसेच तालुक्यांच्या विचार करता पाटण आणि महाबळेश्वरमध्ये घट आहे. सरासरी पर्जन्यमान कमी असल्याने या दोन तालुक्यांत अशी परिस्थिती असू शकते. - डब्लू. जे. बनसोडे, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी