शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

कोयना धरणात चार दिवसांत अडीच टीएमसी पाणीसाठा वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 14:21 IST

गेल्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली. पूर्व दुष्काळी भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांत काही ठिकाणी पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीला सुरुवात केली. तर काही शेतकऱ्यांनी पाऊस पडेल या आशेवर पेरणी उरकली आहे.

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस अजून कमीच असून, मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनाला ७४, नवजा ११८ आणि महाबळेश्वरला १२९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयना धरणात चार दिवसांत अडीच टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.

जिल्ह्यात जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून दाखल झाला. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. पण, पावसात जोर नव्हता. काही वेळा पावसाने दडीही मारली. यामुळे शेतकऱ्यांत चिंता निर्माण झाली होती. तसेच पेरणीची कामेही खोळंबलेली. मात्र, गेल्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली. पूर्व दुष्काळी भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांत काही ठिकाणी पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीला सुरुवात केली. तर काही शेतकऱ्यांनी पाऊस पडेल या आशेवर पेरणी उरकली आहे.

त्याचबरोबर पश्चिम भाग हा पावसाचा. पण, गेल्या वर्षीच्या तुलनेत पश्चिमेकडे पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. त्यामुळे पेरणीला अपेक्षित वेग आला नाही. त्याचबरोबर धरणातील पाणीसाठाही वाढला नाही. आता तीन दिवसांपासून चांगला पाऊस पडत असल्याने आशादायी चित्र निर्माण झाले आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागातील कोयना, नवजा, तापोळा, बामणोली, महाबळेश्वर परिसरात यंदा पाऊस कमी आहे. तीन दिवसांपासून पाऊस वाढू लागला आहे. यामुळे धरणसाठ्यात वाढ होत आहे. कोयना धरणात चार दिवसांत अडीच टीएमसीने पाणी वाढले आहे. १ जुलै रोजी कोयनेत १३.६० टीएमसी पाणीसाठा होता. तर १६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. मंगळवारी सकाळच्या सुमारास धरणात १६ टीएमसी पाणीसाठा झाला होता. तर धरणात १४ हजार क्युसेक वेगाने पाणी येत होते. पायथा वीजगृहातून १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. हे पाणी कोयना नदीपात्रात जात आहे.

दरम्यान, मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनाला ७४ तर १ जूनपासून ५२८ मिलीमीटर पाऊस पडला आहे. नवजा येथे १ जूनपासून ६५२ तर महाबळेश्वरला ६४३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम भागात पाऊस होत असल्याने भात लावणीलाही वेग येणार आहे.

साताऱ्यात ऊन अन् पाऊस...

 

 

सातारा शहरात चार दिवसांपासून पाऊस होत आहे. पण, पावसात जोर नाही. कधी ऊन तर काही वेळा ढगाळ वातावरण तयार होत आहे. त्याचबरोबर कधीतरी पाऊस पडतो. सातारा तालुक्यातही पाऊस जेमतेमच आहे. पेरणी आणि भात लावणीसाठी अजूनही मोठ्या प्रमाणात पावसाची आवश्यकता आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरणRainपाऊस