शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसभेची परवानगी न घेता दिली बेकायदेशीर परवानगी; ग्रामपंचायतीची मनमानी उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 19:30 IST

वेळे ग्रामपंचायतीत सत्ताधारी लोकांनी मनमानी कारभार चालवल्याने त्याचा तोटा सर्वच नागरिकांना होणार आहे. सत्तेचा सदुपयोग करण्याऐवजी येथे मात्र दुरुपयोग होताना दिसत आहे.

ठळक मुद्देसंबंधित कार्यालये काय कारवाई करतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.मासिक सभेने दिलेली परवानगी रद्द करून सर्व दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

वेळे येथे क्रेशर व दगडखाणीसाठी ग्रामपंचायतीने ग्रामसभेची परवानगी न घेता मासिक सभेतच या विषयाला मंजुरी दिली. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. सत्तेचा गैरफायदा घेत केलेले कृत्य आता चव्हाट्यावर येऊ पाहात आहे.

वेळे येथे गट नंबर 577, 649 व 656 या क्षेत्रात माजी जिल्हा परिषद सदस्य शशिकांत पवार व त्यांचा पुतण्या श्रीकांत पवार यांनी दगडखाण काढणे, क्रशिंग करणे व खडी वाहतूक करणे या नवीन व्यवसायासाठी आवश्यक त्या परवानग्या प्राप्त करण्यासाठी वेळे ग्रामपंचायतीकडे अर्ज केला होता. सदरचा अर्ज हा ग्रामसभेत मांडून त्याला ग्रामसभेची मंजूरी मिळविणे अपेक्षित असताना देखील तो मासिक सभेतच मंजूर करण्यात आल्याने ग्रामपंचायतीच्या कारभारावर लोकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली.

सदरचा अर्ज मासिक सभेत चर्चेला आला असता त्याला विरोध करणाऱ्या सदस्यांना डावलून मनमानी पद्धतीने सत्तेचा दुरुपयोग करत बेकायदेशीरपणे 21/05/2019 रोजीच्या मासिक सभेत  ठराव क्र. 17/4 ने संमत करून परवानगी देण्यात आली.

सदर खडी व्यवसायासाठी प्रथम ग्रामसभेची परवानगी प्राप्त करणे क्रमप्राप्त असते. मात्र शशिकांत पवार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीची सत्ता असल्याने सर्व नियम व कायद्याला धाब्यावर बसवून अनागोंदी कारभार करण्यात आल्याची चर्चा लोकांमध्ये सुरू आहे.

गट नंबर 577, 659 व 656 या क्षेत्रांभोवती सर्वत्र बागायती जमिनी असून अनेक विहिरीदेखील आहेत. तसेच सदरचे गट नंबर हे पाझर तलावालगत येतात. येथून नजीकच्या अंतरातच भिलारेवाडी या ठिकाणी मानवी वस्ती असून पाणी पुरवठा विहीर व शिवकालीन तळे आणि भिलारेवाडीचे दैवत पद्मावती देवीचे मंदिर पाझर तलावाला लागूनच आहे. अनेक विहिरीदेखील या परिसरात आहेत. बागायती क्षेत्र असल्याने या परिसरात शेतीबरोबरच फळबागाही आहेत. पाण्याचे तीन वेगवेगळे बंधारेही या परिसरात आहेत. वनसंपदा व पाणी असल्याने या परिसरात अनेक वन्यजीव नजरेस पडतात.

जर का येथे क्रेशर अथवा दगडखाण व्यवसाय चालू झाला तर हा संपूर्ण परिसर अत्यंत भकास पडणार आहे. त्यातून उडणाऱ्या धुळीमुळे मानवी आरोग्याला हानी पोचणार असून अनेक बागायती पिके व फळबागा यांचे अतिशय नुकसान होणार आहे. बागायती जमिनी निकामी होणार आहेत. मनुष्य व पशुपक्षी यांना खूप मोठा धोका निर्माण होणार आहे. थेंबे थेंबे साचविलेले पाणी दूषित होणार आहे. स्फोट घडविल्यामुळे मोठया आवाजाने अनेक पक्षी मरणार आहेत तर मानवी जीवनासही हानी पोहोचणार आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार असून प्रदूषणही खूप होणार आहे. मोठ्या स्फोटांमुळे हादरे बसून जमिनीतील अंतर्गत पाण्याचा प्रवाह बदलणार आहे. शेतकरी वर्ग आधीच संकटांचा सामना करत असताना त्यात आणखी भर पडणार आहे.  त्यामुळे या सर्व बाबींचा विचार होणे आवश्यक आहे.

वेळे ग्रामपंचायतीत सत्ताधारी लोकांनी मनमानी कारभार चालवल्याने त्याचा तोटा सर्वच नागरिकांना होणार आहे. सत्तेचा सदुपयोग करण्याऐवजी येथे मात्र दुरुपयोग होताना दिसत आहे. लोकांच्या मनात विश्वास संपादन करण्याऐवजी अविश्वास निर्माण होत आहे. नियम डावलून दिलेली परवानगी  नियमबाह्य असून ग्रामसभेची परवानगी नसताना मासिक सभेची मंजुरी कितपत योग्य आहे?

ग्रामपंचायत मनमानी कारभार करत आहे. बेकायदेशीररीत्या क्रेशर व दगडखाणीसाठी मासिक सभेने दिलेली परवानगी रद्द करून सर्व दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. सरपंच व सदस्यांना याचा जाब विचारण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन व तक्रार ग्रामस्थांच्या सहिनीशी वाईचे तहसीलदार, प्रांत, गटविकास अधिकारी, जिल्हाधिकारी व संबंधित कार्यालयांना वेळे व भिलारेवाडी येथील ग्रामस्थांनी केले आहे. त्यावर संबंधित कार्यालये काय कारवाई करतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgram panchayatग्राम पंचायत