शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Satara Crime: कलेढोणमध्ये गळा आवळून पत्नीचा खून, दोन तासात आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 15:49 IST

मायणी : खटाव तालुक्यातील कलेढोण येथील बेघर वस्तीमध्ये बुधवारी रात्री पतीनेच पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. ...

मायणी : खटाव तालुक्यातील कलेढोण येथील बेघर वस्तीमध्ये बुधवारी रात्री पतीनेच पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. घटना घडल्यापासून अवघ्या दोन तासांतच संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली. मंगल उर्फ सुमन सखाराम जाधव (वय ३९) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर सखाराम जाधव (वय ४५) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे.मुळगाव नसरापूर किल्ले मच्छिंद्र जवळ असलेले व सध्या कलेढोण येथील बेघर वस्तीमध्ये मंगल उर्फ सुमन सखाराम जाधव, पती सखाराम जाधव व दोन मुले असे वास्तव्यास आहेत. त्यातील लहान मुलगा मूळगावी येथे राहिला आहे तर मोठा २१ वर्षाचा मुलगा आई-वडिलांबरोबरच राहतो.बुधवारी रात्री मंगल सखाराम जाधव व पती सखाराम यांच्यामध्ये शाब्दिक भांडण सुरू होते. ‘तुला ठेवतच नाही, तुला मारूनच टाकतो’ अशा स्वरूपाचे शाब्दिक भांडण सुरू होते. मात्र गुरुवारी पहाटे साडेपाच सहाच्या सुमारास त्यांच्या घराचा दरवाजा उघडा होता. पहाटे फिरायला जाणाऱ्या मंगल जाधवच्या भावाने दरवाजा उघडा आहे म्हणून घरात पाहिले असता बहीण मंगल मृतावस्थेत पडली असल्याचे लक्षात आले.खून झाल्याची घटना घडली असल्याची माहिती पोलिस पाटील सचिन शेटे यांना मिळाली. त्यानंतर शेटे यांनी घटनास्थळी जाऊन प्राथमिक माहिती घेतल्यानंतर पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे व सहायक पोलिस निरीक्षक विक्रांत पाटील यांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच हे दोन्ही अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.या ठिकाणची परिस्थिती व परिसरातील माहिती घेऊन खुनाचा संशयित आरोपी पती सखाराम जाधव असावा, असा अंदाज बांधून त्यांनी तत्काळ संशयित आरोपीला पकडण्यासाठी हालचाली सुरू केल्या. दोन तासांच्या आतच त्याला सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथून पकडण्यात पोलिसांना यश आले. गुरुवारी दिवसभर या घटनेची माहिती घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस