शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

विद्यार्थ्यांनी उन्हात किती दिवस बसायचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:41 IST

औंध : फलटण-म्हासुर्णे रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून अगदी कासवाच्या गतीने सुरू आहे. औंध बसस्थानक परिसरातील रस्त्याचे काम गेल्या ...

औंध : फलटण-म्हासुर्णे रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून अगदी कासवाच्या गतीने सुरू आहे. औंध बसस्थानक परिसरातील रस्त्याचे काम गेल्या चार महिन्यांपासून रखडलेले आहे. रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने एसटी बसस्थानकात जात नाहीत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना औंधच्या चौकात बसची वाट बघत तीव्र उन्हात ताटकळत बसावे लागत आहे. शाळा सुरू असूनही रखडलेले काम पूर्ण करायचे नाव घेत नसल्याने ठेकेदाराला जाब विचारणारे कोण आहे का नाही? असा सवाल प्रवासी, ग्रामस्थांसह शाळकरी विद्यार्थ्यांना पडला आहे.

औंधमध्ये खबालवाडी रस्ता ते केदार चौक रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. छोटे सीडीवर्क आणि केदारेश्वर मंदिरानजीकच्या पुलाचे काम बरेच दिवस सुरू आहे. केदारेश्वर पुलाजवळ काढलेला पर्यायी रस्ता अतिशय अरुंद आहे. त्यामुळे अवजड वाहने आणि ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची येथे मोठी कसरत होते. बऱ्याचदा ट्रॅक्टर पलटी देखील झाले आहेत. तसेच नवीन बसस्थानक परिसरातील रस्ता रुंदीकरणासाठी उखडला आहे. रस्ता उखडल्याने बसस्थानकात एसटी जात नाही. त्यामुळे प्रवासी आणि शालेय विद्यार्थ्यांना चौकात गाडीसाठी थांबावे लागते. बस वेळेवर येत नाही आणि कुठेही सावली नसल्याने विद्यार्थ्यांना उन्हात बसची वाट पाहत बसावे लागते. तसेच रस्त्यावरून वाहनांची वर्दळ असल्याने धुळीचे लोट उडत आहेत. धुळीच्या त्रासाने दुकानदार आणि रस्त्यानजीकचे घरातील लोक वैतागले आहेत. गेल्या चार महिन्यांपासून रस्त्याचे काम रखडल्याने हे काम नेमके कधी पूर्ण होणार, याचे कोडे ग्रामस्थ, विद्यार्थी आणि प्रवाशांना पडले आहे.

(चौकट)

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

काम संथगतीने सुरू आहे. एसटी बसस्थानकात जात नाही, धुळीने दुकानदार हैराण झाले आहेत. अर्धवट कामाबद्दल ग्रामस्थांनी जाब कोणाला विचारला, तर ठेकेदार सापडत नाही, त्यामुळे अधिकारी तर कानाडोळा करीत नाहीत ना, याचे कोडे ग्रामस्थांना पडले आहे.

०८औंध

फोटो:

औंध बसस्थानकाजवळील रस्त्याचे काम बरेच दिवस रखडले आहे. काम पूर्ण कधी होणार याची प्रतीक्षा ग्रामस्थ, विद्यार्थी, व्यावसायिक यांना आहे.

(छाया : रशिद शेख)