शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

कोरोना महामारीत निराधारांची भटकंती, उदरनिवार्हासाठी रस्त्यावर धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 12:22 IST

कोरोना महामारीच्या काळात वृध्द लोकांनी रस्त्यावर उतरु नये, असे प्रशासन एका बाजूला सांगत असताना विविध योजनांचे लाभार्थी असलेले वृध्द, अपंग, विधवा आणि परितक्त्या महिलांना हयातीचे व उत्पन्नाचे दाखले देणे बंधनकारक आहे. हे दाखले दिले नसल्याने दोन महिन्यांपासून या योजनांतील लाभार्थ्यांना पेन्शन मिळालेली नाही.

ठळक मुद्देकोरोना महामारीत निराधारांची भटकंती, उदरनिवार्हासाठी रस्त्यावर धडपडपेन्शनधारक विधवा, परितक्त्या, अपंग, ज्येष्ठांना दाखल्यांची सक्ती

सागर गुजरसातारा : कोरोना महामारीच्या काळात वृध्द लोकांनी रस्त्यावर उतरु नये, असे प्रशासन एका बाजूला सांगत असताना विविध योजनांचे लाभार्थी असलेले वृध्द, अपंग, विधवा आणि परितक्त्या महिलांना हयातीचे व उत्पन्नाचे दाखले देणे बंधनकारक आहे. हे दाखले दिले नसल्याने दोन महिन्यांपासून या योजनांतील लाभार्थ्यांना पेन्शन मिळालेली नाही.केंद्र व राज्य सरकारकडून समाजातील विधवा, निराधार, परितक्त्या, वृध्द व दिव्यांगांना दिल्या जाणाऱ्या पेंन्शनच्या लाभार्थ्यांना बँकांनी विविध जाचक अटी लावल्या आहेत. या अटी रद्द करुन चालू व मागील दोन महिन्यांची पेन्शन बँक खात्यावर जमा करावी, अशी मागणी या लाभार्थ्यांनी केली आहे.कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग, विधवा, वृध्द लोक उत्पन्नाच्या व हयातीच्या दाखल्यासाठी तहसीलदार, तलाठी, महा-ई-सेवा या कार्यालयांमध्ये गर्दी करताना दिसत आहेत. या अबाल वृध्दांचे वय ६५ वर्षांच्या वर आहे. तसेच दिव्यांग बांधवांची प्रतिकार शक्ती कमी असल्याने त्यांना कोरोनाचा धोका लक्षात घेता त्यांना पेन्शन मिळविण्यासाठी जीव टांगणीला लावायला लागतो आहे.सातारा जिल्ह्यात दिवसागणिक ७०० ते १००० च्या घरात कोरोनाबाधित आढळून येत आहेत. वंचित, निराधार घटकांना मदत करण्याऐवजी त्यांना जीव मुठीत घेऊन शासनाच्या जाचक अटींची अंमलबजावणी करण्यासाठी बाहेर पडावे लागत आहे, ही निंदणीय व खेदाची बाब आहे. या पेन्शनवर अनेकांचा उदरनिर्वाह चालत आहे. तसेच प्रशासनाने जाचक अटी लादल्याने हा घटक वंचित राहत आहे.अशा पेन्शनधारकांना कोणतेही निर्बंध न लादता त्यांच्या सानुग्रह अनुदानाच्या रकमा लाभार्थ्यांना तत्काळ देण्याबाबत सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तहसीलदार व बँकांना सूचना देण्याचे आदेश द्यावेत. तसेच बँकांनी पेन्शनधारकांना मागील वषार्चे उत्पन्न, हयातीचे दाखले सादर केल्याशिवाय पेन्शन दिली जाणार नाही. अशी अट रद्द करावी.

महाराष्ट्रात कुठल्याही आमदाराचे मासिक वेतन थांबले नाही. शासकीय अधिकाऱ्यांचा पगार थांबलेला नाही. तो महिन्याकाठी बँक खात्यावर जमा होतोय. पण दिव्यांग निराधार, विधवा व वंचित घटकांना त्यांच्या हक्काची पेंन्शन गेल्या दोन महिन्यांपासून जमा झालेली नाही. प्रशासनाने यात लक्ष घालावे.- अमोल कारंडे,जिल्हाध्यक्ष प्रहार संघटना

सावळागोंधळ कसा दूर करायचा?कोरोना महामारीच्या काळात ६0 वर्षांवरील व्यक्ती तसेच आजारी लोकांनी घरात बसूनच राहावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने वारंवार केले जात आहे; परंतु प्रशासकीय नियमांचे कागदी घोडे नाचवणाºयांमुळे गरजवंतांना रस्त्यावर यावे लागत आहे. प्रशासनाचा सुरु असलेला सावळागोंधळ निराधारांच्या जीवाशी खेळ करणारा ठरताना दिसत आहे. याबाबत वरिष्ठांनी लक्ष घालणे गरजेचे आहे.कार्यालयात नको...महाईसेवा केंद्रात जावा..शासकीय कार्यालयांत गर्दी करु नका, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे; परंतु हयातीचे तसेच उत्पन्नाचे दाखले देण्यासाठी लाभार्थ्यांना रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय उरत नाही. शासकीय कार्यालयात न येता महाईसेवा केंद्रात जाण्याचा उफराटा सल्ला देखील दिला जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBanking Sectorबँकिंग क्षेत्र