शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

ऐतिहासिक महादरे तलाव अखेर तुडुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 18:51 IST

सातारा शहराच्या पश्चिम भागाला पाणीपुरवठा करणारा ऐतिहासिक महादरे तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. सातारा पालिकेने दोन वर्षांपूर्वी या तलावातून मोठ्या प्रमाणात गाळ बाहेर काढला आहे. त्यामुळे तलावाच्या पाणीसाठ्यात तब्बल ५० लाख लिटरने वाढ झालेली आहे.

ठळक मुद्देऐतिहासिक महादरे तलाव अखेर तुडुंब

सातारा : सातारा शहराच्या पश्चिम भागाला पाणीपुरवठा करणारा ऐतिहासिक महादरे तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. सातारा पालिकेने दोन वर्षांपूर्वी या तलावातून मोठ्या प्रमाणात गाळ बाहेर काढला आहे. त्यामुळे तलावाच्या पाणीसाठ्यात तब्बल ५० लाख लिटरने वाढ झालेली आहे.सातारा शहराच्या आसपास कोणतीही नदी अथवा मोठा तलाव नाही. पाणी असेल तरच एखाद्या गावाचा, शहराचा विकास होतो. ही बाब ओळखून सातारा शहर बसविणा?्या द्रष्ट्या राज्यकर्त्यांनी स्थापत्य तंत्राचा कल्पकतेने वापर करून शहरात पाणी खेळवले. ठिक ठिकाणी दगडांचे हौद आणि तलाव बांधले. यातील एक तलाव म्हणजे महादरे.प्रतापसिंह महाराज थोरले यांनी १८२९ रोजी महादरे तलावाची उभारणी केली. संपूर्ण दगडी बांधकाम असलेला हा तलाव स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. दोन दशकांच्या कालावधी प्रथमत: सातारा पालिका व जलसंपदा विभागाच्या वतीनेदोन वर्षांपूर्वी तलावातील गाळ बाहेर काढण्यात आला.

या तलावाची पाणी साठवण क्षमता सुमारे ४ कोटी ७२ लाख ५० हजार लिटर इतकी आहे. मात्र गाळामुळे केवळ ४ कोटी २२ लाख ५० हजार लिटर इतका पाणीसाठा होत होता. गाळ काढण्यात आल्याने यामध्ये पुन्हा ५० लाख लिटरने वाढ झाली आहे.

सातारा तालुक्यात सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसावर हा तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला आहे. व्यंकटपुरा पेठ येथील रहिवाशांना या तलावातून दैनंदिन वापरासाठी पाणी पुरवठा केला जात आहे.पालिकेने लक्ष द्यावे !महादरे तलाव व परिसर निसर्ग संपन्न आहे. त्यामुळे येथे भटकंतीसाठी येणा?्या नागरिकांची संख्या अधिक आहे. पालिकेने सुरक्षिततेसाठी तलावाला तारेचे कुंपण घातले असले तरी काही हौशी तरुण तलावाच्या कडेला बसूनच मद्यपान करत आहेत. असे प्रकार सातत्याने होत असून, एखादी विपरीत घटना घडण्यापूर्वी पालिकेने मद्यपींवर कारवाई करण्याबरोबरच याठिकाणी गस्त घालावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. 

 

टॅग्स :environmentपर्यावरणSatara areaसातारा परिसरwater scarcityपाणी टंचाई