शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

जरंडेश्वरच्या मालमत्तेवर टाच; ऊस गाळपाचे काय होणार..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 10:36 IST

Sugar factory Satara: महाराष्ट्र सहकारी बँकेच्या कथित हजारो कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जरंडेश्वर कारखान्याच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. मात्र, यंदाच्या गाळप हंगामासाठी कारखान्याकडे नोंद अंदाजे १४ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा तिढा कोण सोडवणार, हा प्रश्न निर्माण होणार आहे. तर कारखान्याची मालमत्ता जप्त झाल्यास काय? यामुळे कामगार व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे.

ठळक मुद्देजरंडेश्वरच्या मालमत्तेवर टाच; ऊस गाळपाचे काय होणार..!ईडीची कारवाई : १४ लाख मेट्रिक टन ऊस; शेतकरी अन् कामगारांतही चिंता

संजय कदमवाठार स्टेशन : महाराष्ट्र सहकारी बँकेच्या कथित हजारो कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जरंडेश्वर कारखान्याच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. मात्र, यंदाच्या गाळप हंगामासाठी कारखान्याकडे नोंद अंदाजे १४ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा तिढा कोण सोडवणार, हा प्रश्न निर्माण होणार आहे. तर कारखान्याची मालमत्ता जप्त झाल्यास काय? यामुळे कामगार व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे.कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील श्री जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची उभारणी १८ वर्षांच्या संघर्षातून माजी महसूलमंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी केली. राज्य बँकेतून कारखाना उभारणीसाठी कर्ज घेतलेले होते. इतर बँकांचेही आर्थिक सहकार्य मिळाले. १९९९ ला कारखान्याचा चाचणी गळीत हंगाम यशस्वी झाल्यानंतर डॉ. शालिनीताई पाटील यांचे बंधू अ‍ॅड. वसंतराव फाळके व उपाध्यक्ष संभाजीराव बर्गे यांच्या कार्यकाळात २००० ते २००४ असे चार गळीत हंगाम शेतकऱ्यांनी पाहिले.२००४ नंतर दुष्काळ व इतर अडचणींमुळे गळीत हंगाम पार पाडणे जिकिरीचे होत गेले. त्यामुळे कारखान्यावर कर्जाचा बोजा वाढू लागला. त्यावर मात करण्यासाठी संस्थापिका डॉ. शालिनीताई पाटील यांनी केएम शुगर, वारणा समूह व स्नेहा शुगर यांच्याकडे कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास दिला.

शिखर बँकेच्या कर्जाचे चार वार्षिक हप्ते फेडल्यानंतर पाचवा भरण्यास विलंब झाला. ३ कोटींचा हप्ता थकला म्हणून राज्य बँकेने कारखान्याला जप्तीची नोटीस पाठवून लिलाव मांडला. गुरू कमोडिटीजने ६५ कोटी ७५ लाखांत कारखाना लिलावात घेतला. तर १२ कोटी भागभांडवल असलेल्या २७ हजार सभासदांचे स्वप्न भंग पावले.शिखर बँकेच्या धनलक्ष्मी ठेव योजनेमध्ये कारखान्याची ८ कोटी ३४ लाख इतकी रक्कम होती. त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर राज्य बँकेने कारवाई केल्याने डॉ. शालिनीताई पाटील यांनी शिखर बँकेविरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान, अनेक घडामोडी होऊन २२ ऑगस्ट २०१९ रोजी खटल्याचा निकाल लागला. त्यानंतर डॉ. शालिनीताई पाटील यांनी ईडीच्या कार्यालयात जाऊन एफआयआर दाखल केला.आता कारखाना ताब्यात घेतलेल्यांची चौकशी सुरू झाली आहे. कारखान्याची मालमत्ता सध्या गुरू कमोडिटीजच्या नावावर आहे. ती जरंडेश्वर शुगर मिल, मेसर्स स्पार्कलिंग साइल प्रा. लि. यांना लीजवर देण्यात आली होती. आता ईडीच्या तपासातून अनपेक्षितपणे कोणती माहिती बाहेर पडणार, याकडे कोरेगाव तालुक्याबरोबरच जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.दरम्यान, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जरंडेश्वर कारखान्याच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. मात्र, यंदाच्या गाळप हंगामात कारखान्याकडे नोंद असलेल्या उसाच्या गाळपाचा तिढा कसा सुटणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.मागील वर्षी १४ लाख मेट्रिक टन गाळपगतवर्षी जिल्ह्यातील १५ कारखान्यांनी ९९ लाख मेट्रिक टन ऊस गाळप केले. यामध्ये सर्वाधिक १४ लाख मेट्रिक टन गाळप एकट्या जरंडेश्वर शुगर मिल्सने केले होते. दैनंदिन २५०० मेट्रिक टन क्षमता असलेला हा कारखाना अल्पावधीत १० हजार मेट्रिक टन गाळप करू लागला. गेल्या चार ते पाच हंगामात समाधानकारक दर दिल्याने कारखान्यावर शेतकऱ्यांचा विश्वास आहे. आता ईडीच्या कारवाईत जे होईल ते होईल; पण कारखाना बंद राहिला तर अंदाजे १४ लाख मेट्रिक टन ऊस कोठे जाणार, हा प्रश्न आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेSatara areaसातारा परिसर