शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

सातारा जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प निम्मे भरले; पावसाचा जोर वाढल्यास धरणातून विसर्ग वाढणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 13:57 IST

जून महिन्यात दमदार पाऊस : कोयनेला २४ तासांत ८७ मिलिमीटरची नोंद

सातारा : जिल्ह्यात जून महिन्यातच दमदार पाऊस झाल्याने पश्चिम भागातील प्रमुख सहा प्रकल्पांत ८१ टीएमसीहून अधिक पाणीसाठा निर्माण झाला आहे. बलकवडी वगळता इतर पाच धरणे ही ५१ ते ७३ टक्क्यांपर्यंत भरली आहेत. त्यामुळे पावसाचा जोर वाढल्यास धरणातून विसर्ग वाढणार आहे. तर २४ तासांत सर्वाधिक पाऊस कोयनानगरला ८७ मिलिमीटर झाला आहे.पावसाळ्याचा एक महिना संपला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीला फायदा झाला. तसेच छोटे पाणी प्रकल्पही ओसंडून वाहू लागले आहेत. तर पश्चिम भागात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडीसारखे मोठे प्रकल्प आहेत. या प्रकल्पातही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या आणि शेती पाण्याचीही चिंता मिटलेली आहे. त्यातच जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून पाऊस सुरूच आहे.

मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ८७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर नवजा येथे ६१ आणि महाबळेश्वरला ७७ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. त्यातच कोयना धरणक्षेत्रातही पावसाचा जोर कायम असल्याने पाणी आवक वाढली आहे. सकाळच्या सुमारास धरणात सुमारे ३० हजार क्युसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरण पाणीसाठा ५३.६९ टीएमसी झाला होता. ५१.०१ टक्केवारी पाणीसाठ्याची झालेली आहे. गतवर्षीपेक्षा यंदा धरणात अधिक पाणीसाठा झालेला आहे. त्याचबरोबर पश्चिम भागातील प्रमुख प्रकल्पातही मोठा पाणीसाठा आहे.धोम धरणात ८.२१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. हे धरण सुमारे ६१ टक्के भरलेले आहे. तर बलकवडी धरणात ३२ टक्केच साठा आहे. सध्या १.२९ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. या धरण क्षेत्रात पावसाचा जोर अजून कमी आहे. कण्हेर धरणातही ६.९२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण ६८ टक्क्यांवर भरलेले आहे. उरमोडी धरणातही ७३ टक्के साठा झाला असून ७.२५ टीएमसी धरण भरले आहे. पाटण तालुक्यातही पाऊस पडत आहे. यामुळे तारळी धरणात पाण्याची आवक होत आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास तारळी धरणात ३.९१ टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरण जवळपास ६७ टक्के भरलेले आहे.

धरणांची १४८ टीएमसी क्षमता..जिल्ह्यात अनेक पाणी प्रकल्प आहेत. पण, कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी हे सहा प्रकल्प प्रमुख आहेत. या धरणांची एकूण पाणीसाठवण क्षमता १४८ टीएमसीहून अधिक आहे. यावर्षी वेळेत आणि दमदार पाऊस झाला. त्यामुळे सध्या या सहाही धरणांत ८१.२७ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. त्यामुळे या धरणांत सध्या ५४ टक्क्यांहून अधिक साठा झाला आहे. पावसाळ्याचे तीन महिने बाकी आहेत. यामुळे या प्रमुख धरणांतून मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग होणार आहे.