शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे कोसळधार; कोयना धरणात ४८ हजार क्यूसेक वेगाने पाण्याची आवक

By नितीन काळेल | Updated: July 15, 2024 16:12 IST

नवजाला तब्बल २७४ मिलीमीटर पाऊस 

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात दोन दिवस कोसळधार राहिल्याने साेमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजाला तब्बल २७४ तर कोयनेला १८७ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. त्यामुळे कोयना धरणातही सुमारे ४८ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. परिणामी धरणसाठा ४०.४३ टीएमसी झाला. तर जिल्ह्यातील कऱ्हाड, पाटण, वाई, जावळी आणि सातारा तालुक्यातही दमदार पाऊस झाला आहे.जिल्ह्यात मागील सवा महिन्यापासून पाऊस सुरू झाला आहे. तरीही जुलै महिना अर्धा संपलातरी पावसाचा म्हणावासा जोर नाही. त्यामुळे धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी यासारख्या प्रमुख धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झालेला नाही. अजूनही ही धरणे तळालाच आहेत. यासाठी संततधार पावसाची गरज आहे. तर सध्या कोयना धरणातच बऱ्यापैकी पाणीसाठा झालेला आहे. कारण, धरणक्षेत्रात सतत पाऊस होत आहे. त्यातच शनिवार आणि रविवारी पश्चिम भागात कोसळधार होती. यामुळेही धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे.सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे तब्बल २७४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. हे या वर्षातील उच्चांकी पर्जन्यमान झाले. तसेच कोयनानगर येथेही १८७ मिलीमीटर पाऊस पडला. या तुलनेत महाबळेश्वरला कमी पर्जन्यमान झाले. २४ तासांत अवघा ९९ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर पश्चिम भागात आणि विशेषत: करुन कोयना धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस झाला. त्यामुळे कोयनेत सोमवारी सकाळच्या सुमारास ४८ हजार ६११ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ४०.४३ टीएमसी झालेला. पश्चिमेकडील या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झालेली आहे. तसेच ओढे-नाले भरुन वाहत आहेत. पूर्व दुष्काळी तालुक्यात अधून-मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत.

कोयनेचा पाणीसाठा ४० टीएमसीकडेकोयना धरणक्षेत्रात दमदार पाऊस पडू लागला आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने वाढू लागला आहे. रविवारी सकाळच्या सुमारास धरणात ३६.२३ टीएमसी पाणीसाठा झालेला. तर सोमवारी सकाळी पाणीसाठ्यात चार टीएमसीहून अधिक वाढ झाली. पाणीसाठा ४०.४३ टीएमसी झाला होता. जूनपासून आतापर्यंतची ही सर्वाधिक पाणीसाठा वाढ ठरली आहे. त्यामुळे लवकरच धरणातील पाणीसाठा ५० टीएमसीचा टप्पाही गाठणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरणMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान