शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात जोर’धार’, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला, जुना संगमनगर धक्का पूल पाण्याखाली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 13:23 IST

दरवाजे साडे तीन फुटांवर

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम असल्याने कोयना धरणातही आवक वाढली आहे. त्यामुळे धरणाचे सहा दरवाजे आता दीड वरुन साडे तीन फुटापर्यंत उचलण्यात आले आहेत. त्यामुळे दरवाजातून ९ हजार ३०० आणि पायथा वीजगृह २ हजार १०० असा एकूण ११ हजार ४०० क्यूसेक विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. यामुळे कोयना नदीपातळीत वाढ झाल्याने जुना संगमनगर धक्का पूल पाण्याखाली गेला आहे.जिल्ह्यात मागील एक महिन्यापासून पाऊस आहे. पश्चिम भागात तर एकसारखा पाऊस होत आहे. त्यातच धरणक्षेत्रात संततधार असल्याने पाणीसाठा वेगाने वाढत चालला आहे. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग करण्यात येत आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही तीन दिवसांपासून संततधार आहे. बुधवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयना येथे ४४ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तर नवजा येथे ८४ आणि महाबळेश्वरला १३१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढली. सकाळच्या सुमारास २६ हजार ४०४ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर ७७.२६ टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरणातील पाणीपातळी आणि मान्सूनचा उर्वरित कालावधी विचारात घेऊन कोयना धरण व्यवस्थापनाने दरवाजातून विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दुपारी १२ वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटावरुन साडे तीन फुटापर्यंत वर उचलण्यात आले आहेत. त्यामुळे ९ हजार ३०० क्यूसेक विसर्ग दरवाजातून होऊ लागला आहे. तर पायथा वीजगृहाची दोन्ही युनीट सुरूच आहेत. त्यातूनही २ हजार १०० क्यूसेक विसर्ग केला जातोय.यामुळे धरणातून एकूण ११ हजार ४०० क्यूसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडले जात आहे. या विसर्गामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. कोयना क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास आणखी विसर्ग करावा लागणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

प्रमुख प्रकल्प ७४ टक्के भरले; १२,३९३ क्यूसेक विसर्ग..जिल्ह्याच्या पश्चिम भागातच कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी हे मोठे पाणी प्रकल्प आहेत. या धरणात ११०.४६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. ही धरणे ७४.४७ टक्के भरलीत. पावसाळ्याचा विचार करुन पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी चार धरणांतून विसर्ग सुरू आहे. दुपारच्या सुमारास या धरणातून एकूण १२ हजार ३९३ क्यूसेक विसर्ग केला जात होता. यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे.