शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
3
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
4
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
5
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
6
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
7
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
8
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
9
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
10
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
11
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
12
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
13
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
14
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
15
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
16
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
17
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
18
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
19
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
20
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर; कोयना धरणात २४ तासांत साडेतीन टीएमसी'ने वाढ, पाणीसाठा पोहचला..

By नितीन काळेल | Updated: August 26, 2024 19:03 IST

गतवर्षीची पाणीपातळी मागे टाकली

सातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर असून, २४ तासांत नवजा येथे १५२, कोयनेला १४६ आणि महाबळेश्वरमध्ये १४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामुळे कोयना धरणातही पाण्याची आवक वाढली असून, सोमवारी सकाळच्या सुमारास पाणीसाठा ९६ टीएमसीजवळ पोहोचला. तसेच धरण ९१ टक्के भरले. परिणामी, धरणाने गतवर्षीची पाणीपातळी मागे टाकली आहे. तर धरणात २४ तासांत सुमारे साडेतीन टीएमसी साठा वाढला आहे.जिल्ह्यात यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाला सुरुवात झाली. जून आणि जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले राहिले. यामुळे खरीप हंगामातील पेरणी वेळेवर सुरू होऊन समाप्त झाली. यामध्ये जुलै महिन्याच्या मध्यानंतर पश्चिम भागातील कोयना, नवजा, महाबळेश्वर, कास, बामणोली, तापोळासह संपूर्ण कांदाटी खोऱ्यात अतिवृष्टी होती. सलग १२ दिवस पावसाने डोळा उघडला नव्हता. त्यामुळे तळ गाठलेल्या कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळीसह उरमोडी या प्रमुख प्रकल्पांत मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा झाला. त्यातच या प्रमुख प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता १४८ टीएमसीवर आहे. सध्या ही प्रमुख धरणे ९० टक्क्यांवर भरली आहेत. त्यातच मागील तीन दिवसांपासून पावसाचा पुन्हा जोर वाढला असल्याने धरणे भरण्याच्या स्थितीत आहेत.

सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांतील आकडेवारीनुसार जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस सुरू असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शेतशिवारात, भात खाचरात पाणी साचून राहिले आहे. तर २४ तासांत नवजा येथे १५२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. एक जूनपासून आतापर्यंत नवजा येथे तब्बल ५ हजार ४९१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तसेच कोयनेला ४ हजार ६३४ आणि महाबळेश्वर येथे ५ हजार २६५ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. त्याचबरोबर कोयना धरणात २४ तासांत ३.४१ टीएमसी पाणीसाठा वाढला. सोमवारी सकाळच्या सुमारास धरणात ९५.७९ टीएमसी पाणीसाठा झाला होता. ९१.०१ टक्केवारी साठ्याची आहे. आता धरण भरण्यासाठी ९ टीएमसीहून अधिक पाण्याची गरज आहे. तर धरणातील विसर्ग बंदच आहे.

पाऊस वाढला; धरणांतून पुन्हा विसर्ग..जिल्ह्याच्या पश्चिम भागात तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे प्रमुख धरणांतून पुन्हा पाणी सोडणे सुरू झाले आहे. परिणामी, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. सातारा तालुक्यातील कण्हेर धरणाच्या वीज गृहातून ४००, तर दरवाजातून दोन हजार क्युसेक विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. यामुळे वेण्णा नदीकाठावरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मोरणा गुरेघर मध्यम प्रकल्पातूनही विसर्ग सुरू करण्याबाबत नियोजन झाले आहे. वाई तालुक्यातील बलकवडी धरणातही पावसामुळे आवक वाढली. त्यामुळे रविवारी रात्रीपासूनच विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हे पाणी धोम धरणात जात असल्यामुळे कृष्णा नदीच्या काठावरील बलकवडी, परतवडी, दह्याट, बोरगावसह अन्य गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोयनेत गतवर्षी ९४ टीएमसी साठा..जिल्ह्यात गेल्यावर्षी अपुरे पर्जन्यमान झाले होते. वार्षिक सरासरीच्या ७० टक्क्यांच्या आसपासच पाऊस होता. यामुळे अनेक प्रमुख धरणे भरली नव्हती. यामध्ये कोयना धरणाचाही समावेश आहे. कोयनेत गतवर्षी ९४ टीएमसीवर साठा झाला होता. हा टप्पा आता पार झालेला आहे. पावसाचा जाेर पाहता, ऑगस्टअखेर धरण भरू शकते, असा अंदाज आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरण