शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात बुडालो'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
"प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
4
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
5
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
6
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
7
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
8
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
9
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
10
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
11
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना
12
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
13
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
14
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
15
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
16
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
17
मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ
18
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
19
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
20
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर; कोयना धरणात २४ तासांत साडेतीन टीएमसी'ने वाढ, पाणीसाठा पोहचला..

By नितीन काळेल | Updated: August 26, 2024 19:03 IST

गतवर्षीची पाणीपातळी मागे टाकली

सातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर असून, २४ तासांत नवजा येथे १५२, कोयनेला १४६ आणि महाबळेश्वरमध्ये १४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामुळे कोयना धरणातही पाण्याची आवक वाढली असून, सोमवारी सकाळच्या सुमारास पाणीसाठा ९६ टीएमसीजवळ पोहोचला. तसेच धरण ९१ टक्के भरले. परिणामी, धरणाने गतवर्षीची पाणीपातळी मागे टाकली आहे. तर धरणात २४ तासांत सुमारे साडेतीन टीएमसी साठा वाढला आहे.जिल्ह्यात यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाला सुरुवात झाली. जून आणि जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले राहिले. यामुळे खरीप हंगामातील पेरणी वेळेवर सुरू होऊन समाप्त झाली. यामध्ये जुलै महिन्याच्या मध्यानंतर पश्चिम भागातील कोयना, नवजा, महाबळेश्वर, कास, बामणोली, तापोळासह संपूर्ण कांदाटी खोऱ्यात अतिवृष्टी होती. सलग १२ दिवस पावसाने डोळा उघडला नव्हता. त्यामुळे तळ गाठलेल्या कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळीसह उरमोडी या प्रमुख प्रकल्पांत मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा झाला. त्यातच या प्रमुख प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता १४८ टीएमसीवर आहे. सध्या ही प्रमुख धरणे ९० टक्क्यांवर भरली आहेत. त्यातच मागील तीन दिवसांपासून पावसाचा पुन्हा जोर वाढला असल्याने धरणे भरण्याच्या स्थितीत आहेत.

सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांतील आकडेवारीनुसार जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस सुरू असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शेतशिवारात, भात खाचरात पाणी साचून राहिले आहे. तर २४ तासांत नवजा येथे १५२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. एक जूनपासून आतापर्यंत नवजा येथे तब्बल ५ हजार ४९१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तसेच कोयनेला ४ हजार ६३४ आणि महाबळेश्वर येथे ५ हजार २६५ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. त्याचबरोबर कोयना धरणात २४ तासांत ३.४१ टीएमसी पाणीसाठा वाढला. सोमवारी सकाळच्या सुमारास धरणात ९५.७९ टीएमसी पाणीसाठा झाला होता. ९१.०१ टक्केवारी साठ्याची आहे. आता धरण भरण्यासाठी ९ टीएमसीहून अधिक पाण्याची गरज आहे. तर धरणातील विसर्ग बंदच आहे.

पाऊस वाढला; धरणांतून पुन्हा विसर्ग..जिल्ह्याच्या पश्चिम भागात तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे प्रमुख धरणांतून पुन्हा पाणी सोडणे सुरू झाले आहे. परिणामी, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. सातारा तालुक्यातील कण्हेर धरणाच्या वीज गृहातून ४००, तर दरवाजातून दोन हजार क्युसेक विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. यामुळे वेण्णा नदीकाठावरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मोरणा गुरेघर मध्यम प्रकल्पातूनही विसर्ग सुरू करण्याबाबत नियोजन झाले आहे. वाई तालुक्यातील बलकवडी धरणातही पावसामुळे आवक वाढली. त्यामुळे रविवारी रात्रीपासूनच विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हे पाणी धोम धरणात जात असल्यामुळे कृष्णा नदीच्या काठावरील बलकवडी, परतवडी, दह्याट, बोरगावसह अन्य गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोयनेत गतवर्षी ९४ टीएमसी साठा..जिल्ह्यात गेल्यावर्षी अपुरे पर्जन्यमान झाले होते. वार्षिक सरासरीच्या ७० टक्क्यांच्या आसपासच पाऊस होता. यामुळे अनेक प्रमुख धरणे भरली नव्हती. यामध्ये कोयना धरणाचाही समावेश आहे. कोयनेत गतवर्षी ९४ टीएमसीवर साठा झाला होता. हा टप्पा आता पार झालेला आहे. पावसाचा जाेर पाहता, ऑगस्टअखेर धरण भरू शकते, असा अंदाज आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरण