शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

डोक्यात स्पर्धा परीक्षा, प्रवेश सायन्सला : साताऱ्यातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 23:12 IST

प्रगती जाधव-पाटील । सातारा : दहावीचे शालेय आयुष्य संपवून महाविद्यालयात भविष्यातील स्वप्ने रंगवणाºया विद्यार्थ्यांनी यंदाही विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राकडे ...

ठळक मुद्देसंरक्षण अन् कला क्षेत्राकडेही कल वाढतोय

प्रगती जाधव-पाटील ।सातारा : दहावीचे शालेय आयुष्य संपवून महाविद्यालयात भविष्यातील स्वप्ने रंगवणाºया विद्यार्थ्यांनी यंदाही विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राकडे जाण्याचा मार्ग चोखळला असल्याचे चित्र दिसत आहे. नोकरीची संधी आणि तेथील स्पर्धा लक्षात घेऊन उत्तम गुण मिळविणाऱ्यांच्या डोक्यात स्पर्धा परीक्षांचे उद्दिष्ट असले तरी प्रवेश मात्र विज्ञान शाखेकडे घेण्याचा कल दिसतोय.दहावीचा निकाल लागल्यानंतर आता महाविद्यालयीन प्रवेशाचे वेध विद्यार्थ्यांना लागले आहेत.

जिल्ह्यातील ७१४ माध्यमिक शाळेतील सुमारे ४२ हजार ९२० विद्यार्थ्यांनी ११५ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा दिली. यातील ४२ हजार ६३० विद्यार्थी परीक्षेस बसले आणि ३६ हजार ७६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्यातून पुन:प्रविष्ट विद्यार्थ्यांची नोंदणी १ हजार ११० झाली होती.

यंदाचा निकाल लक्षात घेता नव्वद टक्क्यांच्या वर गुण मिळविणाºया विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मुलांच्या डोक्यात स्पर्धा परीक्षांचे उद्दिष्ट असले तरी कुटुंबीयांचा कल मात्र विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेकडे आहे. ज्या विद्यार्थ्यांनी सत्तर ते ऐंशी टक्के गुण मिळविले आहेत त्यांनी वाणिज्य आणि विज्ञान या दोन पैकी एका शाखेकडे जाण्याचा विचार करत आहेत. तर सत्तर पेक्षा कमी गुण असलेली मुलं कला शाखेबरोबरच, आयटीआय, डिप्लोमा, हॉटेल मॅनेजमेंट यासारखे अल्पावधीचा कोर्स करून सेटल होण्याच्या विचारात आहेत.

विज्ञान शाखेचं मेरिट वाढणार..!गेल्या अनेक वर्षांपासून दहावीत ९० टक्के किंवा त्याहीपेक्षा अधिक गुण मिळविणारे विद्यार्थी थेट विज्ञान शाखेकडेच गेले आहेत. बारावीनंतर कोणी वैद्यकीय किंवा अभियांत्रिकीच्या वाटा चोखाळल्या आहेत. शहरात असलेली महाविद्यालये आणि यंदा ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येतील दरी मोठी आहे. त्यामुळे गतवर्षीपेक्षा विज्ञान शाखेचं मेरिट वाढणार आहे. यंदाही ९५ किंवा ९६ टक्क्यांपर्यंत मेरिट जाईल, असा कयास शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.कला शाखेकडे वाढतोय कल!स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अभ्यासक्रम आणि अभ्यासासाठी मिळणारा अमाप वेळ लक्षात घेऊन काहींनी विज्ञान आणि वाणिज्य शाखेकडे दुर्लक्ष करत कला शाखेचा मार्ग चोखाळला आहे. अकरावीपासूनच अभ्यासाची तयारी करणाऱ्या या हुशार विद्यार्थ्यांनी कला शाखेकडे प्रवेश करण्याचे निश्चित केले असल्याने ९५ टक्के पडणारे विद्यार्थीही कला शाखेकडे वळण्याची शक्यता अधिक आहे. 

वाणिज्य शाखेला  यंदाही ‘अच्छे दिन’आर्थिक क्षेत्राशी संलग्न असलेल्या वाणिज्य शाखेकडे जाण्यास यंदाही विद्यार्थी इच्छुक आहेत. बँकेबरोबरच खासगी ठिकाणी उपलब्ध असलेल्या नोकरी, मनुष्यबळ, मार्केटिंग क्षेत्रात असणाºया वाढत्या संधी यांचा उहापोह करून काही विद्यार्थ्यांनी ठरवून वाणिज्य शाखेची निवड केली आहे.

माझ्या मुलीला ९२ टक्के गुण मिळाले आहेत. स्पर्धा परीक्षांच्या उद्दिष्टाबरोबरच मेडिकलचाही पर्याय तिच्यापुढे खुला आहे. त्यांच्या आवडीचे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना बळ द्यायला प्लॅन बी तयार असायला पाहिजे. त्यानुसार आम्ही तिच्या मताचा आदर ठेवून निर्णय घेत आहोत.- दशरथ जाधव, पालक, सातारा

 

अकरावीत प्रवेश घेताना विद्यार्थ्यांपेक्षा पालक अधिक जागृत असतात. विद्यार्थ्यांचा कल लक्षात घेऊन त्यांचे समुपदेशन आणि ते निवडत असलेल्या शाखेविषयी पुरेपूर माहिती देऊन मगच विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करावा. यामुळे अभ्यास करताना विद्यार्थी न आवडीच्या विषयाचा ताण घेत नाहीत.- विशाल ढाणे, शिक्षक, सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरEducationशिक्षण