शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

साताऱ्यात रुजतंय ‘गन कल्चर’ : परवाना नाकारल्याने बेकायदा शस्त्र विक्रीचा धंदा तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 18:09 IST

सातारा : अलीकडच्या काळात गरजेपेक्षा अनेकजण प्रतिष्ठा म्हणूनही शस्त्र बाळगत आहेत. त्यामुळेच प्रशासनाकडे शस्त्र परवान्याच्या अर्जांचा पाऊस पडत आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने नवीन शस्त्र परवाना देताना कठोर धोरण अवलंबले आहे. पोलिसांच्या अहवालानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने शस्त्र परवाना देण्यास नकार दिला आहे. शस्त्र परवाना नाकारण्यात आल्याने उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यातून १० ते ...

ठळक मुद्देप्रशासनाकडे अर्जांचा पाऊस इथून पुढे देशातील सर्व बंदूकधाºयांवर गृह विभागाचा आॅनलाईन वॉच असणार आहे.

सातारा : अलीकडच्या काळात गरजेपेक्षा अनेकजण प्रतिष्ठा म्हणूनही शस्त्र बाळगत आहेत. त्यामुळेच प्रशासनाकडे शस्त्र परवान्याच्या अर्जांचा पाऊस पडत आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने नवीन शस्त्र परवाना देताना कठोर धोरण अवलंबले आहे. पोलिसांच्या अहवालानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने शस्त्र परवाना देण्यास नकार दिला आहे. शस्त्र परवाना नाकारण्यात आल्याने उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यातून १० ते ४० हजार रुपयांमध्ये गावठी कट्टा सहज उपलब्ध होत असल्याने बेकायदा शस्त्र विक्री आणि बाळगणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

गेल्या काही वर्षांपासून स्वसंरक्षणापेक्षा प्रतिष्ठेसाठी शस्त्र बाळगणाºयांची संख्या वाढली आहे. त्यामुळेच शस्त्र परवान्यासाठी येणाºया अर्जांची संख्याही वाढली आहे. यापूर्वी जिल्'ात बँका, पतसंस्था, खासगी संस्था तसेच शेतवस्तीवर राहणारे, ज्यांच्यावर यापूर्वी हल्ला झाला अशा व्यक्तींनी स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाने घेतलेले आहेत. सद्य:स्थितीत सातारा जिल्'ात एकूण ३ हजार ७१३ जणांकडे शस्त्र परवाना आहे.

जिल्हाधिकाºयांकडे गेल्या काही दिवसांत एकूण ८७ नवीन अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांवर जिल्हाधिकाºयांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून संबंधित व्यक्तींबाबतचा अहवाल मागविला होता. पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून नुकताच ५० अर्जदारांविषयीचा अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये शेतकरी, बँक आणि पेट्रोल पंपचालकांचा समावेश आहे. आणखी ३७ अर्जदारांबाबतचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही.

जिल्'ात आतापर्यंत शेतवस्तीवर राहणारे अनेक शेतकरी, व्यापारी, अधिकारी तसेच राजकीय नेत्यांनी शस्त्र परवाने घेतलेले आहेत. या परवान्यांच्या आधारे त्यांनी पिस्टल, रिव्हॉल्व्हर, बारा बोअर बंदूक, रायफल आदी प्रकारच्या बंदुका खरेदी केलेल्या आहेत. अलीकडच्या काळात काही वाळूमाफियांनीही शस्त्र परवाने घेतलेले आहेत. मात्र, पोलीस अहवालानुसार जिल्हाधिकाºयांनी परवाने नाकारले. त्यांनी बिहार व उत्तरप्रदेशमधून अवघ्या दहा हजार रुपयांपासून ५० हजार रुपयांपर्यंत गावठी कट्टा मिळवला आहे. गेल्या महिन्यात सातारा पोलिसांनी तब्बल विविध ठिकाणी आठ पिस्तुले व जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. त्यामुळे जिल्'ात मोठ्या प्रमाणात शस्त्र विक्रीचा व्यवसाय जोमात असल्याचे निदर्शनास येत असून, त्यांना रोखण्याचे मोठे आव्हान पोलीस प्रशासनासमोर आहे.शस्त्रावर पोलिसांचा वॉचदेशातील शस्त्र परवानाधारक व्यक्तींची माहिती संगणकावरील एका क्लिकवर मिळणार आहे. यासाठी शासनाने इंडियन ऐलिस सॉफ्टवेअर बनवले असून, यामुळे शस्त्र परवान्याचे सर्व व्यवहार पारदर्शक पद्धतीने होणार आहेत. तसेच एखाद्या गुन्'ात वापरलेल्या शस्त्रावरून तपास करताना पोलिसांनाही या प्रणालीची मदत होणार आहे. त्यामुळे इथून पुढे देशातील सर्व बंदूकधाºयांवर गृह विभागाचा आॅनलाईन वॉच असणार आहे.निवडणूक काळात शस्त्रे जप्तनिवडणुकीच्या काळात सर्व शस्त्रे आचारसंहिता कालावधी संपेपर्यंत सरकारी ताब्यात असतात. ही शस्त्रे पोलिसांकडे सुरक्षित ठेवली जातात. बँकेच्या सुरक्षिततेसाठी कार्यरत असणाºया सुरक्षा रक्षकांना मात्र बँकअधिकाºयांच्या पत्रानुसार सवलत दिली जाते. त्यांची शस्त्रे जप्त केली जात नाहीत.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPolice Stationपोलीस ठाणे