शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
3
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
4
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
5
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
6
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
7
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
8
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
9
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
10
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
11
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
12
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
13
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
14
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
15
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
16
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
17
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
18
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
19
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
20
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार

अगोदर भाषण, नंतर उद्घाटन; मंत्री जयकुमार गोरे यांना उशीर झाल्याने पालकमंत्री शंभूराज देसाई ताटकळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 18:35 IST

सीईओंच्या कामाचे काैतुक..

सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या सभागृहात ग्रामविकास विभागाचा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यक्रम कार्यशाळेला पालकमंत्रीशंभूराज देसाई हे वेळेत उपस्थित झाले. पण, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना वेळ लागला. त्यामुळे पालकमंत्र्यांनी प्रथम भाषण करून गोरे यांच्या अभियानाला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मंत्री गोरे आल्यावर दोघांनी मिळून कार्यशाळेचे उद्घाटन केले. यानंतरच पालकमंत्री पुढील कार्यक्रमासाठी निघून गेले.राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू होत आहे. यासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा सातारा जिल्हा परिषदेच्या दिवंगत यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात होती. या कार्यशाळेला जिल्ह्यातून शेकडो सरपंच आलेले. पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन आणि इतर अधिकारीही उपस्थित होते.कार्यशाळेच्या ठिकाणी पालकमंत्री अगोदर आले होते. मात्र, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना मुंबईवरून येणार असल्याने उशीर झाला. त्यामुळे उद्घाटनाचा कार्यक्रम पुढे गेला. यादरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचे मार्गदर्शन झाले. त्यानंतर पालकमंत्री बोलण्यासाठी उठले. कार्यक्रम ग्रामविकास विभागाचा आहे. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून अभियान सुरू आहे. ते आले की आपण दीपप्रज्वलन करून उद्घाटन करू. मला पुढील कार्यक्रम असल्याने आता बोलतो असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच त्यांनी उपस्थित सरपंच आणि लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन केले.पालकमंत्री देसाई यांचे मार्गदर्शन सुरू असतानाच ग्रामविकास मंत्री गोरे यांची एंट्री झाली. त्यानंतर पालकमंत्री आणि मंत्री गोरे यांनी एकत्रित दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन केले. तसेच घडीपत्रिकेचे विमोचन केले. पर्यावरणपूरक गणेशोत्सव पार पाडणाऱ्या गावांचाही दोघांच्या हस्ते सन्मान झाला. यानंतर पालकमंत्री देसाई पुढील कार्यक्रमासाठी निघून गेले, तर यानंतर मंत्री गोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

सीईओंच्या कामाचे काैतुक..कार्यशाळेत पालकमंत्री देसाई यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या कामाचे काैतुक केले. तसेच सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेतल्यास जिल्हा स्वच्छ होईल हे सांगण्यासही ते विसरले नाहीत. तर मंत्री गोरे यांनीही मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन आणि त्यांचे पती कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी या दोघांनी सातारा आणि कोल्हापूर जिल्हे अभियानात राज्यात पुढे राहतील असा शब्द दिला आहे, असे सांगितले. तसेच नागराजन यांचे कामाबद्दल काैतुकही केले.