शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

विकासाच्या कुऱ्हाडीचा घाव झाडांच्या मुळावर, सातारा-कास रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 13:12 IST

सातारा-कास रस्ता रुंदीकरणासाठी रोड लगतच्या हजारो झाडांची कत्तल करण्यास प्रारंभ झाला असून, निसर्गसंपदेने नटलेल्या डोंगर माथ्यावरील कास रस्त्याचे निसर्गसौंदर्य नाहीसे होऊ लागले असल्याने मार्ग बोडका व भकास दिसू लागला आहे.

ठळक मुद्दे विकासाच्या कुऱ्हाडीचा घाव झाडांच्या मुळावर, सातारा-कास रस्तागळ्यात मृत्यूचे ताईत अडकवून दोन वर्षांपासून हजारो झाडांचा गुदमरतोय श्वास !

पेट्री : सातारा-कास रस्ता रुंदीकरणासाठी रोड लगतच्या हजारो झाडांची कत्तल करण्यास प्रारंभ झाला असून, निसर्गसंपदेने नटलेल्या डोंगर माथ्यावरील कास रस्त्याचे निसर्गसौंदर्य नाहीसे होऊ लागले असल्याने मार्ग बोडका व भकास दिसू लागला आहे.जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळांचे सौंदर्य वाढविणारी येथील हिरवीगार दाट झाडी, तसेच कित्येक वर्षे पर्यटकांना सुखावह स्पर्श देत विविध प्रकारच्या आठवणी जोपासणारी येथील मोठमोठी वृक्षे. शहराच्या पश्चिमेकडील निसर्गसौंदर्य अबाधित ठेवणारी या मार्गावरील हजारोंच्या संख्येची वनसंपदा धोक्यात येण्याच्या मार्गावर आहे.या वनांमध्ये नीलगिरी, जांभुळ, आंबा, फणस यासारख्या विविध प्रकारच्या झाडांचा समावेश आहे.

गत दोन वर्षांपासून गळ्यात मृत्यूचे ताईत टांगलेली हजारोंच्या संख्येने असलेल्या वनसंपदेच्या मुळावर विकासाच्या कुऱ्हाडीचा घाव बसला जात असल्याने येथील घनदाट, दाट वृक्षाचे रुपांतर शुष्क वाळवंटात तर होणार नाही ना? अशी साशंकता पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमीतून व्यक्त होऊ लागली आहे.साताऱ्याच्या पश्चिमेकडे बोगदा ते कास येथील रस्त्याचे रुंदीकरणात बोगदा ते कास रस्त्यालगत तसेच कास तलावाच्या परिसरातील विविध प्रकारच्या मोठमोठ्या झाडांच्यावर गडांतर येऊन या झाडांवर गत दोन वर्षांपूर्वी उन्हाळ्यात पिवळ्या रंगांच्या लोखंडी पट्ट्या मारून साडेतीन हजारांपर्यंत क्रमांक दिले होते. यामुळे विकासाचा घाव कधी झाडांच्या मुळावर पडेल याची शाश्वती नाही.

रस्त्याचे काम असो अथवा विजेचे खांब रोवून तार ओढण्याचे काम. अशा अनेकविध प्रकारची कोणतीही कामे करायची म्हटले की, प्रथम नजर वळते ती झाडांवर. झाडांचा कधीही अडथळा होत नाही तर झाडेच पर्यावरण असंतुलनातील अनेकविध अडथळे बाजूला करतात. मग आत्ता या झाडांचे आयुष्य संपुष्टात येणार असेल तर या बदलात नव्याने वृक्षारोपण करण्याची पर्यायी व्यवस्था संबंधित खाते काय करणार? अथवा काय केली आहे.विनाशाची टांगती तलवार...पर्यटनस्थळाचा विकास तसेच नागरिकांच्या मुबलक पाण्याचा प्रश्न सोडवला जात असताना येथील कित्येक वर्षापासूनच्या झाडांवर आत्ता विनाशाची टांगती तलवार पडली जाण्याची शक्यता दिसू लागली आहे. पर्यावरण समतोल राखत असताना नियम असे सांगतो की, एक झाड नष्ट झाले तर त्याबदलात दहा झाडांचे वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन होणे गरजेचे आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणSatara areaसातारा परिसर