शहरं
Join us  
Trending Stories
1
"पक्षासाठी केसेस अंगावर, तिकीट मात्र दुसऱ्यांना"; संभाजीनगरात भाजप पदाधिकाऱ्यांचा राडा
2
काहीतरी मोठं घडणार! चीनची आक्रमक हालचाल, तैवानला सैन्याने वेढा घातला; विमानांची उड्डाणेही रद्द
3
Municipal Election 2026: सुरुवात झाली! अखेरच्या दिवशी पुणे, नाशिकसह या महापालिकांत भाजप-शिवसेनेची युती तुटली...
4
फोटोग्राफर, प्रोड्यूसर, नॅशनल लेव्हल फुटबॉलपटू... कोण आहे प्रियंका गांधींची होणारी सून?
5
विरोधकांच्या एकीला तडे; वसई-विरारमध्ये उद्धवसेना स्वबळावर, महायुतीतील मित्रपक्षाचा पाठिंबा
6
बच्चू कडूंच्या प्रहारची उद्धवसेनेसोबत युती, पण उमेदवार लढणार मशाल चिन्हावर!
7
Travel : चला, प्रेमाच्या शहरात! आयफेल टॉवर अन् सीन नदीच्या काठावर फिरण्यासाठी असा करा परफेक्ट प्लॅन
8
मिशन बंगाल; अमित शाहांनी रणनीती आखली, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ममता बॅनर्जींचा सामना करणार...
9
मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेसकडून ५६ उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध, अमराठी आणि मुस्लिम चेहऱ्यांना दिलं प्राधान्य   
10
२०२५ सरता सरता...! Google वर '67' सर्च करताच तुमची स्क्रीन थरथरू लागतेय? तुम्हीही करून पहा...
11
बाजारात एन्ट्री घेताच जोरदार आपटला 'हा' शेअर, पहिल्याच दिवशी २४% नं घसरला, गुंतवणूकदारांना मोठा झटका
12
"सूर्यकुमार यादव मला खूप मेसेज करायचा, पण आता...", बोल्ड कंटेटमुळे चर्चेत असलेल्या अभिनेत्रीचा खळबळजनक दावा
13
महायुतीत फूट! धुळ्यातही भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेना-अजित पवारांची NCP युतीत लढणार
14
Silver Price : चांदीचा ‘सिल्वर रिटर्न’! ऑक्टोबरची गुंतवणूक, डिसेंबरमध्ये ७२ हजारांचा फायदा; गणित समजून घ्या
15
'घरातील लोकांना तिकीट हवं होतं म्हणून युती तोडली!'; भाजपचा शिंदेसेनेवर पलटवार
16
"हा तर विश्वासघातच"; मित्रपक्षांनी 'झुलवत' ठेवल्याने रिपाई आक्रमक, रामदास आठवलेंनी दिला अल्टिमेटम
17
भाजपाचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी जुळले; शिंदेसेनेशी मात्र बिघडले! कोण किती जागा लढवणार?
18
LPG सबसिडीचे सूत्र बदलणार! अमेरिकेकडून गॅस आयातीमुळे केंद्र सरकार नवा निर्णय घेण्याच्या तयारीत
19
“कोणीही-कितीही सोडून जाऊ द्या, वसई-विरारमध्ये विजय आमचाच होणार”; हितेंद्र ठाकूरांचा एल्गार
20
प्रियंका गांधींच्या मुलाने गुपचुप उरकला साखरपुडा; 'ही' सुंदरी होणार वाड्रा कुटुंबाची सून...
Daily Top 2Weekly Top 5

विकासाच्या कुऱ्हाडीचा घाव झाडांच्या मुळावर, सातारा-कास रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 13:12 IST

सातारा-कास रस्ता रुंदीकरणासाठी रोड लगतच्या हजारो झाडांची कत्तल करण्यास प्रारंभ झाला असून, निसर्गसंपदेने नटलेल्या डोंगर माथ्यावरील कास रस्त्याचे निसर्गसौंदर्य नाहीसे होऊ लागले असल्याने मार्ग बोडका व भकास दिसू लागला आहे.

ठळक मुद्दे विकासाच्या कुऱ्हाडीचा घाव झाडांच्या मुळावर, सातारा-कास रस्तागळ्यात मृत्यूचे ताईत अडकवून दोन वर्षांपासून हजारो झाडांचा गुदमरतोय श्वास !

पेट्री : सातारा-कास रस्ता रुंदीकरणासाठी रोड लगतच्या हजारो झाडांची कत्तल करण्यास प्रारंभ झाला असून, निसर्गसंपदेने नटलेल्या डोंगर माथ्यावरील कास रस्त्याचे निसर्गसौंदर्य नाहीसे होऊ लागले असल्याने मार्ग बोडका व भकास दिसू लागला आहे.जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळांचे सौंदर्य वाढविणारी येथील हिरवीगार दाट झाडी, तसेच कित्येक वर्षे पर्यटकांना सुखावह स्पर्श देत विविध प्रकारच्या आठवणी जोपासणारी येथील मोठमोठी वृक्षे. शहराच्या पश्चिमेकडील निसर्गसौंदर्य अबाधित ठेवणारी या मार्गावरील हजारोंच्या संख्येची वनसंपदा धोक्यात येण्याच्या मार्गावर आहे.या वनांमध्ये नीलगिरी, जांभुळ, आंबा, फणस यासारख्या विविध प्रकारच्या झाडांचा समावेश आहे.

गत दोन वर्षांपासून गळ्यात मृत्यूचे ताईत टांगलेली हजारोंच्या संख्येने असलेल्या वनसंपदेच्या मुळावर विकासाच्या कुऱ्हाडीचा घाव बसला जात असल्याने येथील घनदाट, दाट वृक्षाचे रुपांतर शुष्क वाळवंटात तर होणार नाही ना? अशी साशंकता पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमीतून व्यक्त होऊ लागली आहे.साताऱ्याच्या पश्चिमेकडे बोगदा ते कास येथील रस्त्याचे रुंदीकरणात बोगदा ते कास रस्त्यालगत तसेच कास तलावाच्या परिसरातील विविध प्रकारच्या मोठमोठ्या झाडांच्यावर गडांतर येऊन या झाडांवर गत दोन वर्षांपूर्वी उन्हाळ्यात पिवळ्या रंगांच्या लोखंडी पट्ट्या मारून साडेतीन हजारांपर्यंत क्रमांक दिले होते. यामुळे विकासाचा घाव कधी झाडांच्या मुळावर पडेल याची शाश्वती नाही.

रस्त्याचे काम असो अथवा विजेचे खांब रोवून तार ओढण्याचे काम. अशा अनेकविध प्रकारची कोणतीही कामे करायची म्हटले की, प्रथम नजर वळते ती झाडांवर. झाडांचा कधीही अडथळा होत नाही तर झाडेच पर्यावरण असंतुलनातील अनेकविध अडथळे बाजूला करतात. मग आत्ता या झाडांचे आयुष्य संपुष्टात येणार असेल तर या बदलात नव्याने वृक्षारोपण करण्याची पर्यायी व्यवस्था संबंधित खाते काय करणार? अथवा काय केली आहे.विनाशाची टांगती तलवार...पर्यटनस्थळाचा विकास तसेच नागरिकांच्या मुबलक पाण्याचा प्रश्न सोडवला जात असताना येथील कित्येक वर्षापासूनच्या झाडांवर आत्ता विनाशाची टांगती तलवार पडली जाण्याची शक्यता दिसू लागली आहे. पर्यावरण समतोल राखत असताना नियम असे सांगतो की, एक झाड नष्ट झाले तर त्याबदलात दहा झाडांचे वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन होणे गरजेचे आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणSatara areaसातारा परिसर