शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने साखर उद्योगाचे स्वतंत्र धोरण ठरवावे : शंभूराज देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 17:32 IST

एफआरपीची रक्कम ठरविताना साखर कारखान्यांनी निर्माण केलेली सर्व साखर केंद्र व राज्य शासनाने खरेदी करावी व खरेदी केलेल्या साखरेच्या भावातून शेतकऱ्यांना एफआरपी निश्चीत करावी. राज्य शासनाने तरी राज्यातील साखर उद्योग वाचविण्याकरिता स्वतंत्र साखर धोरण ठरविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाई यांनी केले.

ठळक मुद्देसरकारने साखर उद्योगाचे स्वतंत्र धोरण ठरवावे : शंभूराज देसाई बाळासाहेब देसाई कारखान्याची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

पाटण : एफआरपीची रक्कम ठरविताना साखर कारखान्यांनी निर्माण केलेली सर्व साखर केंद्र व राज्य शासनाने खरेदी करावी व खरेदी केलेल्या साखरेच्या भावातून शेतकऱ्यांना एफआरपी निश्चीत करावी. राज्य शासनाने तरी राज्यातील साखर उद्योग वाचविण्याकरिता स्वतंत्र साखर धोरण ठरविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाई यांनी केले.दौलतनगर, ता. पाटण येथे बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, यशराज देसाई, जयराज देसाई, कारखान्याचे अध्यक्ष अशोकराव पाटील, उपाध्यक्ष राजाराम पाटील यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक मंडळ यांची प्रमुख उपस्थिती होती.शंभूराज देसाई म्हणाले, मागील वर्षीच्या साखर दरावर केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांना उसाची एफआरपी देण्याची रक्कम ठरवत आहेत. मागील वर्षी साखरेचा दर ३४०० रुपये होता. त्यावरून एफआरपी ठरविण्यात आली. मात्र यंदाच्या गळीत हंगामात दर २९०० रुपयांवर आला. त्यामुळे साखर कारखानदारांना सुमारे ५०० रुपयांचा तोटा सहन करून शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देणे भाग पडले.

साखर उद्योगामध्ये कार्यरत असणारे आघाडी सरकार हे सलग १५ वर्षे सत्तेत होते. त्यांनी हे धोरण आधीच ठरविणे गरजेचे होते. मात्र त्यांना ते जमले नाही. राज्यामध्ये आजही परतीचा पाऊस सुरू असून, दि. २० आॅक्टोबर रोजी अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमध्ये अतोनात नुकसान झाले.या वेळचा गळीत हंगाम सुरू होताना १.२५ लाख साखर पोती शिल्लक आहेत. साखर उद्योगावर राज्य सरकारचे नियंत्रण कमी आणि केंद्र सरकारचं नियंत्रण अधिक आहे. राज्य शासनाने वेळीच या साखर उद्योगाकडे लक्ष द्यावे, याकरिता युतीच्या शासनाकडे आमचा साखर उद्योगातील लोकप्रतिनिधींचा आग्रह राहणार आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी कारखान्यावर नको ते आरोप केले, याचे उत्तर कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकांना आपण नक्कीच देऊ. मात्र प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही आपल्या कारखान्याची चांगली वाटचाल सुरू आहे. १२५० मेट्रिक टन क्षमतेचा कारखाना संपूर्ण एफआरपी देतो, हे एकमेव उदाहरण आहे, असेही देसाई म्हणाले.मंत्री समितीच्या बैठकीकडे लक्षराज्यातील सर्व कारखाने १५ नोव्हेंबरनंतर सुरू होणार आहेत. यापूर्वी नेहमी दिवाळीअगोदर मंत्री समितीची बैठक होत होती. या बैठकीमध्ये राज्यातील साखर कारखान्यांनी कारखाने सुरू करण्याचे धोरण ठरत होते. मात्र अजूनही मंत्री समितीची बैठक झाली नसल्याने कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. साखरेच्या उत्पन्नामध्ये सुमारे ३५ टक्के घट होणार आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेShambhuraj Desaiशंभूराज देसाईSatara areaसातारा परिसर