पोटातील गोळी काढलीच नाही : जादा तपासात साक्षीदार नसल्याचे मान्य-
By Admin | Updated: July 17, 2014 23:38 IST2014-07-17T23:21:19+5:302014-07-17T23:38:20+5:30
संजय पाटीलखून खटला

पोटातील गोळी काढलीच नाही : जादा तपासात साक्षीदार नसल्याचे मान्य-
सातारा : महाराष्ट्र केसरी संजय पाटील यांचा मृत्यू बंदुकीच्या ज्या गोळीमुळे झाला, ती त्यांच्या पोटातून काढली नाही आणि तिची न्यायवैद्यक चाचणीही केली नाही, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी न्यायालयात दिली. दरम्यान, जादा तपासात एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याचे त्यांनी उलटत पासणीत सांगितले.
महाराष्ट्र केसरी संजय पाटील खून खटल्याचा फेरतपास करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. याकामी अमोल तांबे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे त्यांची साक्ष या प्रकरणात महत्त्वपूर्ण असून, आज, गुरुवारी जिल्हा सरकारी वकील विकास पाटील-शिरगावकर यांनी त्यांची सरतपासणी घेतली. त्यानंतर बचाव पक्षाचे अॅड. धैर्यशील पाटील आणि अॅड. श्रीकांत जाधव यांनी त्यांची उलटतपासणी घेतली. संजय पाटील यांचा मृत्यू ज्या गोळीमुळे झाला, त्यासंदर्भात तांबे यांच्यावर अॅड. पाटील आणि अॅड. जाधव यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. ‘संजय पाटील यांच्या शरीरातील बंदुकीची गोळी बाहेर काढली का? त्याची न्यायवैद्यक तपासणी केली का?’ या प्रश्नांना तांबे यांनी नकारार्थी उत्तर दिले. त्यावर ‘या गोळीचे पुढे काय झाले? संजय पाटील यांना अग्नी दिल्यानंतर ती वितळली की आणखी काय झाले, याविषयी तुम्ही माहिती घेतली का,’ या प्रश्नालाही तांबे यांनी नकारार्थी उत्तर दिले. ‘संजय पाटील यांची पत्नी आणि भाऊ यांच्या व्यतिरिक्त गावातील आणखी कोणाचे या घटनेसंदर्भात जबाब घेतले का,’ या प्रश्नाला ‘कोणाचेच जबाब घेतले नाहीत,’ असे उत्तर तांबे यांनी दिले. मात्र, गावाबाहेरील लोकांचे जबाब घेतल्याचे त्यांनी नमूद केले. यातील एकही साक्षीदार प्रत्यक्षदर्शी नाही, अशी माहिती त्यांनी दिली.
‘कऱ्हाड येथील शिवाजी रैनाक यांना उदय पाटीलबाबत माहिती देण्यासाठी तुम्ही मारहाण केली होती, अशी तक्रार कऱ्हाड पोलीस ठाण्यात नोंदविली होती का,’ या प्रश्नाचे तांबे यांनी होकारार्थी (पान ४ वर)