शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
2
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
3
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
4
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
5
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
6
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
7
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
8
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
9
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
10
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
11
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
12
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
13
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
14
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
15
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
16
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
17
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
18
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
19
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
20
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?

वणवा मुक्तीने नववर्ष सुरू; लोकसहभागातून अजिंक्यताऱ्यावर उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 15:25 IST

सह्याद्रीच्या डोंगररांगांनी व्यापलेल्या सातारा जिल्ह्यात वणवा ही मानवनिर्मित मोठी समस्या आहे.

प्रगती जाधव - पाटील  

सातारा - वणव्यामुळे होणारी हानी लक्षात घेता त्याची दाहकता कमी करण्याचा भाग म्हणून 'लोकमत'ने वणवा मुक्तीसाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून जनमानसातून मदतीचे हात पुढे आले आहेत. नव्या वषार्ची नवी सुरुवात वणवा मुक्त अभियानाने होणार असून त्याच्या शुभारंभाचा नारळ मान्यवरांच्या हस्ते अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याशी वाढवला जाणार आहे.

सह्याद्रीच्या डोंगररांगांनी व्यापलेल्या सातारा जिल्ह्यात वणवा ही मानवनिर्मित मोठी समस्या आहे. पर्यावरण रक्षण व प्रदूषण नियंत्रणासाठी एकाबाजूला मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत असताना दुसऱ्या बाजूस वणवा लावून आपणच या प्रयत्नांची राखरांगोळी करत असतो. वणव्यामुळे होणारी जिवीत, वित्त व पर्यावरणाची हानी 'लोकमत'ने वेळोवेळी मांडली. त्याच्या परिणामांची दाहकता पहाता वणवा मुक्तीसाठी काही करण्याची निकड लक्षात घेऊन सातारा शहर व परिसरातून मदतीचे अनेक हात पुढे आले. या श्रमशक्तीचा पर्यावरण रक्षणासाठी उपयोग करण्याच्या हेतूने लोकसहभागातून वणवा प्रतिबंधक उपाययोजना करण्याचा उपक्रम आकाराला आला.

सातारा वनविभागाचे उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा, साताऱ्याच्या वनक्षेत्रपाल शितल राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी अजिंक्यतारा किल्ल्यावर जाळरेषा काढण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका वेदांतिकाराजे भोसले, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, मानद वन्यजीवरक्षक सुनील भोईटे तसेच सातारा शहरातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत वणवा मुक्तीच्या उपक्रमाचा प्रारंभ होणार आहे. यावेळी जाळरेषा काढण्याच्या उपाय योजनेचे प्रात्यक्षिक वनविभाग दाखवणार आहे. साताऱ्यातील पर्यावरण प्रेमी, अजिंक्यतारा प्रेमी नागरिकांनी यावेळी उपस्थित राहून पर्यावरण वाचवण्यासाठीच्या उपक्रमाला पाठबळ द्यावे, असे आवाहन 'लोकमत'च्या वतीने करण्यात आले आहे.

असा राबवला जाईल उपक्रम!

वणवामुक्तीचा हा उपक्रम लोकसहभागातून व सातारा वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली राबवला जाणार आहे. अजिंक्यतारा किल्ल्यावर रोज सकाळी सात ते नऊ या वेळेत दहा नागरिकांचा एक ग्रुप श्रमदान करून वनविभागाला सहकार्य करेल. रोज नागरिकांचे विविध गट याकामी श्रमदान करून पर्यावरण रक्षणासाठी योगदान देतील, अशी अपेक्षा आहे. ज्या नागरिकांना गटाने या उपक्रमात सहभागी व्हायचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी प्रगती जाधव-पाटील मोबाईल ८७८८१३९९५४ यांच्याशी संपर्क साधावा.

हे होणार सहभागी

वणवामुक्तीसाठी जाळरेषा काढण्यासाठी श्रमदान करण्यासाठी ढाणे क्लासेसचे विशाल ढाणे, अजिंक्यतारा किल्ला ग्रुपचे अप्पा कोरे, जकातवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच चंद्रकांत सणस, गुरुकुल स्कूलचे राजेंद्र चोरगे, शाहूपुरी विकास आघाडीचे भारत भोसले, स्पंदन ग्रुपचे पंकज नागोरी, उद्योजक कन्हैय्या राजपुरोहित, सॅटर्डे क्लबचे अजित करडे, चित्रा भिसे यांनी तयारी दर्शविली आहे.

असं पोहोचाल कार्यक्रमस्थळावर

पोवई नाक्यावरून अजिंक्यताऱ्यावर येणाऱ्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणापासून शाहूनगरमध्ये प्रवेश करावा. तिथून अजिंक्य बझार चौक, गुरुकुल स्कूलमार्गे जगतापवाडीतून अजिंक्यतारा किल्ला पायथ्यावर पोहोचावं. चार भिंती परिसरातून येणाऱ्यांना पॅरेन्टस् स्कूलपासून किल्ला पायथा गाठता येईल.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरenvironmentपर्यावरण