शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

वणवामुक्त अजिंक्यताऱ्याचा साताऱ्यात निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 12:56 IST

वृक्षारोपण व संवर्धनाबरोबर संरक्षण ही गरजेची गोष्ट आहे.

प्रगती जाधव-पाटील

सातारा - वृक्षारोपण व संवर्धनाबरोबर संरक्षण ही गरजेची गोष्ट आहे. त्यामुळे सर्व शक्तिनिशी वणवा लावणाऱ्यांशी मुकाबला करुन अजिंक्यताऱ्याचे नाव सार्थकी लावू असा निर्धार मंगळाई देवीच्या साक्षीने अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी सातारकरांनी केला.

‘लोकमत’च्या पुढाकारातून व सातारा वनविभागाच्या सहकार्याने वनवामुक्तीच्या अभियानाचा प्रारंभ नववर्षाच्या पहिल्या सुर्यकिरणांच्या साक्षीने शाहूनगरमध्ये झाला. अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, सातारा वनविभागाचे उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा, साताऱ्याच्या वनक्षेत्रपाल शितल राठोड, मानद वन्यजीवरक्षक सुनील भोईटे, कन्हैयालाल राजपुरोहित, ढाणेज क्लासेसचे प्रा. विशाल ढाणे, हरिओम ग्रुपचे आप्पा कोरे, रानवाटा पर्यावरण मंडळाचे विशाल देशपांडे, ड्रोंगो संस्थेचे अध्यक्ष सुधीर सुकाळे, शाहूपुरी माध्यमिक विद्यालयालयाचे संस्थापक भारत भोसले, अमोल कोडक, जयश्री शेलार, चित्रा भिसे, पंकज नागोरी आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्वांचे स्वागत ‘लोकमत’चे आवृत्तीप्रमुख दिपक शिंदे यांनी केले.

वणवे लावल्यामुळे दरवर्षी पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होते. आपण रहात असलेल्या शहराचे पर्यावरण चांगले राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. यासाठी प्रत्येकजण वृक्षारोपण, वृक्ष संवर्धनासाठी काम करत असतो. मात्र एखाद्या माथेफिरुच्या आसुरी आनंदासाठी टाकली गेलेली काडी या साºया प्रयत्नांवर पाणी फिरवते. शिवाय लहानमोठ्या जीवजंतूंची राखरांगोळी होते.हे सर्व संभाव्य धोके टाळण्यासाठी ‘लोकमत’ने वनवामुक्ती अभियान हाती घेतले आहे. त्याचा प्रारंभ शाहूनगरमध्ये, अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी झाला. सर्वांनी एकीचे बळ दाखवत अजिंक्यतारा किल्ला वनवामुक्त ठेवण्याचा निर्धार यावेळी केला.

अजिंक्यतारा किल्ला परिसरात वनविभाग जाळरेषा काढणार आहे. त्याकरिता लोकसहभाग म्हणून रोज २ तास श्रमदान करण्याचे ठरले. या नागरिकांना आवश्यक पाठबळ व तांत्रिक सहाय्य, मार्गदर्शन करण्याचे आश्वासन डॉ. हाडा यांनी दिले. ‘वणवा लागू नये यासाठी ‘लोकमत’ने सामाजिक जबाबदारीतून एक चांगले पाऊल उचलले आहे. या प्रयत्नांना नागरिकांनी लोकसहभाग नोंदवून प्रतिसाद द्यावा’ अदे आवाहन रामचंद्र शिंदे यांनी यावेळी केले.  

वनकर्मचाऱ्यांच्या धाडसाचे कौतुक

वणवा दक्षता/प्रतिबंधक पथकातील वनपाल सुहास भोसले, वनरक्षक प्रशांतकुमार पडवळ, राजकुमार मोसलगी, वनमजुर गोरख शिडतुरे, अभिषेक जाधव यांनी ग्रास कटर, ब्लोअरचा वापर करून जाळरेषा कशी काढतात याचे प्रात्यक्षीक दाखवले. अत्यंत प्रतिकूल व अडचणीच्या  परिस्थितीत वनकर्मचारी करत असलेले काम पाहून उपस्थितांनी त्यांचे कौतुक करत याकामी लोकसहभागातून योगदान देण्याची ग्वाही दिली.

सहभागासाठी लोकमतचे आवाहन

वनवा मुक्तीचा हा उपक्रम लोकसहभागातून राबवला जात आहे. अजिंक्यतारा किल्ल्यावर सायंकाळी ४ ते ६ या वेळेत १० नागरिकांचा एक ग्रुप जाळरेषा काढण्यासाठी श्रमदान करेल. वनकर्मचारी याकामी सहकार्य करणार आहेत. किमान १० नागरिकांच्या गटाने पर्यावरण रक्षणासाठी यात योगदान द्यावे. अधिक माहिती व नियोजनासाठी पत्रकार प्रगती जाधव पाटील ८७८८१३९९५४ येथे संपर्क साधावा.

पाण्याच्या बाटल्यांची आवश्यकता

जाळरेषा काढण्यासाठी मर्यादित  गवत पेटवावे लागते. त्यानंतर विशिष्ट अंतरावर आग पसरल्यानंतर ती ब्लोअरने विजविण्यात येते. हे काम करताना वन कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर झळा बसतात. त्यामुळे शरिरातील पाण्याची पातळी कमी होते. पाण्याची ही पातळी वाढविण्यासाठी त्यांना पिण्यासाठी पाण्याची सोय उपलब्ध होणं आवश्यक आहे. ज्या सातारकरांना शारिरीक हालचाली करण्यास मर्यादा आहेत, त्यांनी जाळरेषा काढणाºयांसाठी घरून पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आनण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

टॅग्स :environmentपर्यावरणSatara areaसातारा परिसर