शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

उरमोडीतील मूळ जमीन आम्हाला पुन्हा द्या, प्रकल्पग्रस्तांची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 14:06 IST

उरमोडी धरणासाठी ज्या शेतकऱ्यांनी स्वत:च्या सुपीक जमीन दिल्या. त्या प्रकल्पग्रस्तांचे जिथे पुनर्वसन झाले आहे, तेथील गावटग्यांकडून त्यांना मारहाण होत आहे. अनेक वर्षे हे प्रकल्पग्रस्त दहशतीच्या सावटात जगत असून, पुनर्वसनाची जमीन नको, आम्हाला उरमोडी धरणात गेलेली मूळ जमीन परत करावी, अशी मागणी उरमोडी प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

ठळक मुद्देउरमोडीतील मूळ जमीन आम्हाला पुन्हा द्या, प्रकल्पग्रस्तांची व्यथाखटाव तालुक्यातील जमीन कसताना स्थानिकांची दहशत

सातारा : उरमोडी धरणासाठी ज्या शेतकऱ्यांनी स्वत:च्या सुपीक जमीन दिल्या. त्या प्रकल्पग्रस्तांचे जिथे पुनर्वसन झाले आहे, तेथील गावटग्यांकडून त्यांना मारहाण होत आहे. अनेक वर्षे हे प्रकल्पग्रस्त दहशतीच्या सावटात जगत असून, पुनर्वसनाची जमीन नको, आम्हाला उरमोडी धरणात गेलेली मूळ जमीन परत करावी, अशी मागणी उरमोडी प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गुरसाळे, ता. खटाव या गावातील गावटग्यांनी प्रकल्पग्रस्त अमोल विष्णू तरडे यांना मारहाण केली. त्यांना स्वत:च्या जमिनीमध्ये जाण्यापासून रोखले. तसेच ही जमीन विकण्यासाठी गुंडांकडून त्यांच्यावर दबाव आणला जात आहे, यामुळे उरमोडीचे सर्वच धरणग्रस्त दहशतीच्या छायेत आहेत. म्हणूनच आम्हाला नको कोणाची जमीन, आम्हाला आमची मूळ जमीन परत करून न्याय द्या, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे.दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी पुनर्वसन नियम २१(३) नुसार प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधितांना निर्देश द्यावेत, अशी मागणी भानुदास निकम, राजेंद्र वाईकर, शशिकांत वाईकर, रमेश जाधव, किरण पवार, सचिन पोफळे, सूर्यकांत निकम, धनाजी शेडगे, बाळासाहेब सपकाळ, जनार्धन वाईकर, ओंकार पिलावरे, ॠषी देवरे, कृष्णा देवरे, पांडुरंग देवरे, साहेबराव जाधव तसेच इतर प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.तर जिल्हाधिकारी कार्यालयापुढे चूल पेटवूस्वत:च्या मालकीची सुपीक जमीन सरकारच्या हवाली करून प्रकल्पग्रस्त ८० किलोमीटर लांब पुनर्वसित झाले आहेत. अशा परिस्थितीत आपण सुरक्षित नसू तर काय? जर प्रशासनाकडून प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळणार नसेल तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवू, असा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला. 

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांमुळे दुष्काळी भागाला पाणी मिळत आहे. त्यांनी जमिनी दिल्या, त्यामुळे प्रकल्प पूर्ण झाला आहे. म्हणूनच स्थानिक लोकांनी प्रकल्पग्रस्तांना बांधव म्हणून त्यांच्याशी वागले पाहिजे. पोलिसांनी प्रकल्पग्रस्तांना गावगुंडांपासून संरक्षण देऊन त्यांना न्याय द्यावा.- चिन्मय कुलकर्णी

टॅग्स :DamधरणSatara areaसातारा परिसर