शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

उरमोडीतील मूळ जमीन आम्हाला पुन्हा द्या, प्रकल्पग्रस्तांची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 14:06 IST

उरमोडी धरणासाठी ज्या शेतकऱ्यांनी स्वत:च्या सुपीक जमीन दिल्या. त्या प्रकल्पग्रस्तांचे जिथे पुनर्वसन झाले आहे, तेथील गावटग्यांकडून त्यांना मारहाण होत आहे. अनेक वर्षे हे प्रकल्पग्रस्त दहशतीच्या सावटात जगत असून, पुनर्वसनाची जमीन नको, आम्हाला उरमोडी धरणात गेलेली मूळ जमीन परत करावी, अशी मागणी उरमोडी प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

ठळक मुद्देउरमोडीतील मूळ जमीन आम्हाला पुन्हा द्या, प्रकल्पग्रस्तांची व्यथाखटाव तालुक्यातील जमीन कसताना स्थानिकांची दहशत

सातारा : उरमोडी धरणासाठी ज्या शेतकऱ्यांनी स्वत:च्या सुपीक जमीन दिल्या. त्या प्रकल्पग्रस्तांचे जिथे पुनर्वसन झाले आहे, तेथील गावटग्यांकडून त्यांना मारहाण होत आहे. अनेक वर्षे हे प्रकल्पग्रस्त दहशतीच्या सावटात जगत असून, पुनर्वसनाची जमीन नको, आम्हाला उरमोडी धरणात गेलेली मूळ जमीन परत करावी, अशी मागणी उरमोडी प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गुरसाळे, ता. खटाव या गावातील गावटग्यांनी प्रकल्पग्रस्त अमोल विष्णू तरडे यांना मारहाण केली. त्यांना स्वत:च्या जमिनीमध्ये जाण्यापासून रोखले. तसेच ही जमीन विकण्यासाठी गुंडांकडून त्यांच्यावर दबाव आणला जात आहे, यामुळे उरमोडीचे सर्वच धरणग्रस्त दहशतीच्या छायेत आहेत. म्हणूनच आम्हाला नको कोणाची जमीन, आम्हाला आमची मूळ जमीन परत करून न्याय द्या, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे.दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी पुनर्वसन नियम २१(३) नुसार प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधितांना निर्देश द्यावेत, अशी मागणी भानुदास निकम, राजेंद्र वाईकर, शशिकांत वाईकर, रमेश जाधव, किरण पवार, सचिन पोफळे, सूर्यकांत निकम, धनाजी शेडगे, बाळासाहेब सपकाळ, जनार्धन वाईकर, ओंकार पिलावरे, ॠषी देवरे, कृष्णा देवरे, पांडुरंग देवरे, साहेबराव जाधव तसेच इतर प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.तर जिल्हाधिकारी कार्यालयापुढे चूल पेटवूस्वत:च्या मालकीची सुपीक जमीन सरकारच्या हवाली करून प्रकल्पग्रस्त ८० किलोमीटर लांब पुनर्वसित झाले आहेत. अशा परिस्थितीत आपण सुरक्षित नसू तर काय? जर प्रशासनाकडून प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळणार नसेल तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवू, असा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला. 

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांमुळे दुष्काळी भागाला पाणी मिळत आहे. त्यांनी जमिनी दिल्या, त्यामुळे प्रकल्प पूर्ण झाला आहे. म्हणूनच स्थानिक लोकांनी प्रकल्पग्रस्तांना बांधव म्हणून त्यांच्याशी वागले पाहिजे. पोलिसांनी प्रकल्पग्रस्तांना गावगुंडांपासून संरक्षण देऊन त्यांना न्याय द्यावा.- चिन्मय कुलकर्णी

टॅग्स :DamधरणSatara areaसातारा परिसर