शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

उरमोडीतील मूळ जमीन आम्हाला पुन्हा द्या, प्रकल्पग्रस्तांची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 14:06 IST

उरमोडी धरणासाठी ज्या शेतकऱ्यांनी स्वत:च्या सुपीक जमीन दिल्या. त्या प्रकल्पग्रस्तांचे जिथे पुनर्वसन झाले आहे, तेथील गावटग्यांकडून त्यांना मारहाण होत आहे. अनेक वर्षे हे प्रकल्पग्रस्त दहशतीच्या सावटात जगत असून, पुनर्वसनाची जमीन नको, आम्हाला उरमोडी धरणात गेलेली मूळ जमीन परत करावी, अशी मागणी उरमोडी प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

ठळक मुद्देउरमोडीतील मूळ जमीन आम्हाला पुन्हा द्या, प्रकल्पग्रस्तांची व्यथाखटाव तालुक्यातील जमीन कसताना स्थानिकांची दहशत

सातारा : उरमोडी धरणासाठी ज्या शेतकऱ्यांनी स्वत:च्या सुपीक जमीन दिल्या. त्या प्रकल्पग्रस्तांचे जिथे पुनर्वसन झाले आहे, तेथील गावटग्यांकडून त्यांना मारहाण होत आहे. अनेक वर्षे हे प्रकल्पग्रस्त दहशतीच्या सावटात जगत असून, पुनर्वसनाची जमीन नको, आम्हाला उरमोडी धरणात गेलेली मूळ जमीन परत करावी, अशी मागणी उरमोडी प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गुरसाळे, ता. खटाव या गावातील गावटग्यांनी प्रकल्पग्रस्त अमोल विष्णू तरडे यांना मारहाण केली. त्यांना स्वत:च्या जमिनीमध्ये जाण्यापासून रोखले. तसेच ही जमीन विकण्यासाठी गुंडांकडून त्यांच्यावर दबाव आणला जात आहे, यामुळे उरमोडीचे सर्वच धरणग्रस्त दहशतीच्या छायेत आहेत. म्हणूनच आम्हाला नको कोणाची जमीन, आम्हाला आमची मूळ जमीन परत करून न्याय द्या, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे.दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी पुनर्वसन नियम २१(३) नुसार प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधितांना निर्देश द्यावेत, अशी मागणी भानुदास निकम, राजेंद्र वाईकर, शशिकांत वाईकर, रमेश जाधव, किरण पवार, सचिन पोफळे, सूर्यकांत निकम, धनाजी शेडगे, बाळासाहेब सपकाळ, जनार्धन वाईकर, ओंकार पिलावरे, ॠषी देवरे, कृष्णा देवरे, पांडुरंग देवरे, साहेबराव जाधव तसेच इतर प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.तर जिल्हाधिकारी कार्यालयापुढे चूल पेटवूस्वत:च्या मालकीची सुपीक जमीन सरकारच्या हवाली करून प्रकल्पग्रस्त ८० किलोमीटर लांब पुनर्वसित झाले आहेत. अशा परिस्थितीत आपण सुरक्षित नसू तर काय? जर प्रशासनाकडून प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळणार नसेल तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवू, असा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला. 

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांमुळे दुष्काळी भागाला पाणी मिळत आहे. त्यांनी जमिनी दिल्या, त्यामुळे प्रकल्प पूर्ण झाला आहे. म्हणूनच स्थानिक लोकांनी प्रकल्पग्रस्तांना बांधव म्हणून त्यांच्याशी वागले पाहिजे. पोलिसांनी प्रकल्पग्रस्तांना गावगुंडांपासून संरक्षण देऊन त्यांना न्याय द्यावा.- चिन्मय कुलकर्णी

टॅग्स :DamधरणSatara areaसातारा परिसर