शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

फुटक्या कालव्यांतून गाजरगवताचे सिंचन, अनागोंदी कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 11:25 IST

सातारा जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेले कालवे व पोटपाटांची दुरवस्था झाली आहे. वाढत्या उन्हाळ्यामुळे उपलब्ध पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत असताना फुटक्या कालव्यांमुळे आजूबाजूच्या गाजरगवताचेच सिंचन होताना दिसत आहे. जिल्ह्यातील कोयनेसह धोम, कण्हेर, उरमोडी, धोम बलकवडी, तारळी, येरळवाडी या धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे.

ठळक मुद्दे फुटक्या कालव्यांतून गाजरगवताचे सिंचन, अनागोंदी कारभार पालकमंत्र्यांची घोषणा वाऱ्यावर; पोटपाटांच्या देखरेखीकडे दुर्लक्ष

सातारा : जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेले कालवे व पोटपाटांची दुरवस्था झाली आहे. वाढत्या उन्हाळ्यामुळे उपलब्ध पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत असताना फुटक्या कालव्यांमुळे आजूबाजूच्या गाजरगवताचेच सिंचन होताना दिसत आहे.जिल्ह्यातील कोयनेसह धोम, कण्हेर, उरमोडी, धोम बलकवडी, तारळी, येरळवाडी या धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे.

कण्हेर धरणातून उन्हाळीचे एक आवर्तन सध्या सुरू आहे. धोम धरणातील पाणीही आता केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उरमोडी धरण वगळता इतर धरणांतील पाणी अत्यल्प उरले आहे. येरळवाडी धरणातील पाणी संपले आहे. प्रमुख धरणांतील पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवले असल्याने उन्हाळी पिकांना फाटा देण्यात आला आहे.जिल्ह्यातील धरणांतून नद्यांत पाणी सुटले तरच नदीकाठच्या पाणी योजना सुस्थितीत चालू राहणार आहेत. मात्र, धरणांतील आवर्तने कमी झाल्याने पाणी योजनाही धोक्यात आल्या आहेत. अनेक गावांत पाणी टंचाई जाणवत आहे. काही गावांतील पाणी योजना बंद कराव्या लागल्या आहेत. तर बहुतांश गावांमध्ये एकाड-एक दिवस पिण्याचे पाणी सोडायला सुरुवात केली आहे.दरम्यान, धोम, कण्हेर या धरणांतून पूर्वेकडील तालुक्यांना पिण्यासाठी तसेच शेतीच्या सिंचनासाठी पाणी सोडण्यात आलेले आहे. मात्र हे पाणी शेवटपर्यंत पोहोचतच नाही, अशी स्थिती आहे. कालव्यांना जागोजागी गळती लागलेली आहे. कालव्यांच्या डागडुजीकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केल्याने ही वेळ आली आहे.पालकमंत्री विजय शिवतारे यांनी कालव्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येतील, अशी भीमगर्जना केली होती. त्यासाठी निधीही आला. काही ठिकाणी कामे सुरू झाली. मात्र ती केवळ मलमपट्टी ठरल्याचे समोर येत आहे. कालव्यांच्या डागडुजीसाठी आणलेला निधी कुठे मुरला? असा सवाल शेतकरी विचारू लागले आहेत.

कालव्यांतील पाणी बाजूच्या जमिनीमध्ये शिरून त्या जमिनी पडीक झाल्या आहेत. त्या जागांवर गाजरगवत माजले आहे. सतत पाणी साठून या जमिनी नापिक बनल्या आहेत. ही बाब एका बाजूला असताना ज्या जमिनीच्या सिंचनासाठी कालवे बांधले, त्या जमिनींपर्यंत पाणी पोहोचत नसल्याने त्या तहानेने व्याकूळ झाल्या आहेत.हजारो लिटर पाणी जातेय वायातापमान वाढल्याने धरणांतील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यात कालव्यांना धरणाचे आवर्तन सोडल्यानंतर कालव्यांतूनही पाणी वाहून जाते. रोज हजारो लिटर पाणी वाया जात असताना याकडे दुर्लक्ष होत आहे. 

टॅग्स :WaterपाणीSatara areaसातारा परिसर