शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

फलटणच्या कत्तलखान्यामधून अतिरेक्यांना वित्त पुरवठा, मिलिंद एकबोटे यांचा खळबळजनक आरोप

By दीपक देशमुख | Updated: August 23, 2023 18:15 IST

सातारा : फलटण येथील कत्तलखान्याला राज्य राजकीय वरदहस्त आहे. या कारखान्यातून अतिरेक्यांना वित्त पुरवठा केला जातो. त्यामुळे महाराष्ट्राचे पशुधन ...

सातारा : फलटण येथील कत्तलखान्याला राज्य राजकीय वरदहस्त आहे. या कारखान्यातून अतिरेक्यांना वित्त पुरवठा केला जातो. त्यामुळे महाराष्ट्राचे पशुधन संपवणाऱ्या हा कत्तलखाना तात्काळ बंद करावा, अशी मागणी अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी केली. सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संघटनेचे मंगेश नरे, निवृत्त पशुसंवर्धन आयुक्त सुधीर भोसले उपस्थित होते.एकबोटे म्हणाले, फलटण येथे दोन दिवसांपूर्वी गोरक्षक सौरभ सोनवणे आणि अक्षय तावरे यांच्या सहकार्याने दहा म्हशींची गाडी ताब्यात घेऊन गोशाळेत पाठवण्यात आली. यापैकी चार म्हशी दूध देणाऱ्या होत्या. त्यांची कत्तल गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे तात्पुरती टळली. मात्र, भारतीय प्राणी संवर्धन कायदा लागू होऊन सुद्धा राज्यात प्रभावी अंमलबजावणी होत नाही. फलटण येथील कत्तलखान्यामधून देशी खिलारी गाई आणि म्हशी यांची कत्तल सुरू आहे. हा कत्तलखाना तत्काळ बंद करण्याची मागणी त्यांनी केली.एकबोटे म्हणाले, सध्या भारतात १४ कोटी लिटर दूध उत्पादन होते. मात्र ६४ कोटी लिटर दूध विकले जाते. ही बाब गंभीर आहे. दुधाची भेसळ आणि लोकांचे आरोग्य याबाबत अन्न औषध प्रशासन सुद्धा गंभीर भूमिका घेत नाही. गोधनाचे रक्षण करण्यासाठी पोलिसांच्या बघ्याची भूमिकेमुळे गोरक्षकांना उतरावे लागत आहे. गोरक्षकांना पोलीस संरक्षण मिळावे आणि महाराष्ट्र प्राणी अधिनियम २०१५ची प्रभावी अंमलबजावणी व्हावी.पशुसंवर्धन समिती जिल्हास्तरावर कार्यान्वित करावयाची असून पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी यावर ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. स्वतंत्र टास्क फोर्स नेमून त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमध्ये आर्थिक तरतूद करावयाचे नियमांत आहे. प्रशासनाने इच्छाशक्ती दाखवावी.प्रशासनाने इच्छाशक्ती दाखवावी, असे आवाहन एकबाटे यांनी केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMilind Ekboteमिलिंद एकबोटेterroristदहशतवादी