शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
4
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
5
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
6
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
7
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
8
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
9
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
10
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
11
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
12
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
13
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
14
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
15
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
16
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
17
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
18
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
19
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
20
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट

फलटणच्या कत्तलखान्यामधून अतिरेक्यांना वित्त पुरवठा, मिलिंद एकबोटे यांचा खळबळजनक आरोप

By दीपक देशमुख | Updated: August 23, 2023 18:15 IST

सातारा : फलटण येथील कत्तलखान्याला राज्य राजकीय वरदहस्त आहे. या कारखान्यातून अतिरेक्यांना वित्त पुरवठा केला जातो. त्यामुळे महाराष्ट्राचे पशुधन ...

सातारा : फलटण येथील कत्तलखान्याला राज्य राजकीय वरदहस्त आहे. या कारखान्यातून अतिरेक्यांना वित्त पुरवठा केला जातो. त्यामुळे महाराष्ट्राचे पशुधन संपवणाऱ्या हा कत्तलखाना तात्काळ बंद करावा, अशी मागणी अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी केली. सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संघटनेचे मंगेश नरे, निवृत्त पशुसंवर्धन आयुक्त सुधीर भोसले उपस्थित होते.एकबोटे म्हणाले, फलटण येथे दोन दिवसांपूर्वी गोरक्षक सौरभ सोनवणे आणि अक्षय तावरे यांच्या सहकार्याने दहा म्हशींची गाडी ताब्यात घेऊन गोशाळेत पाठवण्यात आली. यापैकी चार म्हशी दूध देणाऱ्या होत्या. त्यांची कत्तल गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे तात्पुरती टळली. मात्र, भारतीय प्राणी संवर्धन कायदा लागू होऊन सुद्धा राज्यात प्रभावी अंमलबजावणी होत नाही. फलटण येथील कत्तलखान्यामधून देशी खिलारी गाई आणि म्हशी यांची कत्तल सुरू आहे. हा कत्तलखाना तत्काळ बंद करण्याची मागणी त्यांनी केली.एकबोटे म्हणाले, सध्या भारतात १४ कोटी लिटर दूध उत्पादन होते. मात्र ६४ कोटी लिटर दूध विकले जाते. ही बाब गंभीर आहे. दुधाची भेसळ आणि लोकांचे आरोग्य याबाबत अन्न औषध प्रशासन सुद्धा गंभीर भूमिका घेत नाही. गोधनाचे रक्षण करण्यासाठी पोलिसांच्या बघ्याची भूमिकेमुळे गोरक्षकांना उतरावे लागत आहे. गोरक्षकांना पोलीस संरक्षण मिळावे आणि महाराष्ट्र प्राणी अधिनियम २०१५ची प्रभावी अंमलबजावणी व्हावी.पशुसंवर्धन समिती जिल्हास्तरावर कार्यान्वित करावयाची असून पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी यावर ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. स्वतंत्र टास्क फोर्स नेमून त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमध्ये आर्थिक तरतूद करावयाचे नियमांत आहे. प्रशासनाने इच्छाशक्ती दाखवावी.प्रशासनाने इच्छाशक्ती दाखवावी, असे आवाहन एकबाटे यांनी केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMilind Ekboteमिलिंद एकबोटेterroristदहशतवादी