शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

३१५ ठिकाणच्या पाणी नमुन्यात नायट्रेटचा अंश; आरोग्यासाठी धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 00:30 IST

पीक कोणतेही असो; पण ते चांगले यावे, यासाठी ही खते वापरली जातात. त्यामुळे या रासायनिक खतांचा भयावह परिणाम समोर येऊ लागलाय. कारण, पिण्याच्या पाण्यामध्येही रासायनिक अंश आढळून येऊ लागलेत.

ठळक मुद्देपिकांसाठी रासायनिक खतांचा वाढता वापर आरोग्यासाठी ठरू पाहतोय धोकादायकसाडेसहा हजार नमुन्यांची तपासणी :

नितीन काळेल ।सातारा : पिके चांगली येण्यासाठी शेतकरी दिवसेंदिवस रासायनिक खतांचा वापर अधिक करत आहेत. परिणामी या खतांचा अंश जमिनीतील पाण्यातही उतरत आहे. त्यामुळे जिल्ह्यात १ एप्रिल ते ३० आॅक्टोबरदरम्यानचे साडेसहा हजार पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासले असता त्यामधील ३१५ मध्ये नायट्रेटचा अंश आढळून आलाय. यामुळे खतांचा वाढता वापर आरोग्यासाठी धोकादायक ठरू पाहत आहे.

पाणी हेच जीवन आपल्याकडे म्हटले जाते; पण सद्य:स्थितीत शुद्ध पाणी मिळणेच अवघड झाले आहे. अनेक गावांना नळपणीपुरवठा योजना सुरू असल्यातरी वाडीवस्तीवरील लोक आजही विहीर, बोअर, हातपंपाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. नळाद्वारे पाणी पुरवण्यात येत असले तरी ते किती प्रमाणात शुद्ध असते, यावरही शंका असते. त्यातच आता पिकांसाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करतात. पीक कोणतेही असो; पण ते चांगले यावे, यासाठी ही खते वापरली जातात. त्यामुळे या रासायनिक खतांचा भयावह परिणाम समोर येऊ लागलाय. कारण, पिण्याच्या पाण्यामध्येही रासायनिक अंश आढळून येऊ लागलेत.

जिल्हा परिषदेच्या पाणी गुणवत्ता संनियंत्रण कक्षाने यावर्षी १ एप्रिल ते ३० आॅक्टोबरदरम्यान ७ हजार ४५५ ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. या ठिकाणचेच पाणी ग्रामस्थ पित होते. यामधील ६ हजार ६०० ठिकाणच्या पाण्याची तपासणी जिल्ह्यातील प्रयोगशाळेत करण्यात आली. त्यावेळी या तपासणीत नायट्रेटचा अंश आढळलेले पाणी नमुने ३१५ हून अधिक आढळून आले.

जर पाण्यात नायट्रेटचे प्रमाण अधिक असेल तर त्याचा परिणाम सर्वप्रथम लहान बालकांवर होतो. विशेष म्हणजे असे पाणी उकळून प्यायचे म्हटले तरी त्यातील नायट्रेटच्या अंशाचे प्रमाण कमी होत नाही. त्यामुळे नायट्रेटचा अंश असणारे पाणी पिण्यासाठी धोकादायकच ठरू शकते. यावरून याचा वेळीच विचार करणे महत्त्वाचे ठरले आहे. रासायनिक खतांचा वापर कमी केल्यास बऱ्यापैकी आळा बसेल.आरोग्याची गंभीर समस्या...शेती पिकासाठी रासायनिक खते वापरली जातात. त्यामुळे पिकाला पाणी दिल्यानंतर खताचे अंश जमिनीत उतरतात. त्यानंतर हेच अंश जमिनीतील पाण्यात मिसळतात. त्यातूनच पिण्याच्या पाण्यातही अंश आढळून येतात. जर पाण्यात नायट्रेटचा अंश अधिक प्रमाणात असेल तर आरोग्याच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागते. हे प्रमाण रोखण्यासाठी आता सर्वांनाच काळजी घ्यावी लागणार आहे. तरच आरोग्य चांगले राहणार आहे. तर बागायत क्षेत्रात नायट्रेटचे प्रमाण अधिक आहे.नायट्रेटने काय होते ?पिण्याच्या पाण्यात नायट्रेटचे प्रमाण अधिक आढळल्यास रक्ताभिसरणासंबंधातील आजार निर्माण होतात. प्रमाण अधिक असल्याने मिथमाग्लोबेमियानचे प्रमाण रक्तात वाढते. लहान मुलांच्या रक्तातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे मुले दगावूही शकतात. पाण्यात प्रमाणापेक्षा अधिक नायट्रेट असणे धोकादायकच ठरते. असे पाणी पिण्यायोग्य नसते, असे वैद्यकीय अधिकारी सांगतात.

पिण्याच्या पाण्यात नायट्रेटचा अंश अधिक प्रमाणात आढळून आल्यास असे पाणी लहान मुलांच्या आरोग्याच्या बाबतीत गंभीर आजार निर्माण करू शकते. यामुळे रक्तातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होते. तसेच नायट्रेटचा अंश असलेल्या या पाण्यापासून आरोग्यास धोका निर्माण होतो. असे पाणी कोणीही पिणे योग्य नसते. तसेच ‘आरओ’ने नायट्रेटचे तसेच इतर क्षाराचे प्रमाण कमी करता येते. असे पाणी पिण्यास योग्य ठरते. त्याने आरोग्यावर कसलाही अपाय होत नाही.- डॉ. सुहास माने, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :Satara areaसातारा परिसरwater pollutionजल प्रदूषणzpजिल्हा परिषद