शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

३१५ ठिकाणच्या पाणी नमुन्यात नायट्रेटचा अंश; आरोग्यासाठी धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 00:30 IST

पीक कोणतेही असो; पण ते चांगले यावे, यासाठी ही खते वापरली जातात. त्यामुळे या रासायनिक खतांचा भयावह परिणाम समोर येऊ लागलाय. कारण, पिण्याच्या पाण्यामध्येही रासायनिक अंश आढळून येऊ लागलेत.

ठळक मुद्देपिकांसाठी रासायनिक खतांचा वाढता वापर आरोग्यासाठी ठरू पाहतोय धोकादायकसाडेसहा हजार नमुन्यांची तपासणी :

नितीन काळेल ।सातारा : पिके चांगली येण्यासाठी शेतकरी दिवसेंदिवस रासायनिक खतांचा वापर अधिक करत आहेत. परिणामी या खतांचा अंश जमिनीतील पाण्यातही उतरत आहे. त्यामुळे जिल्ह्यात १ एप्रिल ते ३० आॅक्टोबरदरम्यानचे साडेसहा हजार पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासले असता त्यामधील ३१५ मध्ये नायट्रेटचा अंश आढळून आलाय. यामुळे खतांचा वाढता वापर आरोग्यासाठी धोकादायक ठरू पाहत आहे.

पाणी हेच जीवन आपल्याकडे म्हटले जाते; पण सद्य:स्थितीत शुद्ध पाणी मिळणेच अवघड झाले आहे. अनेक गावांना नळपणीपुरवठा योजना सुरू असल्यातरी वाडीवस्तीवरील लोक आजही विहीर, बोअर, हातपंपाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. नळाद्वारे पाणी पुरवण्यात येत असले तरी ते किती प्रमाणात शुद्ध असते, यावरही शंका असते. त्यातच आता पिकांसाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करतात. पीक कोणतेही असो; पण ते चांगले यावे, यासाठी ही खते वापरली जातात. त्यामुळे या रासायनिक खतांचा भयावह परिणाम समोर येऊ लागलाय. कारण, पिण्याच्या पाण्यामध्येही रासायनिक अंश आढळून येऊ लागलेत.

जिल्हा परिषदेच्या पाणी गुणवत्ता संनियंत्रण कक्षाने यावर्षी १ एप्रिल ते ३० आॅक्टोबरदरम्यान ७ हजार ४५५ ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. या ठिकाणचेच पाणी ग्रामस्थ पित होते. यामधील ६ हजार ६०० ठिकाणच्या पाण्याची तपासणी जिल्ह्यातील प्रयोगशाळेत करण्यात आली. त्यावेळी या तपासणीत नायट्रेटचा अंश आढळलेले पाणी नमुने ३१५ हून अधिक आढळून आले.

जर पाण्यात नायट्रेटचे प्रमाण अधिक असेल तर त्याचा परिणाम सर्वप्रथम लहान बालकांवर होतो. विशेष म्हणजे असे पाणी उकळून प्यायचे म्हटले तरी त्यातील नायट्रेटच्या अंशाचे प्रमाण कमी होत नाही. त्यामुळे नायट्रेटचा अंश असणारे पाणी पिण्यासाठी धोकादायकच ठरू शकते. यावरून याचा वेळीच विचार करणे महत्त्वाचे ठरले आहे. रासायनिक खतांचा वापर कमी केल्यास बऱ्यापैकी आळा बसेल.आरोग्याची गंभीर समस्या...शेती पिकासाठी रासायनिक खते वापरली जातात. त्यामुळे पिकाला पाणी दिल्यानंतर खताचे अंश जमिनीत उतरतात. त्यानंतर हेच अंश जमिनीतील पाण्यात मिसळतात. त्यातूनच पिण्याच्या पाण्यातही अंश आढळून येतात. जर पाण्यात नायट्रेटचा अंश अधिक प्रमाणात असेल तर आरोग्याच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागते. हे प्रमाण रोखण्यासाठी आता सर्वांनाच काळजी घ्यावी लागणार आहे. तरच आरोग्य चांगले राहणार आहे. तर बागायत क्षेत्रात नायट्रेटचे प्रमाण अधिक आहे.नायट्रेटने काय होते ?पिण्याच्या पाण्यात नायट्रेटचे प्रमाण अधिक आढळल्यास रक्ताभिसरणासंबंधातील आजार निर्माण होतात. प्रमाण अधिक असल्याने मिथमाग्लोबेमियानचे प्रमाण रक्तात वाढते. लहान मुलांच्या रक्तातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे मुले दगावूही शकतात. पाण्यात प्रमाणापेक्षा अधिक नायट्रेट असणे धोकादायकच ठरते. असे पाणी पिण्यायोग्य नसते, असे वैद्यकीय अधिकारी सांगतात.

पिण्याच्या पाण्यात नायट्रेटचा अंश अधिक प्रमाणात आढळून आल्यास असे पाणी लहान मुलांच्या आरोग्याच्या बाबतीत गंभीर आजार निर्माण करू शकते. यामुळे रक्तातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होते. तसेच नायट्रेटचा अंश असलेल्या या पाण्यापासून आरोग्यास धोका निर्माण होतो. असे पाणी कोणीही पिणे योग्य नसते. तसेच ‘आरओ’ने नायट्रेटचे तसेच इतर क्षाराचे प्रमाण कमी करता येते. असे पाणी पिण्यास योग्य ठरते. त्याने आरोग्यावर कसलाही अपाय होत नाही.- डॉ. सुहास माने, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :Satara areaसातारा परिसरwater pollutionजल प्रदूषणzpजिल्हा परिषद