बोरखळ येथे दोन गटांत वाट देण्यावरून मारामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:35 IST2021-03-22T04:35:36+5:302021-03-22T04:35:36+5:30

सातारा : तालुक्यातील बोरखळ येथे वाटेत ठेवण्यात आलेली ट्रॅक्टरची अवजारे काढण्यावरून झालेल्या मारामारीप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी ...

Fighting over waiting in two groups at Borkhal | बोरखळ येथे दोन गटांत वाट देण्यावरून मारामारी

बोरखळ येथे दोन गटांत वाट देण्यावरून मारामारी

सातारा : तालुक्यातील बोरखळ येथे वाटेत ठेवण्यात आलेली ट्रॅक्टरची अवजारे काढण्यावरून झालेल्या मारामारीप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सातजणांवर गुन्हा दाखल केला असून, रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती.

याबाबत विनोद अर्जुन रसाळ (वय ३५, रा. बोरखळ, ता. सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शुक्रवार, दि. १९ रोजी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांनी त्यांच्या घराजवळील रस्त्यावर ट्रॅक्टरची अवजारे ठेवली होती. मात्र, जयश्री सुभाष रसाळ (५८), हणमंत सुभाष रसाळ (२३, दोघे रा. बोरखळ) यांनी विनोद यांना ''तुम्ही येण्या-जाण्याच्या वाटेत ठेवलेली ट्रॅक्टरची अवजारे उचला, आम्हाला कडबा आणायचा आहे,'' असे सांगितले. मात्र, विनोद यांनी ''मी ट्रॅक्टरची अवजारे उचलणार नाही, मला ठेवायला जागा नाही,'' असे सांगितले. याचा राग आल्यामुळे जयश्री रसाळ यांनी विनोद यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ आणि दमदाटी केली. यावेळी हणमंत रसाळ याने विनोद यांच्या डोक्यात आणि उजव्या हातावर दगड फेकून मारला. यात विनोद जखमी झाले. याप्रकरणी त्यांनी शनिवार, दि. २० रोजी दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर जयश्री आणि हणमंत या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, जयश्री सुभाष रसाळ यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बोरखळ येथे बसस्थानकाशेजारी असलेल्या परसात वाटेत लावलेली ट्रॅक्टरची पलटी व रोटर काढून बाजूला लावा, असे कुसुम अर्जुन रसाळ यांना जयश्री यांनी सांगितले. या कारणावरून नीलेश अर्जुन रसाळ, विनोद अर्जुन रसाळ, मेघा विनोद रसाळ, दीपाली अर्जुन रसाळ, गणेश नीलेश रसाळ (सर्व रा. बोरखळ, ता. सातारा) यांनी एकत्र येत जयश्री यांचा मुलगा हणमंत रसाळ यांना शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकीही दिली. या भांडणात फिर्यादी जयश्री यांची कपडे फाटली आणि गळ्यातील मंगळसूत्र आणि फोन पडून गहाळ झाला.

याप्रकरणी शनिवार, दि. २० रोजी तक्रार दिल्यानंतर कुसुम रसाळ, नीलेश रसाळ, विनोद रसाळ, मेघा रसाळ, दीपाली रसाळ, गणेश रसाळ या सहाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Fighting over waiting in two groups at Borkhal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.