शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

पंधरा कुटुंबीयांनी शोधला कचरा संकलनाचा नवा मार्ग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 00:11 IST

प्लास्टिक कच-यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असून, जैवविविधता धोक्यात आली आहे. सातारा शहरातही असेच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण काहीतरी करायला हवं, असा विचार यादोगापाळ पेठेतील आदी रेसिडेन्सीमध्ये राहणाºया हृषीकेश कुलकर्णी या तरुणाच्या मनात आला.

ठळक मुद्देसर्वांचा होकार मिळताच त्याने पौर्णिमा शहा व आई ऋुता मिलिंद कुलकर्णी यांच्या मदतीने कचरा संकलनाचे काम सुरू केले.

सातारा : घंटागाडी दारात येऊनही साताऱ्यातील अनेक नागरिक आजही रस्त्यावर कचरा टाकण्यात धन्यता मानतात. परंतु शहरातील एका अपार्टमेंटमध्ये राहणारे पंधरा कुटुंबीय याला अपवाद ठरले आहे. येथील रहिवाशांनी अपार्टमेंटमध्येच कचरा संकलनाची व्यवस्था केली असून, याठिकाणी प्लास्किट कचरा, ई-कचरा व भंगार साहित्य वेगवेगळे गोळा केले जाते. विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून, त्याचे अनुकरण आता इतर नागरिकही करू लागले आहेत.

प्लास्टिक कच-यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असून, जैवविविधता धोक्यात आली आहे. सातारा शहरातही असेच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण काहीतरी करायला हवं, असा विचार यादोगापाळ पेठेतील आदी रेसिडेन्सीमध्ये राहणाºया हृषीकेश कुलकर्णी या तरुणाच्या मनात आला.

याचवेळी त्याच्या वाचनात कचरा संकलनाचे काम करणा-या एका तरुणाचा लेखही आला होता. त्यातून प्रेरणा घेऊन हृषीकेशने कचरा संकलनाचे काम सुरू केले. तत्पूर्वी त्याने या नव्या उपक्रमाची अपार्टमेंटमधील रहिवाशांना कल्पना दिली. सर्वांचा होकार मिळताच त्याने पौर्णिमा शहा व आई ऋुता मिलिंद कुलकर्णी यांच्या मदतीने कचरा संकलनाचे काम सुरू केले.

नियोजनानुसार प्लास्टिक, ई-कचरा व भंगार साहित्य वेगवेगळे गोळा केले जाऊ लागले. यासाठी अपार्टमेंटच्या तिसºया मजल्यावर तीन मोठे डबे ठेवण्यात आले आहेत. तीन वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून, सर्वात खालच्या मजल्यावर राहणारे नागरिकही नित्यनेमाने आपला कचरा या डब्यांमध्येच टाकतात.

संकलित होणाºया कच-यापैकी ई-कचरा हा प्रा. संध्या चौगुले यांनी ‘हिरवाई’त सुरू केलेल्या ई-कचरा संकलनकेंद्रात पाठविला जातो. तर प्लास्टिक कच-याचे गठ्ठे तयार करून तो पुण्याला रिसायकलिंगसाठी पाठविला जातो. आतापर्यंत २०० किलो प्लास्टिक हे रिसायकलिंगसाठी पाठविण्यात आले आहे. या उपक्रमाची माहिती मिळाल्यानंतर अनेक कुटुंबांनी आता पर्यावरणपूरक चळवळ सुरू केली आहे.

सातारा शहर स्वच्छ व सुंदर राहावे, पर्यावरणाचे संवर्धन व्हावे, यासाठी आम्ही कचरा संकलनाचा उपक्रम हाती घेतला. नागरिकांचा या पर्यावरणपूरक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येकाला आपल्या जबाबदारीची जाणीव आता झाली आहे.- हृषीकेश कुलकर्णी, सातारा

पर्यावरणाचे संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे. पर्यावरणाचे महत्त्व ओळखून आम्ही अपार्टमेंटमध्ये कचरा संकलन केंद्र सुरू केले. तीन वर्षांत आम्ही दोनशे किलो प्लास्टिक समुद्राच्या पोटात जाण्यापासून रोखूू शकलो. आमचा हा उपक्रम पुढे सुरूच राहणार आहे.- पौर्णिमा शहा, सातारा

साताऱ्यातील आदी अपार्टमेंटमधील रहिवाशांनी अपार्टमेंटमध्येच कचरा संकलन केंद्र सुरू केले असून, वेगवेगळ्या डब्यात कचरा संकलित केला जातो.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMuncipal Corporationनगर पालिका