शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
2
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
3
“प्रशांत जगतापांनी अनेक पक्षांची ऑफर धुडकावून विचारासाठी काँग्रेस मार्ग पत्करला”: वडेट्टीवार
4
"अल्पसंख्याकांवरील अत्याचार खपवून घेणार नाही" २,९०० हून अधिक हल्ल्यांचा पुरावा; भारताचा बांगलादेशला गंभीर इशारा
5
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
6
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
7
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
8
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
9
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
10
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
11
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
12
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
13
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
14
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
15
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
16
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
17
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
18
MNS: गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
19
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
20
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा कुटुंबीयांनी शोधला कचरा संकलनाचा नवा मार्ग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 00:11 IST

प्लास्टिक कच-यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असून, जैवविविधता धोक्यात आली आहे. सातारा शहरातही असेच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण काहीतरी करायला हवं, असा विचार यादोगापाळ पेठेतील आदी रेसिडेन्सीमध्ये राहणाºया हृषीकेश कुलकर्णी या तरुणाच्या मनात आला.

ठळक मुद्देसर्वांचा होकार मिळताच त्याने पौर्णिमा शहा व आई ऋुता मिलिंद कुलकर्णी यांच्या मदतीने कचरा संकलनाचे काम सुरू केले.

सातारा : घंटागाडी दारात येऊनही साताऱ्यातील अनेक नागरिक आजही रस्त्यावर कचरा टाकण्यात धन्यता मानतात. परंतु शहरातील एका अपार्टमेंटमध्ये राहणारे पंधरा कुटुंबीय याला अपवाद ठरले आहे. येथील रहिवाशांनी अपार्टमेंटमध्येच कचरा संकलनाची व्यवस्था केली असून, याठिकाणी प्लास्किट कचरा, ई-कचरा व भंगार साहित्य वेगवेगळे गोळा केले जाते. विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून, त्याचे अनुकरण आता इतर नागरिकही करू लागले आहेत.

प्लास्टिक कच-यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असून, जैवविविधता धोक्यात आली आहे. सातारा शहरातही असेच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण काहीतरी करायला हवं, असा विचार यादोगापाळ पेठेतील आदी रेसिडेन्सीमध्ये राहणाºया हृषीकेश कुलकर्णी या तरुणाच्या मनात आला.

याचवेळी त्याच्या वाचनात कचरा संकलनाचे काम करणा-या एका तरुणाचा लेखही आला होता. त्यातून प्रेरणा घेऊन हृषीकेशने कचरा संकलनाचे काम सुरू केले. तत्पूर्वी त्याने या नव्या उपक्रमाची अपार्टमेंटमधील रहिवाशांना कल्पना दिली. सर्वांचा होकार मिळताच त्याने पौर्णिमा शहा व आई ऋुता मिलिंद कुलकर्णी यांच्या मदतीने कचरा संकलनाचे काम सुरू केले.

नियोजनानुसार प्लास्टिक, ई-कचरा व भंगार साहित्य वेगवेगळे गोळा केले जाऊ लागले. यासाठी अपार्टमेंटच्या तिसºया मजल्यावर तीन मोठे डबे ठेवण्यात आले आहेत. तीन वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून, सर्वात खालच्या मजल्यावर राहणारे नागरिकही नित्यनेमाने आपला कचरा या डब्यांमध्येच टाकतात.

संकलित होणाºया कच-यापैकी ई-कचरा हा प्रा. संध्या चौगुले यांनी ‘हिरवाई’त सुरू केलेल्या ई-कचरा संकलनकेंद्रात पाठविला जातो. तर प्लास्टिक कच-याचे गठ्ठे तयार करून तो पुण्याला रिसायकलिंगसाठी पाठविला जातो. आतापर्यंत २०० किलो प्लास्टिक हे रिसायकलिंगसाठी पाठविण्यात आले आहे. या उपक्रमाची माहिती मिळाल्यानंतर अनेक कुटुंबांनी आता पर्यावरणपूरक चळवळ सुरू केली आहे.

सातारा शहर स्वच्छ व सुंदर राहावे, पर्यावरणाचे संवर्धन व्हावे, यासाठी आम्ही कचरा संकलनाचा उपक्रम हाती घेतला. नागरिकांचा या पर्यावरणपूरक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येकाला आपल्या जबाबदारीची जाणीव आता झाली आहे.- हृषीकेश कुलकर्णी, सातारा

पर्यावरणाचे संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे. पर्यावरणाचे महत्त्व ओळखून आम्ही अपार्टमेंटमध्ये कचरा संकलन केंद्र सुरू केले. तीन वर्षांत आम्ही दोनशे किलो प्लास्टिक समुद्राच्या पोटात जाण्यापासून रोखूू शकलो. आमचा हा उपक्रम पुढे सुरूच राहणार आहे.- पौर्णिमा शहा, सातारा

साताऱ्यातील आदी अपार्टमेंटमधील रहिवाशांनी अपार्टमेंटमध्येच कचरा संकलन केंद्र सुरू केले असून, वेगवेगळ्या डब्यात कचरा संकलित केला जातो.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMuncipal Corporationनगर पालिका