शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Satara: लालचुटूक स्ट्रॉबेरीचे दर गडगडल्याने काळवंडली, जावळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 14:08 IST

कंपन्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान, स्ट्रॉबेरीचा हंगाम संपण्यास अजून दोन महिने कालावधी

कुडाळ (जि. सातारा) : जावळी तालुक्यात प्रामुख्याने कुडाळ, आखाडे सोमर्डी, महू, शिंदेवाडी आदी गावांमध्ये स्ट्रॉबेरीचे पीक घेतले जाते. साधारणपणे २० ते २२ हेक्टर जमिनीवर सप्टेंबर महिन्यात स्ट्रॉबेरी पिकाची लागण होते. डिसेंबर महिन्यापासून हा हंगाम सुरू होत आहे. पुणे, मुंबई, तसेच जॅमचे चॉकलेट तयार करणाऱ्या कंपनीकडून याची मागणी होते. सद्य:स्थितीत स्ट्रॉबेरीचा हंगाम संपण्यास अजून दोन महिने कालावधी आहे; मात्र, कंपन्या केवळ वीस ते तीस रुपये दराने खरेदी करीत असल्याने स्ट्रॉबेरी रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे.स्ट्रॉबेरीचा दर कोसळला असल्याने स्ट्रॉबेरी उत्पादक संकटात सापडला आहे. याचा मोठा आर्थिक फटका त्यांना बसणार आहे. सध्या स्ट्रॉबेरीला जॅमच्या कंपनीतून मागणी कमी झाली असल्याने स्ट्रॉबेरीचे दर २० ते ३० रुपयांवर आले आहेत. अचानकपणे स्ट्रॉबेरीचा दर कोसळल्याने शेतकऱ्यांना तोडून ठेवलेला स्ट्रॉबेरी माल फेकून द्यावा लागला आहे. यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.स्ट्रॉबेरी या पिकाला कोणत्याही प्रकारचे विमा कवच नसल्याने या नुकसानीची दाद कोणाकडे मागावी, असा सवाल शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. यावर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांना पाणी पुरेल का नाही, अशी शंका शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली असतानाच स्ट्रॉबेरी पिकाचे दर पडल्याने शेतकऱ्याला अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागणार आहे.

स्ट्रॉबेरी पिकाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना सुरुवातीला लाखो रुपयांचे भांडवल उभे करावे लागते. सरकारकडून कोणत्याही प्रकारचे विमा कवच स्ट्रॉबेरी पिकाला दिले जात नसून कोणतेही अनुदान दिले जात नाही. अन्य पिकाला दिले जाणारे पीकविमा कवच हे स्ट्रॉबेरी पिकालाही लागू करण्यात यावे. या विमा कवचासाठी जे काही शुल्क भरावे लागेल, ते स्ट्रॉबेरी उत्पादक भरतील. त्यांना या विमा कवचाचा लाभ मिळावा. - रूपेश आंबुले, स्ट्रॉबेरी उत्पादक 

स्ट्रॉबेरी उत्पादकांचे नुकसान करू नयेअवकाळी पावसाचा स्ट्रॉबेरी पिकाला काहीअंशी फटका बसला. त्यामुळे कारखान्यांनी स्ट्रॉबेरी खरेदीचा दर २५ रुपये किलोवर आणला. गेल्यावर्षी स्ट्रॉबेरीला ५५ ते ६० रुपये दर कारखाने देऊ शकतात, तर यंदा का नाही? कारखान्यांनी शेतकऱ्यांचा माल सन्मानानेच घ्यायला हवा. कष्टाने पिकवलेल्या मालाला कमी दर देऊन त्यांची थट्टा करू नये. जर कारखान्यांना स्ट्रॉबेरी नको असेल तर त्यांनी घेऊ नये; परंतु दर पाडून शेतकऱ्यांचे नुकसान करू नये. - किसनशेठ भिलारे, अध्यक्ष, फळे, फुले सहकारी संस्था, महाबळेश्वर

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी