शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

शेतकºयांनीच अडविले अखेर माणगंगेचे पाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 11:58 PM

नवनाथ जगदाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कदहिवडी : दुष्काळी माण तालुक्याला काही प्रमाणांत पाण्याची सोय व्हावी, यासाठी माणगंगा नदीवर दहिवडी हद्दीत ५ ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. दहिवडी परिसरात चांगला पाऊसही झाला, पण बंधाºयाला फळ्या न घातल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. त्यामुळे काही शेतकरीच स्वत:हून फळ्या टाकून पाणी अडविण्याचा प्रयत्न ...

नवनाथ जगदाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कदहिवडी : दुष्काळी माण तालुक्याला काही प्रमाणांत पाण्याची सोय व्हावी, यासाठी माणगंगा नदीवर दहिवडी हद्दीत ५ ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. दहिवडी परिसरात चांगला पाऊसही झाला, पण बंधाºयाला फळ्या न घातल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. त्यामुळे काही शेतकरीच स्वत:हून फळ्या टाकून पाणी अडविण्याचा प्रयत्न करू लागले आहेत.महाराष्ट्रात २००२-२००३ साली भयानक दुष्काळ पडला होता. जनावरांना छावण्या, लोकांना पिण्याचे पाणी, रोजगार हमीची कामे सुरू होती. त्यावेळी लोकांना आधार देण्यासाठी परिस्थिती पाहण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माणचा दौरा केला होता व पुढे कराड येथील सभेत माण-खटावसाठी तातडीचा निधी म्हणून १० कोटी रुपये मंजूर केले. या निधीतून खटावमधील येरळा व माणमधील माणगंगा नदीवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले गेले. ही कल्पना चांगली वाटली, यातून काही प्रमाणांत नदीकाठच्या शेती पाण्याचा प्रश्न मिटेल, म्हणून पुढे दिवंगत सदाशिवराव पोळ, आमदार जयकुमार गोरे, पंकजा मुंढे, माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या प्रयत्नातून आणखी बंधारे उभे राहिले.यापैकी पळशी व गोंदवले बंधाºयात पाणी चांगल्या पद्धतीने अडले गेले. मात्र, दहिवडी हद्दीतील पाचही बंधाºयांची अवस्था बिकट होत गेली. या ठिकाणी अनेक बंधारे लिकेज राहिले, खरेतर पाटबंधारे खात्याने ते हस्तांतरित करताना लिकेज पाहूनच ताबा घ्यायला हवा होता, पण त्यावेळी लिकेज न पाहताच ताबा घेण्यात आला.पुढे पाणी न साचताच या योजनेवर लिकेज काढण्यासाठी निधी खर्च करावा लागला. आता लिकेज निघाले आहे पण पाणी अडवले गेले नाही. हा प्रशासनाचा गलथान कारभार पाहून शेतकरी त्रस्त झाले आहेत.याच नदीवर पळशी, गोंदवले येथे पूर्ण क्षमतेने पाणी अडविले गेले आहे. मात्र, दहिवडीतील पाचही बंधाºयांत फळ्या टाकण्याऐवजी ज्या होत्या त्या काढण्यात धन्यता मानत आहेत. त्यामुळे दहिवडी परिसरात चांगला पाऊस पडूनही लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. १५ सप्टेंबरपूर्वी पाणी अडवले जाते. मात्र, त्यावर अद्याप कार्यवाही झाली नाही, उलट फळ्या काढण्यासाठी अधिकारी आले असता त्यांना नागरिकांनी विरोध केला.अनेकवेळा कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या बंधाºयाचा उपयोग व्हावा, यासाठी शेतकºयाने लोकवर्गणी काढून दुरुस्ती केली, आता पाणी अडले गेले नाही तर पुन्हा दहिवडी परिसरातील नदीकाठच्या शेतकºयांना पाण्याची समस्या भेडसावणार आहे.२५ तारखेपासून फळ्या काढणारसंबधित अधिकारी सहायक अभियंता उत्तम धायगुडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की पावसाळी वातावरण असल्यामुळे अधिकारी फळ्या काढण्यास गेले होते. २० तारखेला फळ्या टाकण्याची निविदा निघणार असून, २५ तारखेपर्यंत सर्व पाणी अडविले जाईल.