शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

ऊसवाहतुकीची डोकेदुखी, ट्रॉली पलटी होण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकरी चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 14:04 IST

ओगलेवाडी : सध्या साखर कारखान्यांच्या ऊस हंगाम जोरात सुरू आहे. बऱ्याच ठिकाणचे ऊस तुटून गेले आहेत. तर काही शेतकऱ्यांचा ...

ओगलेवाडी : सध्या साखर कारखान्यांच्या ऊस हंगाम जोरात सुरू आहे. बऱ्याच ठिकाणचे ऊस तुटून गेले आहेत. तर काही शेतकऱ्यांचा ऊस अजूनही शेतात आहे. ऊस घेऊन जाताना अनेक ट्रॉल्या पलटी होत असल्याने शेतकऱ्यांना चिंता लागून राहत आहे. नुकसानीबरोबरच ट्रॉली पुन्हा भरण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने ‘चूक चालकाची, भीती मालकाला’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.साखर कारखान्यांचा ऊस हंगाम सुरु असल्याने ऊस वाहतूक वाढली आहे. फडातून बाहेर निघालेला ऊस कारखान्यापर्यंत सुखरूप पोहोचणे महत्त्वाचे असते. बराचसा ऊस कारखान्यापर्यंत विना अडथळा पोहोचतोय. मात्र काही चालकांच्या चुकीमुळे ऊस ट्रॉली पलटी होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कधी कधी आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. त्यामुळे फडातून बाहेर निघालेली ट्रॉली सुखरूप कारखान्यावर जाऊन पोहोचेल काय? अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होत आहे.खराब रस्ते, क्षमतेपेक्षा जास्त भरलेली वजन, कमकुवत टायर, असमतोल रस्ता, तर कधी वाहनचालकांची चुकी यामुळे ट्रॉली पलटी होण्याचे प्रमाण वाढत आहे. ट्रॉली पलटी झाल्यावर ऊस रस्त्यावर पडून राहतो. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने वजन कमी होण्याचा धोका कायम असतो. त्याचबरोबर ही ट्रॉली पुन्हा भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे काही रकमेची मागणी केली जात आहे. त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची वेळोवेळी तपासणी करणे गरजेचे आहे. याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSugar factoryसाखर कारखाने