शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

साताऱ्यातील निम्मे कारखाने अद्याप बंद; गळीत हंगाम रडतखडतच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 17:11 IST

बहुतांशी कारखान्यांनी दर जाहीर केले नाहीत.

नितीन काळेलसातारा : साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला असला तरी सातारा जिल्ह्यात मात्र, रडतखडतच प्रवास आहे. अजूनही निम्मे कारखाने बंद आहेत, तर काही कारखान्यांनी आणखी गाळप परवानाच घेतलेला नाही. त्यातच शेतकरी संघटनांच्या मागण्या मान्य न झाल्याने आंदोलनाची धार वाढू शकते. त्यामुळे गाळप हंगाम कधी पूर्ण क्षमतेने सुरू होणार, याबाबत प्रश्नचिन्ह आहे.जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढत चालले आहे. पूर्वी पश्चिम भागात ऊसक्षेत्र अधिक होते. पण, मागील काही वर्षांत माण, खटाव तालुक्यातही पाण्याची उपलब्धता झाल्याने उसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यातच साखर कारखान्यांची संख्याही वाढली आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात खासगी आणि सहकारी मिळून १६ कारखाने आहेत. गेल्यावर्षी मे-जूनपर्यंत काही कारखान्यांचे गाळप सुरू होते. यंदा आतापर्यंत ७ ते ८ कारखान्यांनी गाळपास सुरुवात केली आहे.पुणे येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्या अहवालानुसार सातारा जिल्ह्यातील कृष्णा सहकारी साखर कारखाना, रयत -अथनी सहकारी साखर कारखाना, स्वराज इंडिया ॲग्रो, श्री दत्त इंडिया, शरयू ॲग्रो, श्रीराम जवाहर, जयवंत शुगर्स, ग्रीन पॉवर शुगर्स, खंडाळा तालुका शेतकरी सहकारी, खटाव-माण तालुका ॲग्रो प्रोसेसिंग, जरंडेश्वर या कारखान्यांनी गाळप परवाना घेतला आहे. तर किसन वीर, अजिंक्यतारा, सह्याद्री, लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्यांनी अद्याप परवाना घेतलेला नाही. जावळी तालुक्यातील प्रतापगड कारखान्याचा हंगाम बंद आहे. अशा स्थितीत सध्या निम्मेच कारखाने सुरू आहेत. त्यातच शेतकरी संघटना दर आणि थकबाकीसाठी आक्रमक झाल्या आहेत. यामुळे कारखाने पूर्ण क्षमतेने कधी गाळप करणार, हा प्रश्न आहे.जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. या संघटनेने यावर्षी तुकडे-तुकडे न करता एकरकमी एफआरपी द्यावी, मागील थकबाकी आणि नफ्यातील २०० रुपये मिळावेत, अशी मागणी केली आहे. त्यातच बहुतांशी कारखान्यांनी दर जाहीर केले नाहीत.

रयत- अथनी कारखान्यानेच दर जाहीर केला आहे. असे असले तरी अनेक कारखान्यांनी दर जाहीर न करता गाळप सुरू केले आहे. त्यामुळे शेतकरी संघटना आंदोलन करण्यावर ठाम आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुण्यात मोर्चा काढला होता. साखर आयुक्तांसमोर अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. याबाबत तोडगा न निघाल्यास आंदोलनाची धार वाढवू, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे कारखान्यांनी मागील थकबाकी आणि यावर्षीचा दर जाहीर न केल्यास आंदोलनाची धग वाढणार हे निश्चित आहे.

जिल्ह्यातील साखर कारखाने मागचे पैसे आणि नवीन दर जाहीर करत नाहीत, तोपर्यंत कोणीही तोड करू नये. तसेच उसाची वाहतूक आणि कारखानेही सुरू करू नयेत. जे कारखाने सुरू आहेत, त्याबाबत साखर आयुक्तांच्या कानावर गोष्टी घातल्या आहेत. आता सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांसाठी खांद्याला खांदा लावून उभे राहण्याची गरज आहे. कारखानदारांना गुडघे टेकायला लावून दर घेतल्याशिवाय राहणार नाही. यासाठी आंदोलनाची धार आणखी वाढवणार आहे. - राजू शेळके, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSugar factoryसाखर कारखाने