शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

बारापैकी अकरा गावांची पाण्यासाठी भटकंती.., चोवीस तास वीजपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 13:20 IST

राज्यातील पहिली प्रादेशिक नळपाणी योजना म्हणून बहुमान मिळवलेली खातवळसह बारा गाव प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेला चोवीस तास वीजपुरवठा व येरळवाडी तलावात शंभर टक्के पाणी असून, या योजनेवर अवलंबून असणाऱ्या गावांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सध्या बारा गावांपैकी अकरा गावांना पाण्यासाठी आजही भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे या प्रादेशिक योजनेला नवसंजीवनी मिळण्याची गरज आहे.

ठळक मुद्देयेरळवाडी तलावात शंभर टक्के पाणीसाठाप्रादेशिक नळपाणी योजनेला नवसंजीवनीची गरज

संदीप कुंभार मायणी : राज्यातील पहिली प्रादेशिक नळपाणी योजना म्हणून बहुमान मिळवलेली खातवळसह बारा गाव प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेला चोवीस तास वीजपुरवठा व येरळवाडी तलावात शंभर टक्के पाणी असून, या योजनेवर अवलंबून असणाऱ्या गावांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सध्या बारा गावांपैकी अकरा गावांना पाण्यासाठी आजही भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे या प्रादेशिक योजनेला नवसंजीवनी मिळण्याची गरज आहे.येरळवाडी तलावातून खातवळसह बारा गावांना पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी खातवळसह बारा गावे प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली होती. या योजनेस पूर्वी चोवीस तास वीजपुरवठा नव्हता. तलाव्यामध्ये पुरेसा पाण्यासाठा नव्हता, तसेच योजनेची विद्युत मोटार जळाल्यानंतर खर्च कोणी करायचा, अशासह पाईपलाईन दुरुती अशा विविध कारणांनी ही योजना सतत अडचणीत सापडत होती.त्यामुळे या योजनेमध्ये समाविष्ट असणाऱ्या गावांना ही योजना हळूहळू खर्चामुळे आवाक्याबाहेर जाऊ लागल्याने अनेक गावांनी खर्च देणे बंद केले. त्यामुळे गेल्या सहा-सात वर्षांपासून बारा गावांपैकी एनकूळ गाव वगळून सर्व गावांना या योजनेतून पाणी पूर्ण बंद आहे. त्यामुळे अनेक गावांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. उन्हाळ्यामध्ये या गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो.सध्या या प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेसाठी शासनाकडून चोवीस तास वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच अवकाळी पावसामुळे येरळवाडी तलावामध्ये शंभर टक्के पाणीसाठा आहे. मात्र, या योजनेवर अवलंबून असणाºया गावांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे शासनाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन या प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेस नवसंजीवनी देणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून येत आहेत.पाईपलाईन झाली खराबबनपुरी येथील जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालू आहे. फक्त या योजनेतून ज्या बारा गावांना पाणीपुरवठा करण्यात येत होता, ती पाईपलाईन अनेक दिवस योजना बंद असल्यामुळे खराब झाली आहे. ती बदलल्यास सर्व गावांना पाणीपुरवठा होईल व पाण्यासाठीची भटकंती थांबेल.

गेली सहा-सात वर्षे ही योजना बंद आहे. अनेकवेळा पाठपुरावा करूनही वारंवार वेगवेगळ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. उन्हाळ्याततर टँकरशिवाय पर्याय नसतो. म्हणून आम्ही गावासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेतून प्रस्ताव पाठवला असून, यास मंजुरीही मिळालेली आहे.- राज हांगे, सरपंच, दातेवाडी

टॅग्स :WaterपाणीSatara areaसातारा परिसर