शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

बारापैकी अकरा गावांची पाण्यासाठी भटकंती.., चोवीस तास वीजपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 13:20 IST

राज्यातील पहिली प्रादेशिक नळपाणी योजना म्हणून बहुमान मिळवलेली खातवळसह बारा गाव प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेला चोवीस तास वीजपुरवठा व येरळवाडी तलावात शंभर टक्के पाणी असून, या योजनेवर अवलंबून असणाऱ्या गावांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सध्या बारा गावांपैकी अकरा गावांना पाण्यासाठी आजही भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे या प्रादेशिक योजनेला नवसंजीवनी मिळण्याची गरज आहे.

ठळक मुद्देयेरळवाडी तलावात शंभर टक्के पाणीसाठाप्रादेशिक नळपाणी योजनेला नवसंजीवनीची गरज

संदीप कुंभार मायणी : राज्यातील पहिली प्रादेशिक नळपाणी योजना म्हणून बहुमान मिळवलेली खातवळसह बारा गाव प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेला चोवीस तास वीजपुरवठा व येरळवाडी तलावात शंभर टक्के पाणी असून, या योजनेवर अवलंबून असणाऱ्या गावांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सध्या बारा गावांपैकी अकरा गावांना पाण्यासाठी आजही भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे या प्रादेशिक योजनेला नवसंजीवनी मिळण्याची गरज आहे.येरळवाडी तलावातून खातवळसह बारा गावांना पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी खातवळसह बारा गावे प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली होती. या योजनेस पूर्वी चोवीस तास वीजपुरवठा नव्हता. तलाव्यामध्ये पुरेसा पाण्यासाठा नव्हता, तसेच योजनेची विद्युत मोटार जळाल्यानंतर खर्च कोणी करायचा, अशासह पाईपलाईन दुरुती अशा विविध कारणांनी ही योजना सतत अडचणीत सापडत होती.त्यामुळे या योजनेमध्ये समाविष्ट असणाऱ्या गावांना ही योजना हळूहळू खर्चामुळे आवाक्याबाहेर जाऊ लागल्याने अनेक गावांनी खर्च देणे बंद केले. त्यामुळे गेल्या सहा-सात वर्षांपासून बारा गावांपैकी एनकूळ गाव वगळून सर्व गावांना या योजनेतून पाणी पूर्ण बंद आहे. त्यामुळे अनेक गावांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. उन्हाळ्यामध्ये या गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो.सध्या या प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेसाठी शासनाकडून चोवीस तास वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच अवकाळी पावसामुळे येरळवाडी तलावामध्ये शंभर टक्के पाणीसाठा आहे. मात्र, या योजनेवर अवलंबून असणाºया गावांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे शासनाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन या प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेस नवसंजीवनी देणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून येत आहेत.पाईपलाईन झाली खराबबनपुरी येथील जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालू आहे. फक्त या योजनेतून ज्या बारा गावांना पाणीपुरवठा करण्यात येत होता, ती पाईपलाईन अनेक दिवस योजना बंद असल्यामुळे खराब झाली आहे. ती बदलल्यास सर्व गावांना पाणीपुरवठा होईल व पाण्यासाठीची भटकंती थांबेल.

गेली सहा-सात वर्षे ही योजना बंद आहे. अनेकवेळा पाठपुरावा करूनही वारंवार वेगवेगळ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. उन्हाळ्याततर टँकरशिवाय पर्याय नसतो. म्हणून आम्ही गावासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेतून प्रस्ताव पाठवला असून, यास मंजुरीही मिळालेली आहे.- राज हांगे, सरपंच, दातेवाडी

टॅग्स :WaterपाणीSatara areaसातारा परिसर