शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याचा मुख्यमंत्रिपदाचा चौकार, यशवंतराव चव्हाण यांच्यापासून सुरू झालेली परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 12:48 IST

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून सुरू झालेली परंपरा नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली आहे.

नितीन काळेल

सातारा : सातारा जिल्ह्याने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले. तसेच जिल्हा महाराष्ट्राच्या राजकारणातही अग्रेसर राहिलाय. जिल्ह्याने राज्याला एक-दोन नाही तर आतापर्यंत चार मुख्यमंत्री दिले आहेत. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्रीयशवंतराव चव्हाण यांच्यापासून सुरू झालेली परंपरा नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली आहे. शिंदे हे ठाण्यातून निवडून येत असले तरी ते महाबळेश्वर तालुक्यातील दरे तर्फ तांब गावचे आहेत.

यशवंतराव चव्हाण

हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले होते. महाराष्ट्राची निर्मिती १ जून १९६० मध्ये झाली. या दिवसापासून ते १९ नोव्हेंबर १९६२ पर्यंत ते मुख्यमंत्रिपदी राहिले. चव्हाण हे कऱ्हाड विधानसभा मतदारसंघातून निवडून येत होते. त्याचवेळी चीनने भारतावर आक्रमण केल्याने तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी चव्हाण यांना दिल्लीत बोलवून संरक्षणमंत्री केले. त्यामुळे हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला, असे वर्णन करण्यात आले.

बाबासाहेब भोसले

त्यानंतर दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार झाले; पण यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय राजकारणात गेले तरी त्यांची महाराष्ट्रावर पकड होती. जानेवारी १९८२ मध्ये ए. आर. अंतुले हे मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाले. त्यावेळी काँग्रेसकडून अनेकजण इच्छुक होते; पण बॅरिस्टर बाबासाहेब भोसले यांना पक्षाने संधी दिली. ते त्यावेळी मुंबईतील नेहरूनगर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते; पण त्यांना अल्पकाळ मुख्यमंत्रिपदी राहता आले. २१ जानेवाारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३ असा त्यांचा कार्यकाळ राहिला. भोसले हे मूळचे सातारा जिल्ह्यातील कलेढोण (ता. खटाव) गावचे. भोसले हे जिल्ह्यातील दुसरे मुख्यमंत्री ठरले.

पृथ्वीराज चव्हाण

१९९५ नंतर राज्यातील सत्ताकारण बदलले. शिवसेना-भाजप युती, त्यानंतर आघाडी सरकार आले. २००९ मध्ये आघाडी सरकार सत्तेवर आले. त्यावेळी काही कारणाने अशोक चव्हाण यांना पायउतार व्हावे लागले. त्यामुळे कऱ्हाडच्या पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेसने मुख्यमंत्रिपद दिले. चव्हाण हे विधानसभा किंवा विधान परिषदेचे सदस्यही नव्हते. नंतर ते विधान परिषदेत निवडून गेले. चव्हाण यांनी तत्कालीन कऱ्हाड लोकसभा मतदारसंघाचेही नेतृत्व केले होते. चव्हाण हे महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री ठरले. १० नोव्हेंबर २०१० ते २६ सप्टेंबर २०१४ असा त्यांचा कार्यकाल राहिला.

एकनाथ शिंदे

आताचे नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून निवडून येत आहेत. ते मूळचे सातारा जिल्ह्यातील दरे तर्फ तांब (ता. महाबळेश्वर) या गावचे आहेत. ते महाराष्ट्राचे २५ वे मुख्यमंत्री होणार आहेत. शिंदे हे ठाण्यात असतात; पण गावाशी त्यांनी आजही नाळ जपली आहे. वारंवार ते गावी येतात. गावातील विविध कार्यक्रमांत सहभागी होतात, तसेच शेतीकामातही उतरतात. त्यांचे गावावर असणारे प्रेम हे कायम दिसून आले आहे.

तिघेही काँग्रेसचे; पूर्ण कार्यकाळ नाही...

सातारा जिल्ह्याने यापूर्वी तीन मुख्यमंत्री राज्याला दिले होते. तिघेही काँग्रेस पक्षाचे होते; पण यशवंतराव चव्हाण, बॅरिस्टर बाबासाहेब भोसले आणि पृथ्वीराज चव्हाण या तिघांनाही पूर्ण पाच वर्षे मिळाली नाहीत. आता तर एकनाथ शिंदे हे किती वर्षे मुख्यमंत्री राहतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरChief Ministerमुख्यमंत्रीYashwantrao Chavhanयशवंतराव चव्हाणPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणEknath Shindeएकनाथ शिंदे