शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

साताऱ्याचा मुख्यमंत्रिपदाचा चौकार, यशवंतराव चव्हाण यांच्यापासून सुरू झालेली परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 12:48 IST

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून सुरू झालेली परंपरा नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली आहे.

नितीन काळेल

सातारा : सातारा जिल्ह्याने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले. तसेच जिल्हा महाराष्ट्राच्या राजकारणातही अग्रेसर राहिलाय. जिल्ह्याने राज्याला एक-दोन नाही तर आतापर्यंत चार मुख्यमंत्री दिले आहेत. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्रीयशवंतराव चव्हाण यांच्यापासून सुरू झालेली परंपरा नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली आहे. शिंदे हे ठाण्यातून निवडून येत असले तरी ते महाबळेश्वर तालुक्यातील दरे तर्फ तांब गावचे आहेत.

यशवंतराव चव्हाण

हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले होते. महाराष्ट्राची निर्मिती १ जून १९६० मध्ये झाली. या दिवसापासून ते १९ नोव्हेंबर १९६२ पर्यंत ते मुख्यमंत्रिपदी राहिले. चव्हाण हे कऱ्हाड विधानसभा मतदारसंघातून निवडून येत होते. त्याचवेळी चीनने भारतावर आक्रमण केल्याने तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी चव्हाण यांना दिल्लीत बोलवून संरक्षणमंत्री केले. त्यामुळे हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला, असे वर्णन करण्यात आले.

बाबासाहेब भोसले

त्यानंतर दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार झाले; पण यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय राजकारणात गेले तरी त्यांची महाराष्ट्रावर पकड होती. जानेवारी १९८२ मध्ये ए. आर. अंतुले हे मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाले. त्यावेळी काँग्रेसकडून अनेकजण इच्छुक होते; पण बॅरिस्टर बाबासाहेब भोसले यांना पक्षाने संधी दिली. ते त्यावेळी मुंबईतील नेहरूनगर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते; पण त्यांना अल्पकाळ मुख्यमंत्रिपदी राहता आले. २१ जानेवाारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३ असा त्यांचा कार्यकाळ राहिला. भोसले हे मूळचे सातारा जिल्ह्यातील कलेढोण (ता. खटाव) गावचे. भोसले हे जिल्ह्यातील दुसरे मुख्यमंत्री ठरले.

पृथ्वीराज चव्हाण

१९९५ नंतर राज्यातील सत्ताकारण बदलले. शिवसेना-भाजप युती, त्यानंतर आघाडी सरकार आले. २००९ मध्ये आघाडी सरकार सत्तेवर आले. त्यावेळी काही कारणाने अशोक चव्हाण यांना पायउतार व्हावे लागले. त्यामुळे कऱ्हाडच्या पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेसने मुख्यमंत्रिपद दिले. चव्हाण हे विधानसभा किंवा विधान परिषदेचे सदस्यही नव्हते. नंतर ते विधान परिषदेत निवडून गेले. चव्हाण यांनी तत्कालीन कऱ्हाड लोकसभा मतदारसंघाचेही नेतृत्व केले होते. चव्हाण हे महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री ठरले. १० नोव्हेंबर २०१० ते २६ सप्टेंबर २०१४ असा त्यांचा कार्यकाल राहिला.

एकनाथ शिंदे

आताचे नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून निवडून येत आहेत. ते मूळचे सातारा जिल्ह्यातील दरे तर्फ तांब (ता. महाबळेश्वर) या गावचे आहेत. ते महाराष्ट्राचे २५ वे मुख्यमंत्री होणार आहेत. शिंदे हे ठाण्यात असतात; पण गावाशी त्यांनी आजही नाळ जपली आहे. वारंवार ते गावी येतात. गावातील विविध कार्यक्रमांत सहभागी होतात, तसेच शेतीकामातही उतरतात. त्यांचे गावावर असणारे प्रेम हे कायम दिसून आले आहे.

तिघेही काँग्रेसचे; पूर्ण कार्यकाळ नाही...

सातारा जिल्ह्याने यापूर्वी तीन मुख्यमंत्री राज्याला दिले होते. तिघेही काँग्रेस पक्षाचे होते; पण यशवंतराव चव्हाण, बॅरिस्टर बाबासाहेब भोसले आणि पृथ्वीराज चव्हाण या तिघांनाही पूर्ण पाच वर्षे मिळाली नाहीत. आता तर एकनाथ शिंदे हे किती वर्षे मुख्यमंत्री राहतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरChief Ministerमुख्यमंत्रीYashwantrao Chavhanयशवंतराव चव्हाणPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणEknath Shindeएकनाथ शिंदे