शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

चार महिन्यांनंतर खाद्यतेलाचा दर स्थिर; मागणी झाली कमी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:34 IST

सातारा : मागील चार महिन्यांपासून खाद्यतेलाचा दर सतत वाढत होता. मात्र, सध्या मागणी कमी झाल्याने प्रथमच मागील आठवड्यात दर ...

सातारा : मागील चार महिन्यांपासून खाद्यतेलाचा दर सतत वाढत होता. मात्र, सध्या मागणी कमी झाल्याने प्रथमच मागील आठवड्यात दर स्थिर राहिला. तर साताऱ्यात कांद्याचा दर उतरत असून बाजार समितीत तर अनेक दिवसांनंतर वाटाण्याला चांगला भाव मिळत आहे. रविवारी क्विंटलला सहा हजारांपर्यंत दर मिळाला.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खंडाळा, जावळी, माण, फलटण या तालुक्यातून भाजीपाला येत असतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. त्यानंतर भाजी मंडईत हा माल नेऊन विकला जातो. त्यामुळे दरात वाढ होत जाते.

सातारा बाजार समितीत रविवारी एकूण ३७१ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. तर कांद्याची ३९० क्विंटलची आवक झाली. या रविवारी कांद्याची आवक चांगली झाली. बाजार समितीत वांग्याला १० किलोला अवघा १०० ते १३० रुपये दर मिळाला. त्याचबरोबर टोमॅटोला १० किलोला ८० ते १००रुपये, कोबी ४० ते ५० रुपये, फ्लाॅवरला ६० ते १०० रुपये, दोडक्याला ३०० ते ३५० रुपये भाव आला.

तेल डब्याला मागणी कमी

खाद्यतेलाचे दर सतत वाढत आहेत. मात्र, मागील आठवड्यात दर स्थिर राहिले आहेत. बाजारातही तेलाला मागणी कमी आहे. विशेष म्हणजे १५ किलोचा डबा घेण्याऐवजी बहुतांशी ग्राहक हे एक लिटरचा पाऊच घेतात. सूर्यफूल तेलाचा पाऊच १६० ते १७० तर शेंगदाणा तेलाचा १७० ते १७५ रुपयांना मिळत आहे.

द्राक्षाची आवक

साताऱ्यात सध्या कलिंगड आणि द्राक्षाची आवक अधिक आहे. त्यामुळे दरात फार वाढ नाही. कलिंगड १० रुपयांपासून तर द्राक्षे ४० रुपयांपासून किलोने मिळत आहेत.

लसणाला दर

बाजार समितीत भाज्यांना कमी दर आहे. गवारला १० किलोला ३०० ते ४०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. शेवगा शेंगेला अवघा १५० ते २००, पावटा ४०० ते ४५० आणि भेंडीला ३०० ते ३५० रुपये दर मिळाला. लसणाला ६ हजार तर बटाट्याला १३०० रुपये क्विंटलपर्यंत दर निघाला.

गेल्या काही दिवसांपासून भाज्यांचे दर कमी होत चालले आहेत. यामुळे दिलासा असलातरी खाद्यतेलाचे दर अजूल वाढलेलेच आहेत. यामुळे खर्चातही वाढ झालेलीच आहे.

- आशा पवार, ग्राहक

कोरोनामुळे पाश्चात्य देशांची अर्थव्यवस्था खालावली. त्यामुळे त्या देशांनी निर्यात कर वाढवला आहे. परिणामी खाद्यतेलाचे दर वाढलेले आहेत. मागील आठवड्यात दर स्थिर होता.

- संभाजी आगुंडे, विक्री प्रतिनिधी

कांद्याचा दर एकदमच खाली आला आहे. त्यामुळे खर्चतरी निघेल का नाही, अशी स्थिती आहे. त्यातच इतर भाज्यांचेही दर कमी झाले आहेत. त्यामुळे मोठे नुकसान होत आहे.

- रामचंद्र पाटील , शेतकरी

..................................................................................................................................................................................................................................