शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

Satara: उन्हामुळे धरणातील पाणीसाठा होऊ लागला कमी, सिंचनासाठी मागणी वाढली

By नितीन काळेल | Updated: April 21, 2023 16:23 IST

पावसाळा सुरु होईपर्यंत कोयनेतील पाणीसाठा अत्यल्प राहण्याची भीती

सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी चांगल्या पावसामुळे धरणे भरली. पण, आता उन्हाळा तीव्र होत चालला असून सिंचनालाही मागणी वाढली आहे. त्यामुळे धरणे वेगाने रिकामी होऊ लागलीत. सध्या प्रमुख सहा धरणांत ८८ टीएमसी पाणीसाठा असलातरी गतवर्षीपेक्षा कमी आहे. तसेच कोयना धरणातही मागीलवर्षीपेक्षा १९ टीएमसीने साठा घटला आहे. त्यामुळे पाऊस वेळेत सुरू झाल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात.जिल्ह्यात मागील चार वर्षांपासून मान्सूनचा चांगला पाऊस होत आहे. यामुळे सर्व धरणे ओव्हर फूल्ल होतात. तसेच पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी अनेकवेळा धरणातून पाणी सोडावे लागते. परिणामी नदीकाठच्या गावांनाही धोका निर्माण होतो. गेल्यावर्षी तर नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस पडत होता. त्यामुळे रब्बी हंगामातील पेरणी पुढे गेली होती. त्यामुळे सुरुवातीच्या काळात सिंचनासाठी पाण्याची मागणी नव्हती. मात्र, गेल्या दीड महिन्यांपासून मागणीनुसार धरणांतून सिंचनासाठी विसर्ग करावा लागत आहे. आतातर पावसाळा तोंडावर आला आहे. दीड महिन्यानंतर मान्सूनचा पाऊस सुरू होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. पण, सध्या कडाक्याचे ऊन पडत आहे. त्यामुळे धरणांतील पाण्याचे बाष्पीभवन वाढले आहे. त्याचबरोबर सिंचनासाठीही पाण्याची मागणी वाढलीय. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होऊ लागला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात प्रमुख सहा धरणे आहेत. या धरणांत गतवर्षीपेक्षा कमी पाणीसाठा राहिला आहे. तर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयनेतील साठाही वेगाने कमी होऊन सध्या ४२.६८ टीएमसीच राहिला आहे. त्यामुळे पावसाळा सुरु होईपर्यंत कोयनेतील पाणीसाठा अत्यल्प राहण्याची भीती व्यक्त होत आहे.दरम्यान, जिल्ह्यातील धोम, कण्हेर, कोयना, बलकवडी, उरमोडी, तारळी या ६ प्रमुख धरणांची पाणीसाठवण क्षमता १४८.७४ टीएमसी इतका आहे. गेल्यावर्षी यावेळी या धरणांत ८८.२३ टीएमसी पाणीसाठा होता. तर यावर्षी तो ६४.१४ टीएमसी इतका आहे. तर १०५ टीएमसी क्षमता असणाऱ्या कोयना धरणात ४२.६८ टीएमसी साठा आहे. म्हणजेच या धरणात अजूनही जवळपास ४० टक्के पाणी आहे. त्याचबरोबर इतर धरणांमध्येही पाणीसाठा शिल्लक असलातरी मागीलवर्षीपेक्षा कमी आहे. त्यातच उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन वाढले आहे. सिंचनासाठी पाणी मागणीत वाढ असल्याने आगामी दीड महिन्यात धरणांतील पाणीसाठा वेगाने कमी होणार आहे.

कण्हेर, उरमोडीतून सिंचनासाठी विसर्ग...सिंचनाची मागणी वाढली आहे. त्यामुळे धरणांतून मागणीनुसार विसर्ग करण्यात येत आहे. सध्या कोयनेच्या पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक पाणी विसर्ग सुरू आहे. तर धोम धरणाच्या डाव्या कालव्यातून ५७८ क्यूसेक वेगाने सिंचनासाठी पाणी सोडले जात आहे. कण्हेरमधून २५० तर उरमोडी धरणातून डावा कालवा ४५० आणि नदीतून १०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सिंचनासाठी सुरू आहे.

जिल्ह्यातील प्रमुख धरणाचा साठा (टीएमसीमध्ये)धरणे -  यावर्षी - गतवर्षी - एकूण क्षमताधोम - ६.८६ - ८.३१ - १३.५०कण्हेर - ३.९३ - ४.९२ - १०.१०कोयना - ४२.६८ - ६१.७५ - १०५.२५बलकवडी - १.०३ - १.८७ - ४.०८उरमोडी - ५.३५ - ७.०१ - ९.९६तारळी - ४.११ - ४.३७ - ५.८५

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDamधरणWaterपाणीKoyana Damकोयना धरण