शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
3
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
4
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
5
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
6
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
7
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
8
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
9
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
10
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
11
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
12
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
13
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
14
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
15
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
16
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
17
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
18
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
19
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
20
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार

Satara: उन्हामुळे धरणातील पाणीसाठा होऊ लागला कमी, सिंचनासाठी मागणी वाढली

By नितीन काळेल | Updated: April 21, 2023 16:23 IST

पावसाळा सुरु होईपर्यंत कोयनेतील पाणीसाठा अत्यल्प राहण्याची भीती

सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी चांगल्या पावसामुळे धरणे भरली. पण, आता उन्हाळा तीव्र होत चालला असून सिंचनालाही मागणी वाढली आहे. त्यामुळे धरणे वेगाने रिकामी होऊ लागलीत. सध्या प्रमुख सहा धरणांत ८८ टीएमसी पाणीसाठा असलातरी गतवर्षीपेक्षा कमी आहे. तसेच कोयना धरणातही मागीलवर्षीपेक्षा १९ टीएमसीने साठा घटला आहे. त्यामुळे पाऊस वेळेत सुरू झाल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात.जिल्ह्यात मागील चार वर्षांपासून मान्सूनचा चांगला पाऊस होत आहे. यामुळे सर्व धरणे ओव्हर फूल्ल होतात. तसेच पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी अनेकवेळा धरणातून पाणी सोडावे लागते. परिणामी नदीकाठच्या गावांनाही धोका निर्माण होतो. गेल्यावर्षी तर नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस पडत होता. त्यामुळे रब्बी हंगामातील पेरणी पुढे गेली होती. त्यामुळे सुरुवातीच्या काळात सिंचनासाठी पाण्याची मागणी नव्हती. मात्र, गेल्या दीड महिन्यांपासून मागणीनुसार धरणांतून सिंचनासाठी विसर्ग करावा लागत आहे. आतातर पावसाळा तोंडावर आला आहे. दीड महिन्यानंतर मान्सूनचा पाऊस सुरू होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. पण, सध्या कडाक्याचे ऊन पडत आहे. त्यामुळे धरणांतील पाण्याचे बाष्पीभवन वाढले आहे. त्याचबरोबर सिंचनासाठीही पाण्याची मागणी वाढलीय. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होऊ लागला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात प्रमुख सहा धरणे आहेत. या धरणांत गतवर्षीपेक्षा कमी पाणीसाठा राहिला आहे. तर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयनेतील साठाही वेगाने कमी होऊन सध्या ४२.६८ टीएमसीच राहिला आहे. त्यामुळे पावसाळा सुरु होईपर्यंत कोयनेतील पाणीसाठा अत्यल्प राहण्याची भीती व्यक्त होत आहे.दरम्यान, जिल्ह्यातील धोम, कण्हेर, कोयना, बलकवडी, उरमोडी, तारळी या ६ प्रमुख धरणांची पाणीसाठवण क्षमता १४८.७४ टीएमसी इतका आहे. गेल्यावर्षी यावेळी या धरणांत ८८.२३ टीएमसी पाणीसाठा होता. तर यावर्षी तो ६४.१४ टीएमसी इतका आहे. तर १०५ टीएमसी क्षमता असणाऱ्या कोयना धरणात ४२.६८ टीएमसी साठा आहे. म्हणजेच या धरणात अजूनही जवळपास ४० टक्के पाणी आहे. त्याचबरोबर इतर धरणांमध्येही पाणीसाठा शिल्लक असलातरी मागीलवर्षीपेक्षा कमी आहे. त्यातच उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन वाढले आहे. सिंचनासाठी पाणी मागणीत वाढ असल्याने आगामी दीड महिन्यात धरणांतील पाणीसाठा वेगाने कमी होणार आहे.

कण्हेर, उरमोडीतून सिंचनासाठी विसर्ग...सिंचनाची मागणी वाढली आहे. त्यामुळे धरणांतून मागणीनुसार विसर्ग करण्यात येत आहे. सध्या कोयनेच्या पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक पाणी विसर्ग सुरू आहे. तर धोम धरणाच्या डाव्या कालव्यातून ५७८ क्यूसेक वेगाने सिंचनासाठी पाणी सोडले जात आहे. कण्हेरमधून २५० तर उरमोडी धरणातून डावा कालवा ४५० आणि नदीतून १०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सिंचनासाठी सुरू आहे.

जिल्ह्यातील प्रमुख धरणाचा साठा (टीएमसीमध्ये)धरणे -  यावर्षी - गतवर्षी - एकूण क्षमताधोम - ६.८६ - ८.३१ - १३.५०कण्हेर - ३.९३ - ४.९२ - १०.१०कोयना - ४२.६८ - ६१.७५ - १०५.२५बलकवडी - १.०३ - १.८७ - ४.०८उरमोडी - ५.३५ - ७.०१ - ९.९६तारळी - ४.११ - ४.३७ - ५.८५

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDamधरणWaterपाणीKoyana Damकोयना धरण