शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

अवकाळीने शहरवासीयांची दैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 10:42 PM

सातारा : शहर परिसरात मंगळवारी सकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळच्या वेळेतच पाऊस पडल्याने चाकरमान्यांची भलतीच दैना झाली. ...

सातारा : शहर परिसरात मंगळवारी सकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळच्या वेळेतच पाऊस पडल्याने चाकरमान्यांची भलतीच दैना झाली. सलग तीन तास पाऊस सुरू होता. दिवसभर ढगाळ वातावरण कायम राहिले.पावसाळ्यातील पाऊस थांबल्याने लोकांनी छत्र्या, रेन कोट अशा वस्तू घरात ठेवून टाकल्या होत्या. मात्र, पावसाने अचानक हजेरी लावल्याने पावसाळी जामानिमा पुन्हा शोधून काढावा लागला. पाऊस अवकाळी असल्याने कामासाठी घराबाहेर पडण्याच्या तयारीत असणारे अनेकजण पाऊस थांबण्याची वाट पाहत होते. दुपारनंतर पाऊस विश्रांती घेईल, असे अंदाज बांधून काहीजण रेनकोट, छत्री न घेताच आपल्या दुचाकीवरून घराबाहेर पडले. मात्र पावसाने त्यांनाही गाठले. रस्त्याच्या कडेला असणारी झाडे, बस स्टॉप, दुकानांची पडचिती, अशा ठिकाणी जागा मिळेल तिथे पावसापासून बचावासाठी लोक उभे राहत होते.सलग तीन तास झालेल्या पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साठून राहिले होते. गोडोली, सदरबझार परिसरातील सैनिक नगर, मध्यवर्ती बसस्थानक, राजवाडा, जिल्हा परिषद चौक या परिसरात पाणी साठून राहिले. शहरातील अनेक रस्त्यांना खड्डे पडले आहेत, या खड्ड्यांमध्येही मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साठून राहिले होते.शहरातील बोगदा परिसरात डोंगराचे दगड कोसळले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. नगरपालिकेचे कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी हे दगड हटवले. दरम्यान, ग्रामीण भागातही पावसाने हजेरी लावली. रब्बी हंगामातील पिकांना पाणी मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत होते.सायंकाळ होताच हवेत गारव्याचे प्रमाण वाढलेसातारा शहर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. अधूनमधून सूर्यनारायणाचे दर्शन होत असले तरी किमान तापमान १७ ते १९ अंश सेल्सिअसवरउतरले आहे. ढगाळ वातावरणामुळे हवेत थंडीची तीव्रता वाढत चालली आहे.मंगळवारी सकाळी झालेल्या या पावसामुळे थंडीत आणखीनच वाढ झाली. शहरातसह ग्रामीण भागात आता पहाटे व रात्रीच्या वेळी शेकोट्या पेटू लागल्या असून, उबदार कपड्यांनाही मागणी वाढली आहे.छत्र्या अन् पोत्याची खोळपावसाला सुरुवात झाल्यानंतर मार्केट यार्ड परिसरातील भाजी विक्रेत्यांची एकच धांदल उडाली. खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनीही पावसापासून बचाव व्हावा, यासाठी तातडीने सुरक्षित ठिकाण गाठले. पावसाची चिन्हे लक्षात घेता अनेक शेतकऱ्यांनी आपाल्यासोबत छत्र्या आणल्या होत्या. पाऊस पडताच या छत्र्या खुल्या झाल्या. अनेकांनी पारंपरिक पोत्याची खोळ अंगावर घेऊन पावसापासून स्वत:चा बचाव केला.