शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

सातारा जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढली, टॅंकरची संख्या १०० च्या उंबरठ्यावर

By नितीन काळेल | Updated: September 26, 2023 17:40 IST

सातारा : जिल्ह्याच्या पूर्व भागात अजुनही पावसाची हुलकावणीच असल्याने दुष्काळाची दाहकता वाढली आहे. त्यामुळे आताच ९४ गावे आणि ४३२ ...

सातारा : जिल्ह्याच्या पूर्व भागात अजुनही पावसाची हुलकावणीच असल्याने दुष्काळाची दाहकता वाढली आहे. त्यामुळे आताच ९४ गावे आणि ४३२ वाड्यांसाठी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. टंचाई निवारणासाठी सध्या ९९ टॅंकर सुरू आहेत.जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी आहे. पश्चिमेकडेही पर्जन्यमान अपुरे झाले आहे. त्यामुळे बहुतांशी धरणे भरलेली नाहीत. तर पूर्व भागात पावसाने डोळे वटारलेलेच असून आतापर्यंत ५० टक्क्यांपर्यंतच पाऊस झाला आहे. आगामी काही दिवसांत पाऊस झाल्यास परिस्थितीत सुधारणा होणार आहे. अन्यथा पुढीलवर्षीच्या पावसाळ्याची वाट पहावी लागणार आहे. तर सध्यस्थितीत पाऊस नसल्याने पाच तालुक्यात दुष्काळाची दाहकता वाढली आहे. अनेक गावांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे.माण तालुक्यात अपुरे पर्जन्यमान आहे. त्यामुळे दुष्काळ वाढत चालला आहे. तसेच गावोगावच्या ओढ्यांना पाणी नाही. विहिरी आटल्या असून शेतीसह पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. माणमध्ये १०५ गावे आहेत. त्यामधील ५१ गावे आणि तब्बल ३७२ वाड्यांना टॅंकर सुरू आहे. यावर ८१ हजार ५१६ नागरिक आणि ६१ हजार ५१४ पशुधनाची तहान अवलंबून आहे. तर माण तालुक्यातील लोकांसाठी ६४ टॅंकर सुरू आहेत. तालुक्यातील पांगरी, वडगाव, पाचवड, मोगराळे, बिजवडी, अनभुलेवाडी, राजवडी, मोही, थदाळे, डंगिरेवाडी, वावरहिरे, हस्तनपूर, भाटकी, खडकी, धुळदेव, वरकुटे- म्हसवड, ढाकणी, कारखेल, संभूखेड, वाकी, रांजणी, पळशी, मार्डी, खुटबाव, पर्यंती, इंजबाव, वारुगड, परकंदी, महिमानगड, पांढरवाडी, पिंगळी बुद्रुक, सुरुपखानवाड, विरळी, कुरणेवाडी आदीं गावांसह वाड्यावस्त्यांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरु आहे.खटाव तालुक्यातीलही टॅंकरग्रस्त गावांची संख्या वाढली आहे. २१ गावे आणि २४ वाड्यांसाठी टॅंकर सुरू आहेत. २९ हजार नागरिक आणि ८ हजार पशुधनासाठी २४ टॅंकर सुरू आहेत. तालुक्यातील मांडवे, गोसाव्याचीवाडी, कणसेवाडी, खातवळ, येलमरवाडी, पडळ, कान्हरवाडी, धोंडेवाडी, दातेवाडी, तडवळे आदी गावांसाठी टॅंकर सुरू झाले आहेत. फलटण तालुक्यातही पाणीटंचाई वाढलेली आहे. १० गावे ३६ वाड्यांसाठी १२ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सुमारे १५ हजार नागरिक आणि १४ हजार ४९१ पशुधनाला या टॅंकरचा आधार आहे. तालुक्यातील सासवड, दुधेबावी, वडले, मिरगाव, आरडगाव, चांभारवाडी, घाडगेमळा आदी ठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला आहे.

कोरेगाव तालुक्यातील १० गावांतील १५ हजार नागरिक आणि अडीच हजार जनावरांना टॅंकरच्या पाण्याचा आधार आहे. तालुक्यातील टंचाई निवारणासाठी ८ टॅंकर धुरळा उडवत फिरत आहेत. चवणेश्वर, होलेवाडी, विखळे, फडतरवाडीत टंचाई आहे. वाई तालुक्यातील चांदक आणि आनंदपूर या दोन गावांसाठी टॅंकर सुरू आहे. यावर २ हजार नागरिक आणि ४७५ पशुधन अवलंबून आहे. तर पाटण, जावळी, खंडाळा, महाबळेश्वर, सातारा आणि कऱ्हाड या तालुक्यात टॅंकर सुरू नाहीत.

दीड लाख नागरिक, ८७ हजार पशुधन बाधित...

जिल्ह्यात सध्याही पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे टंचाईची स्थिती वाढत चालली आहे. सध्या ९९ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. या टॅंकरवर १ लाख ४२ हजार २७७ नागरिक आणि ८७ हजार ३८४ पशुधन अवलंबून आहे. तर १९ विहिरी आणि ३४ बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. सध्या शासकीय ९ आणि खासगी ९९ टॅंकरद्वारे टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरdroughtदुष्काळWaterपाणी