शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

सातारा जिल्ह्यातील आणखी १२ महसूल मंडलात दुष्काळ, राज्य शासनाचा निर्णय

By नितीन काळेल | Updated: February 17, 2024 19:05 IST

शेतकऱ्यांना फायदा : पूर्वीच वाई अन् खंडाळा संपूर्ण तालुक्याबरोबर ६५ मंडले जाहीर 

सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने शासनाने वाई आणि खंडाळा संपूर्ण तालुका आणि त्यानंतर इतर तालुक्यांतील ६५ मंडलात दुष्काळ जाहीर करुन उपायोजनाचे आदेश दिले होते. त्यानंतर आता आणखी जिल्ह्यातील नवीन आणि पर्जन्यमापक न बसविलेल्या १२ मंडलात दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस पडतो. या पावसावरच खरीप आणि रब्बी हंगामाचे चित्र अवलंबून असते. गेल्यावर्षी मात्र, पर्जन्यमान कमी झाले होते. जून ते सप्टेंबर या चार पावसाळी महिन्यांचा विचार करता सरासरीच्या ७० टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद झालेली. प्रमुख धरणांत कमी पाणीसाठा होता. दुष्काळी भागात चारा आणि पाणीटंचाईचेही संकट होते. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांसह राजकीय पक्षाकडूनही मागणी होत होती. त्यातच कमी पर्जन्यमानामुळे राज्य शासनाने आॅक्टोबर महिन्यातच राज्यातील ४० तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले. यामध्ये सातारा जिल्ह्यातील वाई आणि खंडाळ्याचा समावेश होता. त्यानंतर दुष्काळी तालुक्यातून जोरदार टिकास्त्र सुरू झाले. कारण, माण, खटाव, फलटण, कोरेगाव हे तालुके पूर्वीपासून दुष्काळी आहेत. तालुक्यात पाण्यासाठी टॅंकर सुरू होते. चारा तसेच पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला. त्याचबरोबर लोकप्रतिनिधींनीही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी शासनाकडे केली होती. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यात शासनाने महसूल मंडलात ७५ टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे. अशा राज्यातील १७८ तालुक्यांतील ९५९ महसूल मंडलात दुष्काळ जाहीर करण्यासाठी मान्यता दिलेली. यामध्ये सातारा जिल्ह्यातील आणखी ६५ मंडलांचा समावेश करण्यात आलेला.राज्य शासनाने आता १६ फेब्रुवारीला राज्यातील नवीन काही महसूल मंडलात दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर केली आहे. ज्या महसूल मंडलाचे विभाजन झाले. तसेच नवीन महसूल मंडल निर्माण झाले अशा ठिकाणी पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आलेले नाही. त्याठिकाणी दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील १२ मंडलांचा समावेश झालेला आहे. सातारा तालुक्यातील करंजे तर्फ सातारा, कोडोली मंडल अंतर्भूत झाले आहे. तर कऱ्हाड तालुक्यातील येळगाव, पाटणमधील येराड, आवर्डे, मारुल हवेली. फलटणमधील कोळकी, खटाव तालुक्यातील कलेढोण, भोसरे तर माणमधील वरकुटे मलवडी, आंधळी आणि काेरेगावमधील साप मंडलाचा समावेश आहे. या ठिकाणी आता दुष्काळी सवलती लागू झालेल्या आहेत.

पूर्वी जाहीर ६५ महसूल मंडले..सातारा तालुका : सातारा, खेड, वर्ये, कण्हेर, शेंद्रे, नागठाणे, अंबवडे, वडूथ, तासगाव, अपशिंगे.जावळी : आनेवाडी, कुडाळ.पाटण : ढेबेवाडी, चाफळ, तारळे, मल्हारपेठ, तळमावले, कुठरे, मरळी.कऱ्हाड : कऱ्हाड, उंब्रज, इंदोली, सुपने, मसूर, कवठे, कोपर्डे हवेली, सैदापूर, शेणोली, कोळे, उंडाळे, काले, मलकापूर.कोरेगाव : कोरेगाव, कुमठे, रहिमतपूर, शिरंबे, वाठार स्टेशन, वाठार किरोली, पिंपोडे बुद्रुक, सातारारोड, किण्हई.खटाव : खटाव, आैंध, पुसेगाव, बुध, वडूज, पुसेसावळी, मायणी, निमसाेड, कातरखटाव.माण : दहिवडी, मलवडी, कुकुडवाड, म्हसवड, मार्डी, शिंगणापूर.फलटण : फलटण, आसू, होळ, गिरवी, आदर्की बुद्रुक, वाठार निंबाळकर, बरड, राजाळे, तरडगाव.

या सवलती मिळणार..

  • जमीन महसुलात सूट
  • सहकरी कर्जाचे पुनर्गठण
  • शेतीशी निगडीत कर्ज वसुलीस स्थगिती
  • कृषी पंपाच्या चालू विजबिलात ३३.५ टक्के सूट
  • शालेय, महाविद्यालयीन विद्याऱ्थी परीक्षा शुल्कात माफी
  • रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथीलता
  • आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टॅंकर
  • टंचाई जाहीर गावात शेती पंपाची वीजजोडणी खंडित न करणे
टॅग्स :Satara areaसातारा परिसरdroughtदुष्काळ