दुष्काळ हटतोय अन् शेळीपालन व्यवसाय घटतोय-माण-खटाव तालुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:55 IST2018-04-22T00:55:53+5:302018-04-22T00:55:53+5:30
सातारा : जलयुक्त आणि वॉटर कपची कामे सध्या माण-खटाव या दुष्काळी तालुक्यांत होत असल्यामुळे दुष्काळाची ओळख आता हळूहळू लोप पावत आहे. परंतु या दोन्ही तालुक्यातं पूर्वीपासून सुरू असणारा शेळीपालन व्यवसाय आता नाहीसा होत

दुष्काळ हटतोय अन् शेळीपालन व्यवसाय घटतोय-माण-खटाव तालुका
योगेश घोडके ।
सातारा : जलयुक्त आणि वॉटर कपची कामे सध्या माण-खटाव या दुष्काळी तालुक्यांत होत असल्यामुळे दुष्काळाची ओळख आता हळूहळू लोप पावत आहे. परंतु या दोन्ही तालुक्यातं पूर्वीपासून सुरू असणारा शेळीपालन व्यवसाय आता नाहीसा होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. गेल्या पाच वर्षांत सरासरी दीड लाखाने शेळ्या मेंढ्यांची संख्येत घट झाली आहे.
जिल्ह्यात दुष्काळ पट्ट्यात माण, खटाव, फलटण ही तालुके येतात. या तालुक्यांत प्रमुख्याने शेती व मेंढपाळचा मुख्य व्यवसाय. मात्र पाणी व चाऱ्याच्या टंचाईमुळे या व्यवसायात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. जिल्हा परिषदेच्या पशुधन विभागामार्फत केलेल्या २०१२ च्या पशुगणनेनुसार या तालुक्यात शेळी व मेंढ्यांच्या प्रमाणात १ लाख ३७ हजार १८६ इतकी घट झाल्याची दिसून येत आहे.
माण-खटाव या दोन तालुक्यांत शेळ्या व मेंढ्यांची अधिक प्रमाणात आहे. मात्र याठिकाणी दुष्काळ हा पाचवीला पुजलेला आहे. या तालुक्यांतील लोक हंगामानुसार शेतीती उत्पन्न घेत असतात. तसेच जोडधंदा म्हणून शेळीपालनचा व्यवसाय करतात. या तालुक्यात सतत दुष्काळ असल्याने अनेक कुटुंबे कामासाठी पुणे-मुंबई या सारख्या शहरांमध्ये जाऊन वास्तव करत आहेत. काहीजण शेतजमीन देखरेखीसाठी घराकडे आई-वडिलांनाच सोडून जातात. पूर्वी या भागामध्ये प्रत्येकाच्या घरी शेळा, मेंढ्यांचा कळप असायचा. दुष्काळात ही मंडळी आपली लवाजमा घेऊन सुगम भागात जात असे.
सध्या उदरनिर्वाह करण्यासाठी शेळीपालनाचा व्यवसाय करू लागले. त्यांना चाराही मिळेनासा झाल्याने अनेक कुटुंबे शेळ्या,मेंढ्या विक्रीस सुरुवात केली. हाताला व्यवसाय मिळत नसल्याने मेंढपाळची मुले ही परंपरागत व्यवसाय न करता शिक्षणात पुढे जाऊन मोठमोठ्या शहरात विसावू लागली.
पशुगणेनुसार माण-खटाव तालुक्यांतील आकडेवारी
२००७ च्या पशुगणनेनुसार माणमध्ये शेळ्या ८८ हजार २४१ तर मेंढ्या ९७हजार २५ व खटाव तालुक्यात ५९ हजार ५२ तर मेंढ्या ३९ हजार ३९१ अशी नोंद करण्यात आली.
२०१२ च्या पशुगणनेनुसार माणमध्ये शेळ्या ७८ हजार ८८५ तर मेंढ्या ९४ हजार २६६ व खटावमध्ये २९ हजार ०६८ तर मेंढ्या १८ हजार ७६५ अशी नोंद करण्यात आली.
ूमाण व खटाव तालुक्यांत पाणी व चाºयाची टंचाई निार्मण झाली आहे. तसेच युवकांच्या हाताला काम नाही, त्यामुळे पारंपरिक व्यवसाय सोडून मुले शिक्षणात रमली आहेत. सध्या उच्च शिक्षण घेऊन पुणे, मुंबई या ठिकाणी नोकरी शोधण्यासाठी बाहेर पडत आहेत. त्यामुळे शेळीपालनामध्ये मोठ्या प्रमाणात घट होताना दिसत आहे.
- विनोद पवार, जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी