शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

सातारा जिल्ह्यात दुष्काळ गडद; पाण्याबरोबरच चारा टंचाईची स्थिती गंभीर 

By नितीन काळेल | Updated: September 18, 2023 18:10 IST

आतापर्यंत ५८ टक्केच पाऊस, माण, फलटण अन् कोरेगावमध्ये ४० टक्क्यांपेक्षा कमी

सातारा : जिल्ह्यात दुष्काळाचे ढग गडद होत असून आतापर्यंत फक्त ५८ टक्केच पाऊस झाला आहे. यामध्ये सर्वच तालुक्यात कमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तर माण, खटाव, फलटण आणि कोरेगावमध्ये दाहकता अधिक असून ४० टक्केही पाऊस झालेला नाही. त्यामुळे पाण्याबरोबरच चारा टंचाईची स्थिती गंभीर आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ४७२ मिलीमीटर पाऊस झाला आहे.सातारा जिल्ह्यात शेती क्षेत्र अधिक आहे. खरीप हंगामातील सर्वसाधारण क्षेत्र हे ३ लाख तर रब्बीतील २ लाख हेक्टर असते. ही शेती संपूर्ण पावसावर अवलंबून असते. त्यामुळे सप्टेंबरपर्यंत पडणाऱ्या पावसावरच पिके आणि धरणसाठा अवलंबून राहतो. यंदा मात्र, जिल्ह्यात दुष्काळाचे ढग दाटून आले आहेत. कारण, जिल्ह्यात आतापर्यंत पर्जन्यमान कमी झालेले आहे. तसेच धरणेही भरलेली नाहीत. यामुळे शेतकऱ्यांबरोबर प्रशासनाचीही चिंता वाढलेली आहे.

जिल्ह्यात ११ तालुके आहेत. या सर्व तालुक्यात आतापर्यंत १०० टक्केही पाऊस झालेला नाही. जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात ८१२ मिलीमीटर पर्जन्यमान होणे गरजेचे असते. प्रत्यक्षात ४७२ मिलीमीटर पावसाचीच नोंद झालेली आहे. त्यामुळे आतापर्यंत ५८ टक्क्यांहून अधिक पाऊस पडलेला आहे. अजून पावसाळ्याचे काही दिवस शिल्लक असलेतरी वार्षिक सरासरी पाऊस गाठणार का याविषयीही साशंकता आहे. त्यातच पावसाचे सर्वत्र प्रमाण कमी आहे. 

मागीलवर्षी तब्बल १११ टक्के पाऊस...जिल्ह्यात मागील तीन वर्षे धो-धो पाऊस कोसळला. त्यामुळे जिल्ह्यात १६ सप्टेंबरपर्यंत १११ टक्के पाऊस झाला होता. तर यंदा ५८ टक्केच पडलेला आहे. तर गतवर्षी आतापर्यंत सातारा तालुक्यात १३५ टक्के पाऊस झाला होता. तर जावळीत १२७ टक्के, पाटणला ८६, कऱ्हाड तालुका ११३, कोरेगाव १०५, खटाव १३० टक्के, माण १२५, फलटणला १५९, खंडाळा तालुका १५४, वाई १२८ आणि महाबळेश्वर तालुक्यात ७० टक्के पाऊस पडला होता.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसdroughtदुष्काळ