शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
3
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
5
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
6
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
7
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
8
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
9
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
10
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
11
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
12
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
13
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
14
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
15
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
16
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
17
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
18
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
19
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
20
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video

सातारा जिल्ह्यात दुष्काळ गडद; पाण्याबरोबरच चारा टंचाईची स्थिती गंभीर 

By नितीन काळेल | Updated: September 18, 2023 18:10 IST

आतापर्यंत ५८ टक्केच पाऊस, माण, फलटण अन् कोरेगावमध्ये ४० टक्क्यांपेक्षा कमी

सातारा : जिल्ह्यात दुष्काळाचे ढग गडद होत असून आतापर्यंत फक्त ५८ टक्केच पाऊस झाला आहे. यामध्ये सर्वच तालुक्यात कमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तर माण, खटाव, फलटण आणि कोरेगावमध्ये दाहकता अधिक असून ४० टक्केही पाऊस झालेला नाही. त्यामुळे पाण्याबरोबरच चारा टंचाईची स्थिती गंभीर आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ४७२ मिलीमीटर पाऊस झाला आहे.सातारा जिल्ह्यात शेती क्षेत्र अधिक आहे. खरीप हंगामातील सर्वसाधारण क्षेत्र हे ३ लाख तर रब्बीतील २ लाख हेक्टर असते. ही शेती संपूर्ण पावसावर अवलंबून असते. त्यामुळे सप्टेंबरपर्यंत पडणाऱ्या पावसावरच पिके आणि धरणसाठा अवलंबून राहतो. यंदा मात्र, जिल्ह्यात दुष्काळाचे ढग दाटून आले आहेत. कारण, जिल्ह्यात आतापर्यंत पर्जन्यमान कमी झालेले आहे. तसेच धरणेही भरलेली नाहीत. यामुळे शेतकऱ्यांबरोबर प्रशासनाचीही चिंता वाढलेली आहे.

जिल्ह्यात ११ तालुके आहेत. या सर्व तालुक्यात आतापर्यंत १०० टक्केही पाऊस झालेला नाही. जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात ८१२ मिलीमीटर पर्जन्यमान होणे गरजेचे असते. प्रत्यक्षात ४७२ मिलीमीटर पावसाचीच नोंद झालेली आहे. त्यामुळे आतापर्यंत ५८ टक्क्यांहून अधिक पाऊस पडलेला आहे. अजून पावसाळ्याचे काही दिवस शिल्लक असलेतरी वार्षिक सरासरी पाऊस गाठणार का याविषयीही साशंकता आहे. त्यातच पावसाचे सर्वत्र प्रमाण कमी आहे. 

मागीलवर्षी तब्बल १११ टक्के पाऊस...जिल्ह्यात मागील तीन वर्षे धो-धो पाऊस कोसळला. त्यामुळे जिल्ह्यात १६ सप्टेंबरपर्यंत १११ टक्के पाऊस झाला होता. तर यंदा ५८ टक्केच पडलेला आहे. तर गतवर्षी आतापर्यंत सातारा तालुक्यात १३५ टक्के पाऊस झाला होता. तर जावळीत १२७ टक्के, पाटणला ८६, कऱ्हाड तालुका ११३, कोरेगाव १०५, खटाव १३० टक्के, माण १२५, फलटणला १५९, खंडाळा तालुका १५४, वाई १२८ आणि महाबळेश्वर तालुक्यात ७० टक्के पाऊस पडला होता.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसdroughtदुष्काळ