शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सातारा जिल्ह्यात दुष्काळ गडद; पाण्याबरोबरच चारा टंचाईची स्थिती गंभीर 

By नितीन काळेल | Updated: September 18, 2023 18:10 IST

आतापर्यंत ५८ टक्केच पाऊस, माण, फलटण अन् कोरेगावमध्ये ४० टक्क्यांपेक्षा कमी

सातारा : जिल्ह्यात दुष्काळाचे ढग गडद होत असून आतापर्यंत फक्त ५८ टक्केच पाऊस झाला आहे. यामध्ये सर्वच तालुक्यात कमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तर माण, खटाव, फलटण आणि कोरेगावमध्ये दाहकता अधिक असून ४० टक्केही पाऊस झालेला नाही. त्यामुळे पाण्याबरोबरच चारा टंचाईची स्थिती गंभीर आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ४७२ मिलीमीटर पाऊस झाला आहे.सातारा जिल्ह्यात शेती क्षेत्र अधिक आहे. खरीप हंगामातील सर्वसाधारण क्षेत्र हे ३ लाख तर रब्बीतील २ लाख हेक्टर असते. ही शेती संपूर्ण पावसावर अवलंबून असते. त्यामुळे सप्टेंबरपर्यंत पडणाऱ्या पावसावरच पिके आणि धरणसाठा अवलंबून राहतो. यंदा मात्र, जिल्ह्यात दुष्काळाचे ढग दाटून आले आहेत. कारण, जिल्ह्यात आतापर्यंत पर्जन्यमान कमी झालेले आहे. तसेच धरणेही भरलेली नाहीत. यामुळे शेतकऱ्यांबरोबर प्रशासनाचीही चिंता वाढलेली आहे.

जिल्ह्यात ११ तालुके आहेत. या सर्व तालुक्यात आतापर्यंत १०० टक्केही पाऊस झालेला नाही. जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात ८१२ मिलीमीटर पर्जन्यमान होणे गरजेचे असते. प्रत्यक्षात ४७२ मिलीमीटर पावसाचीच नोंद झालेली आहे. त्यामुळे आतापर्यंत ५८ टक्क्यांहून अधिक पाऊस पडलेला आहे. अजून पावसाळ्याचे काही दिवस शिल्लक असलेतरी वार्षिक सरासरी पाऊस गाठणार का याविषयीही साशंकता आहे. त्यातच पावसाचे सर्वत्र प्रमाण कमी आहे. 

मागीलवर्षी तब्बल १११ टक्के पाऊस...जिल्ह्यात मागील तीन वर्षे धो-धो पाऊस कोसळला. त्यामुळे जिल्ह्यात १६ सप्टेंबरपर्यंत १११ टक्के पाऊस झाला होता. तर यंदा ५८ टक्केच पडलेला आहे. तर गतवर्षी आतापर्यंत सातारा तालुक्यात १३५ टक्के पाऊस झाला होता. तर जावळीत १२७ टक्के, पाटणला ८६, कऱ्हाड तालुका ११३, कोरेगाव १०५, खटाव १३० टक्के, माण १२५, फलटणला १५९, खंडाळा तालुका १५४, वाई १२८ आणि महाबळेश्वर तालुक्यात ७० टक्के पाऊस पडला होता.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसdroughtदुष्काळ