शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
2
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
3
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
4
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
5
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
6
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
7
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
8
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
9
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
10
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!
11
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
12
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
13
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
14
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
15
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
16
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
17
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
18
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
19
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
20
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!

सातारा जिल्ह्यात दुष्काळी स्थिती; आत्ताच ८६ गावे, ३०० वाड्यांना कोरड

By नितीन काळेल | Updated: February 12, 2024 18:37 IST

दीड लाख लोकांना टँकरने पाणीपुरवठा; भीषणता वाढणार 

सातारा : जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याने टंचाईत वाढ होऊ लागली आहे. सध्या ८६ गावे आणि २९८ वाड्यावस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. यावर सुमारे दीड लाख नागरिकांची तहान अवलंबून आहे. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच अशी स्थिती असताना मे महिन्यात टंचाईचे काय हाेणार असा प्रश्न भेडसावू लागला आहे.जिल्ह्यात गेल्यावर्षी मार्च महिन्यात टँकर सुरू झाले. आजही अनेक गावांचे टँकर बंद झालेले नाहीत. जवळपास ११ महिन्यांपासून संबंधित गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतोय. याला कारण म्हणजे गेल्यावर्षी मान्सूनचा पाऊस कमी झाला. त्यामुळे दुष्काळी स्थिती उद्भवली आहे. सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भासत आहे. यामुळे लोकांना टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तरीही चार-पाच दिवस टँकर फिरकत नसल्याचे चित्र आहे. यामुळे लोकांची पाण्यासाठी रानोमाळ भटकंती सुरू आहे. तसेच पशुधनाच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे.

मागील महिन्यांपासून टंचाईची स्थिती वाढली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात पाच तालुक्यांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये माण तालुक्यात परिस्थिती गंभीर बनत चाललीय. माणमधील ३७ गावे आणि २४६ वाड्यावस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. यासाठी ४६ टँकर सुरू आहेत. या टँकरवर ६१ हजार नागरिक आणि सुमारे ७१ हजार पशुधनाची तहान अवलंबून आहे. तालुक्यातील वडगाव, पाचवड, मोगराळे, बिजवडी, जाधववाडी, अनभुलेवाडी, मोही, थदाळे, डंगिरेवाडी, वावरहिरे, सोकासन, राणंद, हस्तनपूर, भाटकी, खडकी, वरकुटे म्हसवड, कारखेल, संभूखेड, हवालदारवाडी, रांजणी, पळशी, गोंदवले बुद्रुक, जाशी, भालवडी, खुटबाबव, मार्डी, पर्यंती, इंजबाव, वारुगड, परकंदी, टाकेवाडी आदी गावांना आणि त्याखालील वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.खटाव तालुक्यातही टंचाई वाढत आहे. सध्या १३ गावे आणि ९ वाड्यांतील २२ हजार नागरिक आणि चार हजारांवर जनावरांना टँकरच्या पाण्याचा आधार आहे. तालुक्यात सध्या १२ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मांजरवाडी, नवलेवाडी, मांडवे, नागाचे कुमठे, गोसाव्याचीवाडी, धारपुडी आदी गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. फलटण तालुक्यातही १३ गावे आणि ४३ वाड्यांसाठी टँकर सुरू आहे. सासवड, वडले, आरडगाव, मिरगाव, घाडगेमळा, कापडगाव, कोरेगाव, नाईकबोमवाडी, मिरढे, आदर्की बुद्रुक, आंदरुड आदी गावांसाठी ११ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या टँकरवर फलटणमधील २३ हजार नागरिक आणि १७ हजारांवर पशुधनाची तहान अवलंबून आहे.

कोरेगाव तालुक्यात २२ गावांतील ३३ हजार नागरिक आणि अडीच हजार पशुधनासाठी १९ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. चवणेश्वर, होलेवाडी, विखळे, जाधववाडी, होसेवाडी, सिद्धार्थनगर, गुजरवाडी, अनभुलेवाडी, नायगाव, नांदवळ, वाठार स्टेशन, बिचुकले, चिलेवाडी, नागेवाडी, सोळशी, पिंपोडे बुद्रुक, तळिये, भाडळे, नलवडेवाडी, आझादपूर आदी गावांसाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. वाई तालुक्यातही एका गावासाठी टँकर सुरू आहे.जिल्ह्यात आताच टंचाईची स्थिती गंभीर बनत चालली आहे. त्यामुळे आगामी काळात उन्हाळा सुरू होत आहे. परिणामी पाण्यासाठी लोकांना वणवण फिरावे लागणार आहे. २०१८ प्रमाणेच टंचाईची स्थिती निर्माण होण्याचीही भीती व्यक्त होत आहे.

९५ हजार पशुधन बाधित; ८९ टँकर सुरू..जिल्ह्यात माणसांना पाणी मिळेनासे झाले आहे. तसेच पशुधनही दुष्काळात भरडलेय. त्यामुळे आज ९५ हजार जनावरांना टँकरच्या पाण्याचा आधार आहे. यामध्ये गाय, म्हशीप्रमाणेच शेळ्या-मेंढ्यांचा समावेश आहे. तर सध्या नागरिक आणि पशुधनासाठी ८९ टँकर सुरू आहेत. तसेच या टँकरबरोबरच विहिरी आणि बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे. सध्या माण तालुक्यात ९ विहिरी आणि १५ बोअरवेलचे अधिग्रहण झाले आहे. तर खटाव तालुक्यात २ विहिरी, १७ बोअरवेलचे तसेच वाई तालुक्यात १२ विहिरींचे अधिग्रहण झालेले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी